'एमव्ही वान हाय' वरील १८ खलाशांना आयएनएस सुरतने वाचवले!

भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाची यशस्वी कामगिरी


नवी दिल्ली : भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दल यांच्या तातडीच्या आणि समन्वित बचाव मोहिमेमुळे मोठा जीवितहानीचा धोका टळला आहे. सिंगापूरच्या 'MV Wan Hai 503' या मालवाहू जहाजावर कंटेनरमध्ये झालेल्या स्फोटानंतर भीषण आग लागली होती. या संकटग्रस्त जहाजावरील २२ खलाशांपैकी १८ जणांना सुखरूप वाचवण्यात आले आहे, तर ४ जणांबाबत शोधकार्य सुरू आहे.


ही घटना ९ जून २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता माहिती व्यवस्थापन केंद्राला (IFC-IOR) समजली. त्यानंतर तात्काळ INS Surat आणि एक डॉर्नियर विमान घटनास्थळी पाठवण्यात आले. दुपारी ४:३० वाजेपर्यंत १८ खलाशांना सुरक्षितपणे वाचवण्यात यश आले.


https://www.facebook.com/share/r/1BjnHcpZka/

आगीत जखमी झालेल्या खलाशांना तात्काळ प्राथमिक वैद्यकीय उपचार देण्यात आले असून, जहाज सध्या नवीन मंगळुरू बंदराकडे रवाना झाले आहे. तेथे पुढील उपचार आणि खलाशांची उतरवणूक केली जाणार आहे.


भारतीय नौदल, कोस्ट गार्ड, डायरेक्टोरेट जनरल ऑफ शिपिंग आणि इतर एजन्सींच्या संयुक्त प्रयत्नांमुळे एक मोठी समुद्रातील दुर्घटना टळली.

Comments
Add Comment

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी ईडीच्या धाडी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजधानी कोलकात्यात

Indian History : सापडले दोन हजार वर्षे जुने तीन किलो वजनाचे प्राचीन ताम्रपत्र

बिलासपूर : छत्तीसगडच्या बिलासपूर येथील मल्हार परिसरातील रहिवासी संजीव पांडेय यांच्या ताब्यातून सुमारे २०००

Delhi Airport : दिल्ली विमानतळावर स्विस एअर विमानाच्या इंजिनाला आग, ६ प्रवासी जखमी

दिल्लीतील आयजीआय विमानतळावर स्विस एअरच्या एलएक्स १४७ या विमानाच्या टेकऑफदरम्यान विमानाच्या इंजिनमध्ये अचानक

Monsoon 2026 : आनंद वार्ता! यंदा मान्सून लवकर येणार; १८ ते २५ मे दरम्यान पावसाचे आगमन होणार

- युरोपीयन मध्यम श्रेणी हवामान अंदाज केंद्राचा अंदाज एप्रिलमध्ये उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांनी बेजार

Blast : अखिलेश यादव, राहुल गांधींचा पुतळा जाळताना स्फोट, भाजप महिला आमदार जखमी

बहराइच : उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये भाजपाच्या 'महिला जनआक्रोश मोर्चा' दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे.