कळवण तालुक्यातील अवकाळी पंचनाम्यांचा अहवाल सादर

नुकसान भरपाईसाठी लागणार १ कोटी रु.


कळवण : वादळी वारे, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कळवण तालुक्यांमधील ९२ गावांमधील ९४६ शेतकऱ्यांच्या ३७८.२५ हेक्टरवरील क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. आमदार नितीन पवार यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निर्देशांनुसार महसूल, कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून शासनस्तरावर १ कोटी २ लाख ११ हजार ४१० रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने शासनस्तरावर सादर केला आहे.


एप्रिलपाठोपाठ मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा शेतकऱ्यांना बसला. ६ ते १४ मेदरम्यान तालुक्याच्या ग्रामीण व आदिवासी भागात दाणादाण उडाली. काठरे दिगर, सुपले दिगर, खर्डेदिगर, पुनंदनगर, शिरसमणी, एकलहरे, नाकोडे, बेज, कोसवण, खिराड, मोहपाडा, तिन्हळ खुर्द, सरलेदिगर, मळगाव खुर्द, पिंपळे बु, दरेभणगी, भैताणेदिगर, कोसुर्डे, जामले हतगड, चाफापाडा येथील घरांचे पत्रे, कांदा चाळीचे पत्रे, भिंत पडून घराचे तसेच बैल गोठा, हॉटेल व घरांचे ९८ ठिकाणी नुकसान झाले होते.


महसूल, कृषी विभागाच्या संयुक्त अहवालनुसार फळपिके सोडून कोरडवाहू जिराईत पिकाखालील ३३ टक्क्यांवरील एका शेतकऱ्याचे ०.१० हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले असून, १३६० रुपयांची नुकसानभरपाई अपेक्षित आहे. फळपिके सोडून बागायत वार्षिक फळ पिकाखालील ९१ गावे बाधित झाले असून, ९४५ शेतकऱ्यांचे ३७८.१५ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे.
त्यात कांदा ३२६.५० हेक्टर, गहू ०.५० हेक्टर, २३.४५ हेक्टर बाजरी, ४.८० हेक्टर मिरची, ९.१० हेक्टर टोमॅटो, मका ०.२० हेक्टर, भाजीपाला १३. ६० हेक्टर
नुकसान झाले.



कांद्याचे ३२६ हेक्टर क्षेत्रात नुकसान


अवकाळी पावसामुळे सुमारे ३७८ हेक्टरवरील उभे पीक, भाजीपाला, आंवा, फळ वागा आणि काढणी करून ठेवलेला कांदा, मका यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. यात उन्हाळी कांदा लागवड क्षेत्र २८ हजार ७१६ हेक्टर कांद्याचे क्षेत्र असून, त्यात ३२६.५० हेक्टर क्षेत्रावरील शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे.



उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कळवण दौऱ्यात नुकसानीची माहिती दिली होती. त्यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल शासनस्तरावर पाठविण्याच्या सूचना केल्याने अहवाल सादर झाला आहे.
- नितीन पवार, आमदार

मे महिन्यात अवकाळी पावसामुळे तालुक्यातील ९२ गावांतील ३७८.२५ हेक्टर क्षेत्र बाधित होऊन ९४६ शेतकऱ्याच्या शेतीपिकांचे नुकसान झाले. ९८ ठिकाणी घर व कांदा चाळीचे नुकसान झाले आहे. मदतीसाठी नुकसानीचा अहवाल सादर केला आहे.
- रोहिदास वारुळे, तहसीलदार कळवण

Comments
Add Comment

Nashik Jewellery Shop : नाशिकमध्ये ६ दरोडेखोरांचा ज्वेलर्सवर सिनेस्टाईल हल्ला; कर्मचाऱ्याला बेदम मारहाण, दोन आरोपींना बेड्या

नाशिक : नाशिक शहरात एका अंगावर काटा आणणाऱ्या घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे. शहरातील गजबजलेल्या हिरावाडी (Hirwadi area)

 नाशिक : भोंदूबाबा खरात प्रकरणात उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांचे निलंबन

 भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील निलंबित -१४३ वेळा कॉल आणि आर्थिक गुंतवणुकीचा

Ashok Kharat : खरात प्रकरणातील तेरा हजार आक्षेपार्ह व्हिडिओ डिलीट; 451 सोशल मीडिया खाती कायमस्वरुपी बंद

Ashok Kharat : नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. एसआयटीच्या सायबर टीमने (Cyber Team)

NEET Paper Leak Case : शुभम खैरनारचे कुटुंब नॉट रिचेबल, 'या' मोठ्या कारणामुळे शुभमचा मोठा भाऊही पोलिसांच्या रडारवर

NEET Paper Leak Nashik Connection : नीट पेपर फुटीप्रकरणी आतापर्यंत देशभरात सीबीआयने 6 आरोपींना अटक केली आहे. तर देशभरात अनेक ठिकाणी

Nashik : नाशिक परिक्षेत्रात हायअलर्ट, राज्यात नाशिकसह चाळीस ठिकाणी एटीएसचे छापे, कारण...

Nashik : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने बुधवारी पहाटेपासून नाशिकसह राज्यात गोपनीय पद्धतीने मेगा कोम्बिंग ऑपरेशन

रशियाचा फेरा वाचणार, नौदलाच्या 'या' विमानाची ‘इजेक्शन सीट’ नाशिकमध्येच दुरुस्त होणार

नाशिक : भारतीय नौदलाला मोठा फेरा नाशिकमुळे वाचणार आहे. ओझर येथे एका लढाऊ विमानाच्या यशस्वी दुरुस्ती नंतर भारतीय