दंगल सुरू झाल्यामुळे मणिपूरच्या पाच जिल्ह्यांत पाच दिवस इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क बंद

इंफाळ : राष्ट्रीय तपास संस्थेने अर्थात एनआयएने मैतेई ग्रुप आरंबाई टेंगोलच्या पाच जणांना अटक केली आहे. यातील एक स्थानिक स्वयंघोषीत कमांडर आहे. ही अटक होणार याचा अंदाज येताच मणिपूरच्या काही भागांमध्ये दंगल करायला सुरुवात झाली. पण सर्वत्र चोख बंदोबस्तामुळे आरोपींना पलायन करणे जमले नाही. अखेर रविवारी ८ जून २०२५ रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास पाचही जणांना अटक करण्यात आली. या अटकेनंतर दंगल आणखी भडकली. दंगलीची तीव्रता वाढू नये म्हणून इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, थोबुल, बिशनपूर, काकचिंग या पाच जिल्ह्यांमध्ये पाच दिवस इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क बंद करण्यात आले आहे.

रात्री भडकलेल्या दंगलीचे पडसाद आंतरराष्ट्रीय सीमेजवळच्या मोरेह पर्यंत दिसून आले. हिंसा आणखी पसरू नये म्हणून सर्वत्र दंगल प्रभावीत सर्व भागांमध्ये संचारबंदी अर्थात कर्फ्यू लागू करण्यात आली आहे. संपूर्ण बिष्णुपुर जिल्ह्यातही संचारबंदी आहे. दंगल करणाऱ्यांनी अटकेतील पाच जणांच्या सुटकेची मागणी करत क्वाकीथेल आणि उरीपोक येथे रस्त्यांवर टायर आणि जुने फर्निचर जाळले. जमाव मोठा असल्याचा आणि वाढत असल्याचा अंदाज येताच सुरक्षा पथकाने हवेत गोळीबार केला. गर्दी हटत नसल्याचे बघून दंगल आटोक्यात आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट गोळ्यांचा वापर करण्याचा निर्णय झाला आणि जमावाच्या दिशेने गोळीबार करण्यात आला.

तेंगोपाल जिल्ह्यातील एका कुकी व्यक्तीच्या अटकेला विरोध करण्यासाठी स्थानिक मोरेहमध्ये रस्त्यांवर आले. पण सुरक्षा पथक घटनास्थळी तातडीने आल्यामुळे हिंसा टळली. आंदोलकांनी अटकेतील व्यक्तीच्या सुटकेची मागणी केली. यामुळे मोरेहमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. भाजपा खासदार लीशेंबा सनाजाओबा यांनी नागरिकांना शांत रहाण्याचे तसेच कायदा - सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

  1. मैतेईशी संबंधित पाच जणांना अट, अटकेचे कारण समजले नाही. अटकेवरुन हिंसाचार

  2. जमावाने केली हिंसा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, ठिकठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड, अनेक ठिकाणी लुटालूट

  3. आंदोलकांनी राजधानीत विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आणि राजभवनाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर केला रास्तारोको.

  4. जमावावर लाठीमार, जमाव पांगवण्यासाठी सुरक्षा पथकांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

  5. बिष्णुपुर जिल्ह्यात संचारबंदी अर्थात कर्फ्यू. इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, थौबल आणि काकचिंग व्हॅली जिल्ह्यांमध्ये संचारबंदी अर्थात कर्फ्यू.

  6. इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, थोबुल, बिशनपूर, काकचिंग या पाच जिल्ह्यांमध्ये पाच दिवस इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क बंद

  7. शांतता राखा आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करा; भाजपाच्या राज्यसभा खासदार लेशेम्बा सानाजाओबा यांचे आवाहन

  8. अटकेचा निषेध म्हणून देण्यात आली बंदची हाक

  9. बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित तीन दहशतवाद्यांना अटक, स्फोटके आणि शस्त्रसाठा जप्त

  10. पुढील निर्णयापर्यंत मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटच सुरू राहणार. फेब्रुवारी २०२५ मध्ये मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या राजीनाम्यानंतर मणिपूरमध्ये कोणीही सरकार स्थापन केले नसल्यामुळे केंद्राने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली आहे.

Comments
Add Comment

ISSF Junior World Championship. :आयएसएसएफ ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा देदिप्यमान विजय

आयएसएसएफ (ISSF) ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा २०२६: भारताचा देदिप्यमान विजय; २४ पदकांसह अव्वल स्थान

Ketan Agarwal Murder : एवढा मोठा कांड केला तरी पश्चात्ताप नाही ; त्यात लॉकअपमध्ये सियाने अशी काही मागणी केली की पोलीसही झाले थक्क

Ketan Agarwal Murder : लोहगड किल्ल्यावर पती केतन अग्रवाल (Ketan Agarwal) याला शेकडो फूट खोल दरीत ढकलून ठार मारल्याच्या आरोपामुळे सध्या

Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शहीद सहा जवानांची नावे प्रथमच जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकावर होणार कायमस्वरूपी नोंद

Operation Sindoor :  जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन

Raincore Trend : ओले रस्ते, स्टायलिश अंदाज : पावसाळी फॅशनमध्ये 'रेनकोर'चा डंका!

सध्या फॅशन विश्वात 'रेनकोर' (Raincore) या नवीन ट्रेंडची जोरदार चर्चा सुरू आहे. हा ट्रेंड केवळ पावसाळी हवामानापासून

Ayodhya Ram Mandir Donation Scam : अयोध्या राम मंदिर दान घोटाळा प्रकरणात नवे वळण; चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचा राजीनामा

अयोध्या राम मंदिर दान घोटाळा (Ayodhya Ram Mandir Donation Scam) प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र

Amarnath Yatra 2026 Guide: हर हर महादेव! अमरनाथ यात्रेचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण माहिती!

श्रीनगर : दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ गुहेतील नैसर्गिक बर्फाच्या