बिश्नोई टोळीने धमकी दिल्याचा काँग्रेस नेत्याचा दावा

गाझियाबाद : उत्तर प्रदेशमधील गाझियाबादचे प्रापर्टी डीलर आणि काँग्रेस नेते अकबर चौधरी यांनी पोलिसांकडे बिश्नोई टोळीच्या दोन जणांविरोधात तक्रार नोंदवली आहे. बिश्नोई टोळीकडून धमकी आल्याचे अकबर चौधरी सांगत आहेत. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

गाझियाबादमधील टीला मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पसौंडा गावातील ईदगाह रोडवर अकबर चौधरी राहतात. अकबर चौधरी हे काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे सरचिटणीस अर्थात प्रदेश महासचिव आहेत. अकबर चौधरींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांना ६ जून रोजी सकाळी ११ वाजता मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन करणारा स्वतःला दक्ष चौधरी आणि अनु चौधरी यांचा मित्र सांगत होता. त्याने मी लॉरेंस बिश्नोई टोळीचा सदस्य आहे, असंही सांगितलं आणि जीवे मारण्याची धमकी दिली. इन्स्टाग्रामवर शेखर शर्मा नावाच्या व्यक्तीनेही जीवे मारण्याची धमकी दिल्याचे अकबर चौधरींनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पोलीस दक्ष चौधरी, अनु चौधरी आणि शेखर शर्मा नावाच्या व्यक्तींना शोधत आहेत. ज्या नंबरवरुन फोन आल्याचे अकबर चौधरी म्हणाले त्या नंबर बाबतची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Comments
Add Comment

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेगवान पोर्शे कार डिव्हायडरला धडकली, ड्रायव्हर गंभीर जखमी

मुंबई: मुंबईत बुधवारी रात्रीच्या सुमारास कारचा गंभीर अपघात घडला. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेगाने जाणारी

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पंतप्रधान मोदींचा मुंबईत जोरदार 'प्रहार'! 'नाव न घेता' उद्धव ठाकरेंना दिला मोठा 'झटका'

मेट्रो प्रकल्प रोखला; मुंबई हल्ल्यावरून काँग्रेसवरही केला घणाघात नवी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

Gold Silver Rate Today: सोने सलग तिसऱ्यांदा नव्या उच्चांकावर! आकडे पाहून कापरे भरणार? सोने १२३००० पार, चांदीतही पराकोटीची वाढ

मोहित सोमण: एकीकडे मजबूत जागतिक फंडामेंटल व दुसरीकडे आर्थिक अस्थिरता या दोन कारणांमुळे कमोडिटीतील दबाव आणखी

'प्रहार' Stock Market: अखेर पाचव्या दिवशी मात्र घसरण चार दिवसांच्या रॅलीला ब्रेक बाजारात मोठ्या प्रमाणात नफा बुकिंग सुरू

मोहित सोमण:सलग चार वेळा शेअर बाजारात झालेल्या वाढीनंतर आज अखेर इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात ब्रेक लागला आहे.

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ

मुंबई : राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण