रेल्वेत विसरलेले सोन्याचे दागिने मिळाले!

  60

मुंबई : एका महिलेची लोकल ट्रेनमध्ये राहिलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग वडाळा रेल्वे पोलिसांनी शोधून परत मिळवून दिली. त्या बॅगेत ४ लाखांचे सोन्याचे दागिने होते. मात्र रेल्वेच्या मदत क्रमांकावर संपर्क साधून लवकर प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.


साताऱ्यात राहणाऱ्या प्राजक्ता बावधाने यांनी कुर्ल्यावरून पनवेलला जाणारी ट्रेन पकडली. त्यांचा भाऊ उदय शिंदे हा पुरूषांच्या डब्यात होता तर प्राजक्ता या मुलासह महिलांच्या प्रथम श्रेणी डब्यात होत्या. सायंकाळी ६ वाजता ते मानसरोवर रेल्वे स्थानकात उतरले. त्यावेळी गडबडीत बॅग ट्रेनमध्येच विसरल्याचे प्राजक्ता यांच्या लक्षात आले. दुसऱ्या डब्यातून उतरलेला त्यांचा भाऊ उदय शिंदे याला त्यांनी हा प्रकार सांगितला. उदय शिंदे यांनी तात्काळ रेल्वेच्या हेल्पलाईनला संपर्क साधण्यास सुरवात केली. मात्र कुणी प्रतिसाद दिला नाही.


वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जाधव हे डॉकयार्ड रेल्वे स्थानकात होते. त्यांना या संदर्भात माहिती मिळताच त्यांनी ट्रेनमध्ये तपास केला. सुदैवाने ती बॅंग ट्रेनमधील रॅकवर सुरक्षित होती. त्या बॅगेतील दागिन्यांची पडताळणी करण्यात आली आणि प्राजक्ता बावधने यांच्याकडे बॅग सुपूर्द करण्यात आली, अशी माहिती वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख यांनी दिली.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता