केंद्रीय संस्कृत विद्यापीठातर्फे आजपासून उत्कर्ष महोत्सव

  26

नाशिक : केन्द्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली आणि राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, तिरुपती यांच्या संयुक्त विद्यमाने ८, ९ आणि १० जून रोजी नाशिक मध्ये आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संस्कृत विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ मदनमोहन झा यांनी पत्रकार परिषदेत दिली.


प्रा. निलाभ तिवारी, ब्रह्मदत्त शर्मा, मुकुंद खोचे, स्वागत समितीचे लक्ष्मण सावजी, विश्वास देवकर आदी उपस्थित होते. केन्द्रीय संस्कृत विद्यापीठ संस्कृत भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी कार्य करणारी भारत सरकारची सर्वात मोठी संस्था आहे. त्यांच्या माध्यमातून भारतभर १२ कॅम्पस, शेकडो महाविद्यालये आणि हजारो गुरुकुल पाठशाळा कार्यरत आहेत.


नाशिक कॅम्पस मध्ये आयुर्वेद शिक्षणासाठी प्राथमिक ते उच्चस्तरापर्यंत गुरुकुलाची स्थापना केली जाईल. यासोबतच शास्त्र विषयांसोबत विविध व्यावसायिक प्रशिक्षण, पीजी डिप्लोमा कोर्सेस, नवीन अभ्यासक्रम व बी.ए. सिव्हिल सर्व्हिसेससाठी संस्कृत माध्यमातून मार्गदर्शन दिले जाईल.



महोत्सवाचे कार्यक्रम


८ जून २०२५ (शनिवार)
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे सकाळी १० वाजता "आगामी १० वर्षांची संस्कृत संवर्धन योजना" यावर देशभरातील संस्कृत विद्यापीठांचे कुलगुरू ,प्रतिनिधी चिंतन करतील.


९ जून २०२५ (रविवार)
स्थळ: गुरुदक्षिणा सभागृह, कॉलेज रोड, नाशिक
वेळ: सकाळी १० वाजता – सार्वजनिक उद्घाटन
दुपारी २.३० वाजता "संत संमेलन".


१० जून २०२५ (सोमवार)
स्थळ: गुरुदक्षिणा सभागृह वेळ: सकाळी १० वाजता – कुलगुरू पुरस्कार वितरण व पुस्तक लोकार्पण समारंभ



देशात साडेतीन लाख गुरुकुल करणार


भारतीय संस्कृतीत गुरुकुल पद्धत अवलंबली जात होती. त्या काळात १ लाख ४० हजार गुरुकुले होती. परंतु पुढील काळात ही पद्धत संपुष्टात आली आहे. भारतीय संस्कृतीचा विचार पुढे नेण्यासाठी आता पुन्हा एकदा केंद्रशासन गुरुकुल पद्धतीचा स्वीकार करण्यासाठी सर्वतोपरी कार्य करत आहे. आगामी काळात देशभरात साडेतीन लाख गुरुकुल सुरू करणार असल्याचा असल्याची माहिती तिवारी
यांनी दिली.

Comments
Add Comment

मुंबईला जाण्यासाठी दुहेरी टोलमधून मुक्ती मिळावी

महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांची मागणी नाशिक : मुंबईला जाण्यासाठी दुहेरी टोल द्यावा लागत आहे. या

कळवण तालुक्यातील अवकाळी पंचनाम्यांचा अहवाल सादर

नुकसान भरपाईसाठी लागणार १ कोटी रु. कळवण : वादळी वारे, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कळवण तालुक्यांमधील ९२ गावांमधील

‘मलनिस्सारण’ ची शासनाकडून शहानिशा

प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे नाशिक : गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी सुरुवातीपासूनच चर्चेत असलेल्या

भारताला पहिले तेजस एमके-१ए जूनमध्येच मिळणार

नाशिक : भारतीय हवाई दलाला पहिले स्वदेशी तेजस एमके-१ए लढाऊ विमान जून २०२५ मध्येच मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यात

ड्यूटी संपल्यामुळे वैमानिकाने दिला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमान उडवण्यास नकार!

एकनाथ शिंदे यांचे विमान जळगाव विमानतळावर २० मिनिटे रखडले जळगाव: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जळगाव

कांदा विक्रीचे पैसे थकवल्याने शेतकऱ्यांचा संताप

देवळा : तालुक्यातील खारीफाटा येथील खासगी कृषी मार्केटमधील एका कांदा खरेदीदार व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे लाखो