निधीच्या प्रतीक्षेत विरार-अलिबाग कॉरिडॉर

एमएसआरडीसी यंत्रणेकडून अद्याप प्रस्तावावर प्रश्नचिन्ह


अलिबाग:विसर-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका बांधण्यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचे स्वप्न भंग होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उच्च पदस्थांनी एमएसआरडीसीकडे दोन महिन्यांपूर्वी मोरबे ते जेएनपीटी हा महामार्ग बांधण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र एमएसआरडीसी यंत्रणेकडून अद्याप या प्रस्तावावर कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिल्ली-मुंबई महामार्गातील पॅकेज १७ मधील शिरवली गावाजवळील माथेरान डोंगररांगाच्या खाली दोन बोगद्याचे काम पूर्ण केले आहे. सध्या या बोगद्यातील रस्त्याचे आणि वीज व्यवस्थेचे अंतिम टप्प्याचे काम सुरू आहे. ८० टक्के बोगद्याचे काम पूर्ण झाले असून, यंदाच्या डिसेंबर महिन्यापर्यंत हा बोगदा दुहेरी वाहतुकीसाठी खुला केला जाऊ शकेल, तसेच बोगद्यातून आरपार जाऊ शकल्याने पनवेल (मोरबे) ते बदलापूर हे अंतर अवघ्या १० मिनिटांवर येणार आहे. बोगद्यांसोबत महामार्गाचे काम ७० टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण झाल्याने पुढील काही महिन्यात बदलापूर येथून मोरबे गावापर्यंतचा रस्ता पूर्ण झाला आहे.

विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका या महामार्गावर करण्याचे नियोजन होते. मात्र निधीअभावी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना हा महामार्ग करणे सध्या अशक्य आहे. पनवेल तालुक्यातील ३९ गावांमधील सुमारे अडीचशे हेक्टर जमीन या महामार्गात बाधित होत आहे. यासाठी सरकारला सात हजार कोटी रुपयांची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे. आतापर्यंत १७०० कोटी रुपयांची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळालेली आहे. अजूनही पनवेलमधील ३९ गावांमधील शेतकऱ्यांसाठी सुमारे ५३०० कोटी रुपयांची गरज लागणार आहे. तो निधी कसा जमवायचा याची चिंता सरकारला पडली आहे.
Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग