ई-शिवनेरी बस सेवेला मुंबईकरांची कायम पसंती

  46

महामंडळाच्या तिजोरीत जवळपास ५० कोटीं महसूल जमा


मुंबई : ई-शिवनेरी मुंबईकरांची लाडकी बनली असून एसटीचा आधुनिक चेहरा अशी ओळख असलेल्या ई-शिवनेरीच्या सेवेला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. या कालावधीत मुंबई-ठाणे-पुणे मार्गावर प्रवाशांनी या गाडीतून प्रवास केला आहे. ई-शिवनेरीमुळे महामंडळाच्या तिजोरीत जवळपास ५० कोटींची भर पडली असल्याने उदंड प्रतिसादात ई-शिवनेरीची घोडदौड दोन वर्षानंतरही कायम आहे अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.


मुंबई-पुणे मार्गावर ई-शिवनेरीच्या रोज २४ फेऱ्या होतात. या फेऱ्यांमधून १२ लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. या फेऱ्यांमधून महामंडळाने ४९ लाख ८३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. ठाणे-पुणे मार्गावरही प्रवाशांनी ई-शिवनेरीच्या प्रवासाला पसंती दिली.त्याचबरोबर ठाणे-पुणे ई-शिवनेरी जेव्हा सुरु झाली तेव्हा अवघ्या सात दिवसात दीड हजार प्रवाशांनी प्रवास करत २० लाखांहून अधिक महसूल मिळवला आहे. या मार्गावर सध्या १४ ई-शिवनेरी बस सुरू आहेत.


रोज ई-शिवनेरीच्या तीन फेऱ्या होतात. गेल्या ७ दिवसांत ८१ रुपये प्रति किमी या दराने २० लाख ६७ हजार रुपये ई-शिवनेरीने कमावले आहे, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले.
महाराष्ट्र दिनी अर्थात, एक मे २०२३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे-पुणे मार्गावर पहिली ई-शिवनेरी धावली. परळमध्ये चार्जिंग स्टेशन सुरू झाल्यानंतर मेच्या पहिल्या पंधरवड्यात दादर-पुणे मार्गावर ई-शिवनेरी धावू लागली. शिवनेरी ही प्रामुख्याने दादर-पुणे, स्वारगेट या मार्गावर धावते.


दादर ते कळंबोलीपर्यंत अनेक प्रवासी शिवनेरी बस पकडतात. दादर, कुर्ला नेहरूनगर, मैत्री पार्क, मानखुर्द ,वाशी, सानपाडा, नेरुळ जंक्शन, खारघर, कळंबोली आणि पनवेल हे प्रमुख थांबे असून एकूण २२ शहर बस थांबे आहेत.


इलेक्ट्रिक बसेसची वैशिष्ट्य


इलेक्ट्रिक बस एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ३५० किमीपर्यंत अंतर सहज कापू शकणार आहे. प्रत्येक सीटजवळ चार्जर, आरामदायक पुश बॅक सीट, वाय-फायसह मनोरंजनासाठी बसमध्ये टीव्ही आणि अत्याधुनिक इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि सेफ्टीसाठीही अनेक लेटेस्ट फीचर्स या इलेक्ट्रिक बसमध्ये कंपनीने दिले आहेत.
बसमध्ये चालक आणि सहचालक सोडून ४३ प्रवासी बसू शकतात.


फेरी संख्या
मे २०२३ रोज फेरी संख्या ६
मे २०२५ रोज फेरी संख्या २५


फेरी कालावधी
मे २०२३ दर तासाने
मे २०२५ - ३० मिनिटांनी
मुंबई फेऱ्या : २४
पुणे फेऱ्या : २४

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.