बिश्नोई टोळीने धमकी दिल्याचा काँग्रेस नेत्याचा दावा

गाझियाबाद : उत्तर प्रदेशमधील गाझियाबादचे प्रापर्टी डीलर आणि काँग्रेस नेते अकबर चौधरी यांनी पोलिसांकडे बिश्नोई टोळीच्या दोन जणांविरोधात तक्रार नोंदवली आहे. बिश्नोई टोळीकडून धमकी आल्याचे अकबर चौधरी सांगत आहेत. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

गाझियाबादमधील टीला मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पसौंडा गावातील ईदगाह रोडवर अकबर चौधरी राहतात. अकबर चौधरी हे काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे सरचिटणीस अर्थात प्रदेश महासचिव आहेत. अकबर चौधरींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांना ६ जून रोजी सकाळी ११ वाजता मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन करणारा स्वतःला दक्ष चौधरी आणि अनु चौधरी यांचा मित्र सांगत होता. त्याने मी लॉरेंस बिश्नोई टोळीचा सदस्य आहे, असंही सांगितलं आणि जीवे मारण्याची धमकी दिली. इन्स्टाग्रामवर शेखर शर्मा नावाच्या व्यक्तीनेही जीवे मारण्याची धमकी दिल्याचे अकबर चौधरींनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पोलीस दक्ष चौधरी, अनु चौधरी आणि शेखर शर्मा नावाच्या व्यक्तींना शोधत आहेत. ज्या नंबरवरुन फोन आल्याचे अकबर चौधरी म्हणाले त्या नंबर बाबतची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Comments
Add Comment

UBT: उबाठाकडून बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली; परभणीत बसवला मुस्लिम महापौर

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर ज्या प्रखर हिंदुत्वाचा आणि मराठी

राज्य सरकारचे टाटा ट्रस्ट आणि नाम फाउंडेशनसोबत सामंजस्य करार

स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :

Navnath Ban: काँग्रेसची गुलामगिरी करणाऱ्या राऊतांनी स्वाभिमानाची भाषा करू नये; नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई: वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे विचार विसरून काँग्रेसची गुलामगिरी करणाऱ्या राऊतांनी

PMO Office Shift: तब्बल ७८ वर्षांनंतर पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी दुपारी पंतप्रधान कार्यालयचा (पीएमओ)

Kiren Rijiju: काँग्रेसच्या खासदारांकडून लोकसभा अध्यक्षांना शिवीगाळ; भाजपा नेत्याकडून व्हिडीओ शेअर

मुंबई: केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी (१२ फेब्रुवारी) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या सभागृहातील

मुंबईच्या धर्तीवर 'ठाणे शहर विकास समिती' स्थापन करा; उपमहापौर कृष्णा पाटील यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र

ठाणे: ठाणे शहराचा वाढता विस्तार आणि नागरी गरजा लक्षात घेता, मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर ठाण्यातही 'ठाणे शहर