मुंबईला जाण्यासाठी दुहेरी टोलमधून मुक्ती मिळावी

महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांची मागणी


नाशिक : मुंबईला जाण्यासाठी दुहेरी टोल द्यावा लागत आहे. या दुहेरी टोलमधून एकच टोल घेण्यात यावा किंवा घोटी येथे घेतला जाणारा १४० रुपये टोल २५ रुपये करण्यात यावा. किंवा समृद्धी महामार्गावरील घोटी ते ठाण्यापर्यंतची टोलची रक्कम कमी करण्यात यावी अशी मागणी केंद्रिय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरतर्फे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी केली आहे. सदर पत्राची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आली आहे.


समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे गुरुवार दि. ५ जुन २०२५ रोजी लोकार्पण झाले. इगतपुरी ते आमणे (ठाणे) असा हा ७६ किलोमीटरचा रस्ता आहे. समृध्दी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हे अंतर अवघ्या ८ तासात पार करता येणार आहे. हा मार्ग जेएनपीटी बंदराला जोडला जाईल तसेच नव्याने होणाऱ्या वाढवण बंदराला हि जोडण्याची योजना आहे. यामुळे महाराष्ट्राच्या एकूण अर्थव्यवस्थेला आणि विशेष करून दळणवळण व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.


महाराष्ट्रामध्ये नाशिक हे वेगाने विकसित होणारे असे शहर आहे. समृध्दी महामार्गाने मुंबईला जाणे हे अवघ्या ३ तासात शक्य होणार आहे. नाशिकहून मोठ्या प्रमाणावर नाशवंत कृषीमाल व इतर उत्पादनांची निर्यात होत असते. या महामार्गामुळे कमी वेळात जेएनपीटी बंदराकडे माल वाहतूक होणार आहे. त्यामुळे वेळ आणि खर्चातील मोठी बचत सर्वांसाठी लाभदायक असणार आहे.


सध्या घोटी येथे टोल भरून जुन्या मार्गाने गोंदे ते वडपे पुढे जाता येते. ती टोलची रक्कम प्रवासी वाहनांसाठी १४० रुपये आहे. तर मालवाहतूक वाहनांसाठी ५०० हुन अधिक रक्कम द्यावी लागते. नवीन समृध्दी महामार्गाने गेल्यास टोलची ८० किलोमीटरसाठी २०० रुपये इतकी रक्कम आहे. तसेच मालवाहतूक वाहनांना ५०० रुपयांहून अधिक रक्कम द्यावी लागणार आहे. घोटी टोल नाका ते समृध्दी महामार्ग हे अंतर केवळ ३ -४ किलोमीटर असे आहे. त्यामुळे नाशिकहून समृद्धी मार्गे मुंबई अथवा जेपीटी येथे जायचे असेल तर डबल टोल टॅक्सचा भुर्दंड भरणे हे अन्यायकारक आहे.

Comments
Add Comment

Nashik Mumbai : खड्ड्यांचं टेन्शन खल्लास! फक्त १२० मिनिटांत गाठाल मुंबई; नाशिक ते मुंबई प्रवासासाठी सरकारचा 'सुपर प्लॅन' काय आहे?

नाशिक : नाशिककरांसाठी विकासाची एक नवी पहाट उजाडली असून, मुंबई आणि नाशिकमधील प्रवासाचा वेळ आता निम्म्यावर येणार

Nashik News : सावधान! ५-१० रुपयांची कुल्फी पडेल महागात! नाशिकमध्ये केमिकल वापरून कुल्फी बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

नाशिक : अहिल्यानगरमधील भेसळयुक्त दूध रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर आता नाशिकमध्येही अन्नामध्ये भेसळ

4th Vishwa Marathi Sammelan: कुसुमाग्रजांच्या नाशिकमध्ये रंगणार चौथे विश्व मराठी संमेलन

नाशिक: जेष्ठ कवी कुसुमाग्रज यांचे वास्तव्य राहिलेल्या नाशिक शहरात चौथे विश्व मराठी संमेलन भरवण्यात येणार आहे.

Malegaon Mayor Election 2026 : मोठी बातमी! मालेगावमध्ये महापौरपदाची निवडणूक संपताच धक्कादायक घटना, महापालिकेतील लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन कोसळली अन् थेट...

नाशिक : मालेगावातून एक भयंकर घटना घडली आहे. मालेगावमधील महापालिका इमारतीमध्ये आज एक मोठा अपघात घडला असतानाच

मुंबई, पुण्यानंतर आता नाशिककरही सततच्या वाहतूक कोंडीमुळे होणार हैराण; तब्बल वर्षभर सोसावी लागणार वाहतूक कोंडी

नाशिक : मुंबई पुण्याप्रमाणेच आता नाशिककरांनाही रोजच्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार आहे. एक - दोन महीने

Nashik 400 Crore Cash Robbery : नाशिकमधील ४०० कोटींच्या कथित रोख लुटीने खळबळ, धक्कादायक खुलासा; ‘लूट झालीच नाही’

नाशिक : नाशिकमध्ये २००० रुपयांच्या नोटांनी भरलेला ट्रक लुटल्याच्या कथित घटनेने राज्यात एकच खळबळ उडवून दिली आहे.