निवडणूक आयोग राजकीय पक्षांना देणार मतदार याद्यांचा डेटा

नवी दिल्ली : निवडणूक आयोग राजकीय पक्षांना हरियाणा आणि महाराष्ट्राच्या मतदार याद्या शेअर करणार आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून राहुल गांधींनी यासंदर्भात ट्विटरवर (एक्स) संदेश जारी केलाय.


याबाबत राहुल गांधी म्हणाले की, मतदार यादी सोपवण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय हा एक चांगला पहिला टप्पा आहे. हा डेटा डिजिटल आणि मशीन-रीडेबल फॉरमॅटमध्ये (जसे की एक्सेल किंवा सीएसव्ही) कोणत्या तारखेपर्यंत उपलब्ध होईल हे आयोग स्पष्ट करू शकेल का ? त्यांनी या पोस्टसोबत एका मीडिया रिपोर्टचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने या वर्षाच्या सुरुवातीला दिल्ली उच्च न्यायालयाला दिलेल्या आश्वासनानुसार 2009 ते 2024 पर्यंत हरियाणा आणि महाराष्ट्राची मतदार यादी शेअर करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.


विरोधी पक्ष बऱ्याच काळापासून अशी मागणी करत आहेत की मतदार यादी केवळ स्कॅन किंवा पीडीएफ स्वरूपातच नाही तर अशा डेटा स्वरूपात (जसे की एक्सेल, सीएसव्ही इ.) उपलब्ध करून दिली पाहिजे ज्यामुळे तिचे विश्लेषण करणे, अनियमितता ओळखणे आणि पारदर्शकता सुनिश्चित करणे शक्य होईल. काँग्रेसने यापूर्वीही निवडणूक आयोगावर निवडणूक घोटाळ्याचे आरोप केले आहेत. अलिकडेच राहुल यांनी महाराष्ट्रात अशाच प्रकारच्या आरोपांवर एक लेख प्रकाशित केला होता, जो निवडणूक आयोगाने पूर्णपणे नाकारला होता. त्यानंतर, राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या 'सूत्रांचा हवाला देऊन खंडन' करण्याच्या वृत्तावरही टीका केली होती.

Comments
Add Comment

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने