'एमव्ही वान हाय' वरील १८ खलाशांना आयएनएस सुरतने वाचवले!

भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाची यशस्वी कामगिरी


नवी दिल्ली : भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दल यांच्या तातडीच्या आणि समन्वित बचाव मोहिमेमुळे मोठा जीवितहानीचा धोका टळला आहे. सिंगापूरच्या 'MV Wan Hai 503' या मालवाहू जहाजावर कंटेनरमध्ये झालेल्या स्फोटानंतर भीषण आग लागली होती. या संकटग्रस्त जहाजावरील २२ खलाशांपैकी १८ जणांना सुखरूप वाचवण्यात आले आहे, तर ४ जणांबाबत शोधकार्य सुरू आहे.


ही घटना ९ जून २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता माहिती व्यवस्थापन केंद्राला (IFC-IOR) समजली. त्यानंतर तात्काळ INS Surat आणि एक डॉर्नियर विमान घटनास्थळी पाठवण्यात आले. दुपारी ४:३० वाजेपर्यंत १८ खलाशांना सुरक्षितपणे वाचवण्यात यश आले.


https://www.facebook.com/share/r/1BjnHcpZka/

आगीत जखमी झालेल्या खलाशांना तात्काळ प्राथमिक वैद्यकीय उपचार देण्यात आले असून, जहाज सध्या नवीन मंगळुरू बंदराकडे रवाना झाले आहे. तेथे पुढील उपचार आणि खलाशांची उतरवणूक केली जाणार आहे.


भारतीय नौदल, कोस्ट गार्ड, डायरेक्टोरेट जनरल ऑफ शिपिंग आणि इतर एजन्सींच्या संयुक्त प्रयत्नांमुळे एक मोठी समुद्रातील दुर्घटना टळली.

Comments
Add Comment

Independence Day : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी लाल किल्ला सज्ज

नवी दिल्ली : यंदा शनिवार १५ ऑगस्ट २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत लाल किल्ल्यावर ८० वा

Sangeet Natak Akademi Award : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

· महाराष्ट्रातील दहा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव · संगीत, नृत्य, नाट्य व लोककलेतील योगदानाचा

Vande Mataram : वंदे मातरमच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून राष्ट्रगीत गायले जाणार

जेन-झींचं प्रतिनिधीत्व अधिक पाहायला मिळणार नवी दिल्ली : सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण मानला जाणाऱ्या

Agni-5 Mk2 : अग्नी-5 Mk2 मध्ये मोठे अपग्रेड; वजन 20 टक्क्यांनी घटल्याचा दावा, वाढणार मारक क्षमता

नवी दिल्ली : भारत आपल्या संरक्षण क्षमतेत सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करत आहे. ब्रह्मोस आणि अग्नी

Justice Yashwant Varma : न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध; संसदेत चौकशी समितीचा अहवाल सादर

नवी दिल्ली: न्यायाधीशांच्या अधिकृत निवासस्थानी जळित नोटांची बंडले सापडल्याप्रकरणी वादात सापडलेले माजी

Karnataka Bandh : कावेरी पाणीवाटपाच्या विरोधात कर्नाटक बंद; जाणून घ्या काय सुरू, काय राहणार बंद?

बंगळुरू : कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने (CWMA) १२ ऑगस्टपासून पुढील १५ दिवस तमिळनाडूला दररोज १२ हजार क्युसेक