शालेय बस चालकांची दर आठवड्याला होणार मद्यपान चाचणी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाचा निर्णय


मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बस चालकांची पार्श्वभूमी तपासणे, दर आठवड्याला त्यांची मद्यपान व औषध चाचणी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय विभागाने जारी केलेले नवीन नियम राज्यातील सर्वच शाळांना लागू करण्यात आले आहेत.


शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या निर्णयानुसार चालक, सफाई कामगार आणि महिला सेविकांची सकाळी व सायंकाळी अशी दोने वेळेस चाचणी होणे गरजेचे आहे. अनधिकृत व्यक्ती बसमध्ये प्रवेश करणार नाहीत. तसेच खासगी वाहनांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी चालकाची ओळख व पार्श्वभूमी शाळेला कळवावी, अशी सूचनाही शासन निर्णयामध्ये करण्यात आल्या आहेत. तसेच, पालकांनी चालकांची वैयक्तिक माहिती स्वतःकडे ठेवावी, चालकांची पार्श्वभूमी, तसेच बेपर्वा ड्रायव्हिंग आणि भूतकाळातील अपघाताच्या घटनांचा समावेश असेल. विद्यार्थ्यांसाठी खासगी वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्या पालकांनी शाळा व्यवस्थापनाला चालकाची पडताळणी आणि ओळख तपशिलांची माहिती देणे आवश्यक आहे. बसमध्ये जीपीएस आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, दर सहा महिन्यांनी बसची तांत्रिक तपासणी करून आरटीओकडून प्रमाणपत्र घेणे, अशा विविध उपाययोजनांची अमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळांनी शौचालये, परिसर आणि इतर संवेदनशील ठिकाणी देखरेख ठेवावी.


शाळा सुटल्यानंतर कोणीही विद्यार्थी शाळेत राहणार नाही याची शाळांनी खात्री करावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
मुंबईत सध्या सुमारे सहा हजार शालेय बस कार्यरत आहेत.


शासन निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित झाल्याचे स्कूलबस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले. मुख्याध्यापकांची जबाबदारी निश्चित झाली असून विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या वेळी सुरक्षेची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असेल, असेही ते म्हणाले.


सरकारने सर्व शाळांना एक अलर्ट सिस्टम स्थापित करण्यास सांगितले आहे. जेणेकरून जर एखादा मुलगा शाळेतून हरवला किंवा त्याच्या नियुक्त केलेल्या बसमध्ये चढला नाही तर त्यांना तत्काळ सूचना मिळतील. राज्य सरकारने चालकांची माहिती तपासण्यासाठी जिल्हा समिती नियुक्त करावी. काही चालक इतर राज्यांतील असतात आणि त्यांची पोलीस पडताळणी करणे कठीण असते. आरटीओ आणि पोलिसांनी अशा प्रकरणांमध्ये शाळांना मदत करावी, असे स्कूल प्रिन्सिपल्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य