बिश्नोई टोळीने धमकी दिल्याचा काँग्रेस नेत्याचा दावा

गाझियाबाद : उत्तर प्रदेशमधील गाझियाबादचे प्रापर्टी डीलर आणि काँग्रेस नेते अकबर चौधरी यांनी पोलिसांकडे बिश्नोई टोळीच्या दोन जणांविरोधात तक्रार नोंदवली आहे. बिश्नोई टोळीकडून धमकी आल्याचे अकबर चौधरी सांगत आहेत. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

गाझियाबादमधील टीला मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पसौंडा गावातील ईदगाह रोडवर अकबर चौधरी राहतात. अकबर चौधरी हे काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे सरचिटणीस अर्थात प्रदेश महासचिव आहेत. अकबर चौधरींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांना ६ जून रोजी सकाळी ११ वाजता मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन करणारा स्वतःला दक्ष चौधरी आणि अनु चौधरी यांचा मित्र सांगत होता. त्याने मी लॉरेंस बिश्नोई टोळीचा सदस्य आहे, असंही सांगितलं आणि जीवे मारण्याची धमकी दिली. इन्स्टाग्रामवर शेखर शर्मा नावाच्या व्यक्तीनेही जीवे मारण्याची धमकी दिल्याचे अकबर चौधरींनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पोलीस दक्ष चौधरी, अनु चौधरी आणि शेखर शर्मा नावाच्या व्यक्तींना शोधत आहेत. ज्या नंबरवरुन फोन आल्याचे अकबर चौधरी म्हणाले त्या नंबर बाबतची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Comments
Add Comment

फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. गेल्याच

मुंबई महापालिका विक्रोळी पार्कसाईट येथील २८ इमारतींचा पुनर्विकास करणार

मुंबई (खास प्रतिनिधी) : विक्रोळी पार्कसाईट येथे असलेल्या महानगरपालिकेच्या २८ इमारतींचा पुनर्विकास

महापालिकेच्या निवडणुकीआधीच मुंबईतला राष्ट्रवादीचा चेहरा पडला

मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच महापालिकांच्या

अखेर अनमोल बिश्नोईच्या अमेरिकेत आवळल्या मुसक्या, भारतात आणण्याच्या प्रक्रियेला वेग!

नवी दिल्ली : गँगस्टर अनमोल बिश्नोईचे अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यात भारतीय यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे अशी

'बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’ ठरवणार'

मुंबई : राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानवांवरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा

एनडीए बिहारमध्ये पास, दिल्ली आणि महाराष्ट्रात 'स्थानिक'च्या परीक्षेसाठी सज्ज

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने २४३ पैकी २०२ जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखली. एनडीए बिहार