शालेय बस चालकांची दर आठवड्याला होणार मद्यपान चाचणी

  21

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाचा निर्णय


मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बस चालकांची पार्श्वभूमी तपासणे, दर आठवड्याला त्यांची मद्यपान व औषध चाचणी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय विभागाने जारी केलेले नवीन नियम राज्यातील सर्वच शाळांना लागू करण्यात आले आहेत.


शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या निर्णयानुसार चालक, सफाई कामगार आणि महिला सेविकांची सकाळी व सायंकाळी अशी दोने वेळेस चाचणी होणे गरजेचे आहे. अनधिकृत व्यक्ती बसमध्ये प्रवेश करणार नाहीत. तसेच खासगी वाहनांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी चालकाची ओळख व पार्श्वभूमी शाळेला कळवावी, अशी सूचनाही शासन निर्णयामध्ये करण्यात आल्या आहेत. तसेच, पालकांनी चालकांची वैयक्तिक माहिती स्वतःकडे ठेवावी, चालकांची पार्श्वभूमी, तसेच बेपर्वा ड्रायव्हिंग आणि भूतकाळातील अपघाताच्या घटनांचा समावेश असेल. विद्यार्थ्यांसाठी खासगी वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्या पालकांनी शाळा व्यवस्थापनाला चालकाची पडताळणी आणि ओळख तपशिलांची माहिती देणे आवश्यक आहे. बसमध्ये जीपीएस आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, दर सहा महिन्यांनी बसची तांत्रिक तपासणी करून आरटीओकडून प्रमाणपत्र घेणे, अशा विविध उपाययोजनांची अमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळांनी शौचालये, परिसर आणि इतर संवेदनशील ठिकाणी देखरेख ठेवावी.


शाळा सुटल्यानंतर कोणीही विद्यार्थी शाळेत राहणार नाही याची शाळांनी खात्री करावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
मुंबईत सध्या सुमारे सहा हजार शालेय बस कार्यरत आहेत.


शासन निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित झाल्याचे स्कूलबस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले. मुख्याध्यापकांची जबाबदारी निश्चित झाली असून विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या वेळी सुरक्षेची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असेल, असेही ते म्हणाले.


सरकारने सर्व शाळांना एक अलर्ट सिस्टम स्थापित करण्यास सांगितले आहे. जेणेकरून जर एखादा मुलगा शाळेतून हरवला किंवा त्याच्या नियुक्त केलेल्या बसमध्ये चढला नाही तर त्यांना तत्काळ सूचना मिळतील. राज्य सरकारने चालकांची माहिती तपासण्यासाठी जिल्हा समिती नियुक्त करावी. काही चालक इतर राज्यांतील असतात आणि त्यांची पोलीस पडताळणी करणे कठीण असते. आरटीओ आणि पोलिसांनी अशा प्रकरणांमध्ये शाळांना मदत करावी, असे स्कूल प्रिन्सिपल्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेचे अधिकारी कंटाळले प्रशासनाच्या कार्यपद्धतीला

रिक्त पदांअभावी अतिरिक्त कामांची जबाबदारी आणि चौकशीचा ससेमिरा मुंबई:मुंबई महापालिकेचा कारभारात आता

दादर स्थानक परिसरात पोलिसांना न जुमानता होतो व्यवसाय

पण गावातील महिलांना दिला जातो त्रास मुंबई :मुंबई महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमान सध्या दादरसह इतर

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ठिकाणांना भेट देण्यासाठी विशेष ट्रेन

भारत गौरव ट्रेन टूरला १०० टक्के बुकिंगसह प्रचंड प्रतिसाद नवी दिल्ली :इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम

ई-शिवनेरी बस सेवेला मुंबईकरांची कायम पसंती

महामंडळाच्या तिजोरीत जवळपास ५० कोटीं महसूल जमा मुंबई : ई-शिवनेरी मुंबईकरांची लाडकी बनली असून एसटीचा आधुनिक

समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ

मुंबई :नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी – आमणे हा शेवटचा टप्पा गुरुवारी सायंकाळी वाहतूक सेवेत दाखल

'हाउसफुल ५' सिनेमाने पहिल्याच दिवशी केली रेकॉर्डब्रेक कमाई

मुंबई : बहुचर्चित आणि मोठ्या बजेटचा चित्रपट 'हाउसफुल ५' ६ जून रोजी प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी