बांधकामांचा सुकाळ अन् पाणीपुरवठा नियोजनाचा बट्ट्याबोळ

आमदार संजय केळकर घेणार अधिकाऱ्यांची झाडाझडती


ठाणे :ठाण्यात एकीकडे पाण्याची कमतरता असताना दुसरीकडे नव्याने सुरू असलेल्या बांधकामांसाठी पाण्याची पळवा-पळवी सुरू आहे. पाणीपुरवठा नियोजनाचा बट्ट्याबोळ झाला असून सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. तर वाढत्या बेकायदा बांधकामांचा मुद्दाही येत्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करून कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमांतर्गत आमदार संजय केळकर यांनी खोपट येथील भाजपा पक्ष कार्यालयात नागरिकांशी संवाद साधत नागरी समस्या ऐकून घेतल्या. पत्रकारांशी बोलताना केळकर यांनी ठाण्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत नाराजी व्यक्त केली. ३०-३५ बेकायदा बांधकामांची यादीच प्रशासनाला देण्यात आली असून त्यावर तक्रारदाराचे समाधान करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. न्यायालयाने कानउघाडणी केल्यावरच कारवाई केली जाते. येत्या अधिवेशनात याबाबत आवाज उठवून अशा बांधकामांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे केळकर यांनी सांगितले.


शहरात पाण्याची कमतरता असून आवश्यक तेथे बोअरही खणलेल्या नाहीत. अशावेळी बांधकामेही मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांना बेसुमार पाणी पुरवठा केला जात आहे. याकरिता पाण्याची पळवा-पळवी करण्यात येत असल्याने अनेक भागात पाण्याची कमतरता भासत आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन कोसळले आहे.


सफाई कामगारांच्या वारसा हक्काचा प्रश्न अधिवेशनात लावून धरल्याने राज्यातील सुमारे ५० हजार कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळाला. काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जाणीवपूर्वक लाभार्थ्यांना ऑर्डर देण्यात चालढकल होत असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला. अंबरनाथ नगरपालिकेतील ४७ लाभार्थ्यांच्या ऑर्डर काढण्यात येणार आहेत. इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ऑर्डर काढण्यासाठी मी पाठपुरावा करत आहे. ठाणे महापालिकेतील सफाई कामगारांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्वांना हा लाभ मिळेपर्यंत मी प्रयत्नशील राहीन, असे केळकर म्हणाले.

Comments
Add Comment

Mumbai Local : कल्याण स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

कल्याण : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आजचा प्रवास मनस्तापाचा ठरला. कल्याण स्थानकावर अचानक सिग्नल यंत्रणेत

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'बुद्ध रत्न' पुरस्कार प्रदान

- युद्ध नको, बुद्ध हवा; ठाण्यात आठव्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला समतेचा

Dombivali News : डोंबिवली - अखेर पी अँड टी कॉलनीतील पाणी प्रश्न मिटला

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपा नगरसेविका ऍड. कविता मिलिंद म्हात्रे यांनी

KDMC : केडीएमसीत धक्कादायक प्रकार; महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी, लिपिक...

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे एका लिपिकाकडून महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा गंभीर प्रकार

Thane Mumbra Firing : मुंब्य्रात दिवसाढवळ्या धाड-धाड गोळ्या झाडल्याने खळबळ; ३ जण गंभीर जखमी

ठाणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून खून, बलात्कार आणि चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, गुन्हेगारांना

Kalyan News : कल्याण हादरलं! गांधारी परिसरात नागाचा थरार; एकापाठोपाठ तीन भटक्या कुत्र्यांचा मृत्यू

कल्याण : कल्याण पश्चिम भागातील गांधारी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक