ई-शिवनेरी बस सेवेला मुंबईकरांची कायम पसंती

महामंडळाच्या तिजोरीत जवळपास ५० कोटीं महसूल जमा


मुंबई : ई-शिवनेरी मुंबईकरांची लाडकी बनली असून एसटीचा आधुनिक चेहरा अशी ओळख असलेल्या ई-शिवनेरीच्या सेवेला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. या कालावधीत मुंबई-ठाणे-पुणे मार्गावर प्रवाशांनी या गाडीतून प्रवास केला आहे. ई-शिवनेरीमुळे महामंडळाच्या तिजोरीत जवळपास ५० कोटींची भर पडली असल्याने उदंड प्रतिसादात ई-शिवनेरीची घोडदौड दोन वर्षानंतरही कायम आहे अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.


मुंबई-पुणे मार्गावर ई-शिवनेरीच्या रोज २४ फेऱ्या होतात. या फेऱ्यांमधून १२ लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. या फेऱ्यांमधून महामंडळाने ४९ लाख ८३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. ठाणे-पुणे मार्गावरही प्रवाशांनी ई-शिवनेरीच्या प्रवासाला पसंती दिली.त्याचबरोबर ठाणे-पुणे ई-शिवनेरी जेव्हा सुरु झाली तेव्हा अवघ्या सात दिवसात दीड हजार प्रवाशांनी प्रवास करत २० लाखांहून अधिक महसूल मिळवला आहे. या मार्गावर सध्या १४ ई-शिवनेरी बस सुरू आहेत.


रोज ई-शिवनेरीच्या तीन फेऱ्या होतात. गेल्या ७ दिवसांत ८१ रुपये प्रति किमी या दराने २० लाख ६७ हजार रुपये ई-शिवनेरीने कमावले आहे, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले.
महाराष्ट्र दिनी अर्थात, एक मे २०२३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे-पुणे मार्गावर पहिली ई-शिवनेरी धावली. परळमध्ये चार्जिंग स्टेशन सुरू झाल्यानंतर मेच्या पहिल्या पंधरवड्यात दादर-पुणे मार्गावर ई-शिवनेरी धावू लागली. शिवनेरी ही प्रामुख्याने दादर-पुणे, स्वारगेट या मार्गावर धावते.


दादर ते कळंबोलीपर्यंत अनेक प्रवासी शिवनेरी बस पकडतात. दादर, कुर्ला नेहरूनगर, मैत्री पार्क, मानखुर्द ,वाशी, सानपाडा, नेरुळ जंक्शन, खारघर, कळंबोली आणि पनवेल हे प्रमुख थांबे असून एकूण २२ शहर बस थांबे आहेत.


इलेक्ट्रिक बसेसची वैशिष्ट्य


इलेक्ट्रिक बस एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ३५० किमीपर्यंत अंतर सहज कापू शकणार आहे. प्रत्येक सीटजवळ चार्जर, आरामदायक पुश बॅक सीट, वाय-फायसह मनोरंजनासाठी बसमध्ये टीव्ही आणि अत्याधुनिक इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि सेफ्टीसाठीही अनेक लेटेस्ट फीचर्स या इलेक्ट्रिक बसमध्ये कंपनीने दिले आहेत.
बसमध्ये चालक आणि सहचालक सोडून ४३ प्रवासी बसू शकतात.


फेरी संख्या
मे २०२३ रोज फेरी संख्या ६
मे २०२५ रोज फेरी संख्या २५


फेरी कालावधी
मे २०२३ दर तासाने
मे २०२५ - ३० मिनिटांनी
मुंबई फेऱ्या : २४
पुणे फेऱ्या : २४

Comments
Add Comment

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

शरद पवारांसाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाचा नकार

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाने नकार दिल्यामुळे महाविकास आघाडीत संघर्ष

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक

एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला