रत्नागिरीत एलपीजी टँकर आणि मिनी बसचा अपघात

रत्नागिरी : चिपळूणहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स मिनी बसला सीएनजी गॅस घेऊन जात असलेल्या टँकरने धडक दिल्याने अपघात झाला. अपघातानंतर मिनी बस वीस फूट खोल दरीत कोसळली. बावनदी परिसरात ही दुर्घटना घडली. टँकरमधून गॅसची गळती झाली. टँकर धडकेनंतर जवळ असलेल्या गुरांच्या गोठ्याला जाऊन धडकला. गोठ्याजवळ असलेल्या एका घराला पण या अपघाताचा फटका बसला. दुर्घटनेत गुरांचा गोठा जळून खाक झाला. आग लागल्यामुळे दोन गुरे जखमी झाली. घराजवळ उभी असलेली रिक्षा जळून गेली. घरावरील फायबरचे पत्रे जळून गेले. अपघातात वीस ते पंचवीसजण जखमी झाले. जखमींना तातडीने रत्नागिरी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोलीस यंत्रणा, महसूल, अग्निशमन दल, स्थानिक पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे. सीएनजी टँकर मधून होणारी गळती थांबवण्यात आली आहे. अपघात झाला त्यावेळी घरात असलेली माणसं आवाज ऐकून घराबाहेर आली. यामुळे धडकेनंतर टँकर गोठ्याला आणि गोठ्याजवळच्या घराला आपटला तरी घरातील रहिवासी सुरक्षित आहेत.
Comments
Add Comment

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई विमानतळावर आगमन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत

मुंबई : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे

Mumbai Local News : लोकलमध्ये महिलेला मारहाण करणाऱ्या पुरुषाला १२ तासांत अटक

मुंबई : लोकलमध्ये महिलेला मारहाण करत असलेल्या पुरुषाचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल होताच अवघ्या १२

Jalna : कॉलेजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि चौघे जखमी

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Boss Scam : अधिकारी बनून पैशांची मागणी; 'बॉस स्कॅम'पासून सावधान राहण्याचे केंद्राचे आवाहन

नवी दिल्ली : व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा इतर संदेशवहन माध्यमांचा वापर करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर

New IT Rules : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नवीन आयटी नियम कठोर, आक्षेपार्ह मजकूर हटवण्याची मुदत २४ तासांवरून थेट २ तासांवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी आक्षेपार्ह आणि संवेदनशील मजकूर हटवण्याच्या मुदतीत