बिश्नोई टोळीने धमकी दिल्याचा काँग्रेस नेत्याचा दावा

  76

गाझियाबाद : उत्तर प्रदेशमधील गाझियाबादचे प्रापर्टी डीलर आणि काँग्रेस नेते अकबर चौधरी यांनी पोलिसांकडे बिश्नोई टोळीच्या दोन जणांविरोधात तक्रार नोंदवली आहे. बिश्नोई टोळीकडून धमकी आल्याचे अकबर चौधरी सांगत आहेत. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

गाझियाबादमधील टीला मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पसौंडा गावातील ईदगाह रोडवर अकबर चौधरी राहतात. अकबर चौधरी हे काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे सरचिटणीस अर्थात प्रदेश महासचिव आहेत. अकबर चौधरींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांना ६ जून रोजी सकाळी ११ वाजता मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन करणारा स्वतःला दक्ष चौधरी आणि अनु चौधरी यांचा मित्र सांगत होता. त्याने मी लॉरेंस बिश्नोई टोळीचा सदस्य आहे, असंही सांगितलं आणि जीवे मारण्याची धमकी दिली. इन्स्टाग्रामवर शेखर शर्मा नावाच्या व्यक्तीनेही जीवे मारण्याची धमकी दिल्याचे अकबर चौधरींनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पोलीस दक्ष चौधरी, अनु चौधरी आणि शेखर शर्मा नावाच्या व्यक्तींना शोधत आहेत. ज्या नंबरवरुन फोन आल्याचे अकबर चौधरी म्हणाले त्या नंबर बाबतची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Comments
Add Comment

भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा

वांद्रे येथे ५२ फुटी काशी विश्वनाथ मंदिराचा देखावा

मुंबई : दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

बाप्पाच्या आगमनापूर्वी सोने स्वस्त पण चांदी महाग झाली 'ही' आहेत कारणे जाणून घ्या आजचे दर

मोहित सोमण:आज जागतिक अस्थिरतेच्या तोंडावर आज व गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी पुन्हा सोन्यात घसरण झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना