कळवण तालुक्यातील अवकाळी पंचनाम्यांचा अहवाल सादर

नुकसान भरपाईसाठी लागणार १ कोटी रु.


कळवण : वादळी वारे, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कळवण तालुक्यांमधील ९२ गावांमधील ९४६ शेतकऱ्यांच्या ३७८.२५ हेक्टरवरील क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. आमदार नितीन पवार यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निर्देशांनुसार महसूल, कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून शासनस्तरावर १ कोटी २ लाख ११ हजार ४१० रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने शासनस्तरावर सादर केला आहे.


एप्रिलपाठोपाठ मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा शेतकऱ्यांना बसला. ६ ते १४ मेदरम्यान तालुक्याच्या ग्रामीण व आदिवासी भागात दाणादाण उडाली. काठरे दिगर, सुपले दिगर, खर्डेदिगर, पुनंदनगर, शिरसमणी, एकलहरे, नाकोडे, बेज, कोसवण, खिराड, मोहपाडा, तिन्हळ खुर्द, सरलेदिगर, मळगाव खुर्द, पिंपळे बु, दरेभणगी, भैताणेदिगर, कोसुर्डे, जामले हतगड, चाफापाडा येथील घरांचे पत्रे, कांदा चाळीचे पत्रे, भिंत पडून घराचे तसेच बैल गोठा, हॉटेल व घरांचे ९८ ठिकाणी नुकसान झाले होते.


महसूल, कृषी विभागाच्या संयुक्त अहवालनुसार फळपिके सोडून कोरडवाहू जिराईत पिकाखालील ३३ टक्क्यांवरील एका शेतकऱ्याचे ०.१० हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले असून, १३६० रुपयांची नुकसानभरपाई अपेक्षित आहे. फळपिके सोडून बागायत वार्षिक फळ पिकाखालील ९१ गावे बाधित झाले असून, ९४५ शेतकऱ्यांचे ३७८.१५ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे.
त्यात कांदा ३२६.५० हेक्टर, गहू ०.५० हेक्टर, २३.४५ हेक्टर बाजरी, ४.८० हेक्टर मिरची, ९.१० हेक्टर टोमॅटो, मका ०.२० हेक्टर, भाजीपाला १३. ६० हेक्टर
नुकसान झाले.



कांद्याचे ३२६ हेक्टर क्षेत्रात नुकसान


अवकाळी पावसामुळे सुमारे ३७८ हेक्टरवरील उभे पीक, भाजीपाला, आंवा, फळ वागा आणि काढणी करून ठेवलेला कांदा, मका यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. यात उन्हाळी कांदा लागवड क्षेत्र २८ हजार ७१६ हेक्टर कांद्याचे क्षेत्र असून, त्यात ३२६.५० हेक्टर क्षेत्रावरील शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे.



उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कळवण दौऱ्यात नुकसानीची माहिती दिली होती. त्यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल शासनस्तरावर पाठविण्याच्या सूचना केल्याने अहवाल सादर झाला आहे.
- नितीन पवार, आमदार

मे महिन्यात अवकाळी पावसामुळे तालुक्यातील ९२ गावांतील ३७८.२५ हेक्टर क्षेत्र बाधित होऊन ९४६ शेतकऱ्याच्या शेतीपिकांचे नुकसान झाले. ९८ ठिकाणी घर व कांदा चाळीचे नुकसान झाले आहे. मदतीसाठी नुकसानीचा अहवाल सादर केला आहे.
- रोहिदास वारुळे, तहसीलदार कळवण

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात नवीन ट्विस्ट ; IAS पाठोपाठ दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा

नाशिक : नाशिकमधील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे एकामागून एक धक्कादायक पदर उलगडू

Ashok Kharat Case : नाशिकच्या बड्या महिला अधिकाऱ्याचे 'खरात कनेक्शन' उघड!

नाशिक : नाशिकमधील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे एकामागून एक धक्कादायक पदर उलगडू

Nashik: 'कुंभमेळा म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचा महोत्सव'

नाशिक: आगामी काळात होणाऱ्या कुंभमेळ्या संदर्भात नाशिकमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीला मंत्री छगन भुजबळ

Nashik Accident : भरधाव कार थेट विहिरीत पडून ९ जणांचा हृदयद्रावक अंत

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. शुक्रवारी (३ एप्रिल) रात्री

Ashok Kharat Case Update: खरात प्रकरणात न्यायालयात काय घडलं?, जाणून घ्या A to Z माहिती

नाशिक: अशोक खरातच्या भोंदूगिरीने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण बाहेर आल्यापासून नवनवे खुलासे

Ashok Kharat Case: अशोक खरात महिलांना कसं भुलवायचा?; तपासात धक्कादायक माहिती समोर

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. अशोक खरात महिलांना टार्गेट करुन