'हाउसफुल ५' सिनेमाने पहिल्याच दिवशी केली रेकॉर्डब्रेक कमाई

मुंबई : बहुचर्चित आणि मोठ्या बजेटचा चित्रपट 'हाउसफुल ५' ६ जून रोजी प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी जोरदार ओपनिंग करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अक्षय कुमारसाठी मागची काही वर्षं फारशी यशस्वी ठरली नाहीत, मात्र २०२५ हे वर्ष त्यांच्यासाठी आशेचं किरण घेऊन आले आहे. 'केसरी चैप्टर २' नंतर आता 'हाउसफुल ५'ने देखील दमदार कामगिरी करत बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, 'हाउसफुल ५'ने अक्षय कुमारच्या मागील चित्रपटाच्या कमाईलाही मागे टाकले आहे.



बॉक्स ऑफिस रिपोर्ट :


'हाउसफुल ५'ला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ‘हाउसफुल ४’चा विक्रम मोडीत काढला आहे. ‘हाउसफुल ४’ने आपल्या प्रदर्शनाच्या दिवशी १९ कोटींची कमाई केली होती, तर 'हाउसफुल ५'ने २४.३५ कोटी रुपये कमावले आहेत. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटासाठी ही अत्यंत चांगली सुरुवात मानली जात आहे. पहिल्या दिवसाच्या कमाईवरून शनिवार आणि रविवारच्या कमाईतही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



दिग्दर्शक व समीक्षण :


तरुण मनसुखानी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या कॉमेडी-थ्रिलर चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असल्या तरी प्रेक्षक मात्र चित्रपटाला मनोरंजक म्हणत आहेत.



कलाकार :


चित्रपटात अक्षय कुमार यांच्या सोबत अभिषेक बच्चन, फरदीन खान, रितेश देशमुख, सोनम बाजवा, नरगिस फाखरी, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, रंजीत, जॅकलिन फर्नांडिस, चंकी पांडे, डिनो मोरिया, आणि सौंदर्या शर्मा यांसारख्या कलाकारांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.


चित्रपट दोन भागांमध्ये – ए आणि बी वर्जनमध्ये प्रदर्शित झाला आहे, जो प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरत आहे.


'हाउसफुल ५'ने बॉक्स ऑफिसवर केलेली दमदार सुरुवात पाहता, हा चित्रपट आगामी दिवसांतही यशाची नोंद करेल, असा विश्वास सिनेरसिकांमध्ये दिसून येत आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात थंडीची लाट; कोणत्या शहरांमध्ये गारठा वाढणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज!

मुंबई : राज्यातील बहुतांश भागात थंडीचा जोर वाढत असल्याचे हवामान विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. अनेक

विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक; मंगल नांगरे पाटील यांचे निधन

मुंबई : महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री

मुलांच्या तिकीट बुकिंगच्या नियमात बदल ५-१२ वर्षे वयादरम्यान तिकिटाचे धोरण ठरणार

मुंबई : भारतीय रेल्वेच्या २०२५ च्या बाल तिकीट धोरणानुसार ५ वर्षांखालील मुले स्वतंत्र बर्थ किंवा सीट न घेता

उबाठा युवा सेनेतील ३०० कार्यकर्ते शिंदे गटात

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलताना

ला निनाच्या प्रभावामुळे यंदा मुंबईकर गारठणार

मुंबई : नोव्हेंबरमध्ये उत्तर भारतात थंडीची सुरुवात झाल्यानंतर तिचा प्रभाव आता महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे.

एल्फिन्स्टन पुलाच्या जागी डबल-डेकर पुलाचे काम सुरू

मुंबई : १२५ वर्षे जुन्या एल्फिन्स्टन पुलाच्या जागी डबल-डेकर पूल बांधण्याचे काम सुरू झाले आहे. पुलाच्या दोन्ही