केंद्रीय संस्कृत विद्यापीठातर्फे आजपासून उत्कर्ष महोत्सव

  69

नाशिक : केन्द्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली आणि राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, तिरुपती यांच्या संयुक्त विद्यमाने ८, ९ आणि १० जून रोजी नाशिक मध्ये आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संस्कृत विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ मदनमोहन झा यांनी पत्रकार परिषदेत दिली.


प्रा. निलाभ तिवारी, ब्रह्मदत्त शर्मा, मुकुंद खोचे, स्वागत समितीचे लक्ष्मण सावजी, विश्वास देवकर आदी उपस्थित होते. केन्द्रीय संस्कृत विद्यापीठ संस्कृत भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी कार्य करणारी भारत सरकारची सर्वात मोठी संस्था आहे. त्यांच्या माध्यमातून भारतभर १२ कॅम्पस, शेकडो महाविद्यालये आणि हजारो गुरुकुल पाठशाळा कार्यरत आहेत.


नाशिक कॅम्पस मध्ये आयुर्वेद शिक्षणासाठी प्राथमिक ते उच्चस्तरापर्यंत गुरुकुलाची स्थापना केली जाईल. यासोबतच शास्त्र विषयांसोबत विविध व्यावसायिक प्रशिक्षण, पीजी डिप्लोमा कोर्सेस, नवीन अभ्यासक्रम व बी.ए. सिव्हिल सर्व्हिसेससाठी संस्कृत माध्यमातून मार्गदर्शन दिले जाईल.



महोत्सवाचे कार्यक्रम


८ जून २०२५ (शनिवार)
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे सकाळी १० वाजता "आगामी १० वर्षांची संस्कृत संवर्धन योजना" यावर देशभरातील संस्कृत विद्यापीठांचे कुलगुरू ,प्रतिनिधी चिंतन करतील.


९ जून २०२५ (रविवार)
स्थळ: गुरुदक्षिणा सभागृह, कॉलेज रोड, नाशिक
वेळ: सकाळी १० वाजता – सार्वजनिक उद्घाटन
दुपारी २.३० वाजता "संत संमेलन".


१० जून २०२५ (सोमवार)
स्थळ: गुरुदक्षिणा सभागृह वेळ: सकाळी १० वाजता – कुलगुरू पुरस्कार वितरण व पुस्तक लोकार्पण समारंभ



देशात साडेतीन लाख गुरुकुल करणार


भारतीय संस्कृतीत गुरुकुल पद्धत अवलंबली जात होती. त्या काळात १ लाख ४० हजार गुरुकुले होती. परंतु पुढील काळात ही पद्धत संपुष्टात आली आहे. भारतीय संस्कृतीचा विचार पुढे नेण्यासाठी आता पुन्हा एकदा केंद्रशासन गुरुकुल पद्धतीचा स्वीकार करण्यासाठी सर्वतोपरी कार्य करत आहे. आगामी काळात देशभरात साडेतीन लाख गुरुकुल सुरू करणार असल्याचा असल्याची माहिती तिवारी
यांनी दिली.

Comments
Add Comment

केळ्यांचा भाव घसरला; उत्पादकांना मोठा आर्थिक फटका

जळगाव: काही दिवसापूर्वी २ हजाराच्या वर गेलेला केळीचा भाव आता १२०० रूपयांपर्यंत घसरल्यामुळे केळी उत्पादकांना

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण

त्रंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे बाहेरगावहून येणाऱ्या

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,

‘सुखोई’च्या आवाजाने दिडोंरी थरथरली

घरांच्या काचा फुटल्या २५ किमी परिसरात आवाजाचे पडसाद स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण तलाठी, तहसीलदारांकडून

छगन भुजबळांनी दिला ध्वजारोहणाला नकार? हे आहे कारण

नाशिक: १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी झेंडा कोण फडकवणार? यावरून राज्यात वातावरण पेटलेले आहे. नाशिक आणि रायगड या दोन

इगतपुरीच्या रिसोर्टमधील कॉल सेंटरवर CBI चा छापा

अमेरिका, कॅनडासह परदेशी नागरिकांची फसवणूक नाशिक: इगतपुरी येथील रिसोर्टमधून विदेशी नागरिकांना फोन करून