कळवण तालुक्यातील अवकाळी पंचनाम्यांचा अहवाल सादर

नुकसान भरपाईसाठी लागणार १ कोटी रु.


कळवण : वादळी वारे, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कळवण तालुक्यांमधील ९२ गावांमधील ९४६ शेतकऱ्यांच्या ३७८.२५ हेक्टरवरील क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. आमदार नितीन पवार यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निर्देशांनुसार महसूल, कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून शासनस्तरावर १ कोटी २ लाख ११ हजार ४१० रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने शासनस्तरावर सादर केला आहे.


एप्रिलपाठोपाठ मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा शेतकऱ्यांना बसला. ६ ते १४ मेदरम्यान तालुक्याच्या ग्रामीण व आदिवासी भागात दाणादाण उडाली. काठरे दिगर, सुपले दिगर, खर्डेदिगर, पुनंदनगर, शिरसमणी, एकलहरे, नाकोडे, बेज, कोसवण, खिराड, मोहपाडा, तिन्हळ खुर्द, सरलेदिगर, मळगाव खुर्द, पिंपळे बु, दरेभणगी, भैताणेदिगर, कोसुर्डे, जामले हतगड, चाफापाडा येथील घरांचे पत्रे, कांदा चाळीचे पत्रे, भिंत पडून घराचे तसेच बैल गोठा, हॉटेल व घरांचे ९८ ठिकाणी नुकसान झाले होते.


महसूल, कृषी विभागाच्या संयुक्त अहवालनुसार फळपिके सोडून कोरडवाहू जिराईत पिकाखालील ३३ टक्क्यांवरील एका शेतकऱ्याचे ०.१० हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले असून, १३६० रुपयांची नुकसानभरपाई अपेक्षित आहे. फळपिके सोडून बागायत वार्षिक फळ पिकाखालील ९१ गावे बाधित झाले असून, ९४५ शेतकऱ्यांचे ३७८.१५ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे.
त्यात कांदा ३२६.५० हेक्टर, गहू ०.५० हेक्टर, २३.४५ हेक्टर बाजरी, ४.८० हेक्टर मिरची, ९.१० हेक्टर टोमॅटो, मका ०.२० हेक्टर, भाजीपाला १३. ६० हेक्टर
नुकसान झाले.



कांद्याचे ३२६ हेक्टर क्षेत्रात नुकसान


अवकाळी पावसामुळे सुमारे ३७८ हेक्टरवरील उभे पीक, भाजीपाला, आंवा, फळ वागा आणि काढणी करून ठेवलेला कांदा, मका यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. यात उन्हाळी कांदा लागवड क्षेत्र २८ हजार ७१६ हेक्टर कांद्याचे क्षेत्र असून, त्यात ३२६.५० हेक्टर क्षेत्रावरील शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे.



उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कळवण दौऱ्यात नुकसानीची माहिती दिली होती. त्यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल शासनस्तरावर पाठविण्याच्या सूचना केल्याने अहवाल सादर झाला आहे.
- नितीन पवार, आमदार

मे महिन्यात अवकाळी पावसामुळे तालुक्यातील ९२ गावांतील ३७८.२५ हेक्टर क्षेत्र बाधित होऊन ९४६ शेतकऱ्याच्या शेतीपिकांचे नुकसान झाले. ९८ ठिकाणी घर व कांदा चाळीचे नुकसान झाले आहे. मदतीसाठी नुकसानीचा अहवाल सादर केला आहे.
- रोहिदास वारुळे, तहसीलदार कळवण

Comments
Add Comment

जन्मदात्या आईनेच विकले सहा चिमुरडे

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी येथे हादरवणारी घटना नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव

मनमाड-कसारा, कसारा-मुंबई मार्गावर प्रत्येकी दोन नवीन रेल्वे लाईनला केंद्राकडून मंजुरी

तांत्रिक अडथळे दूर होणार; खा. राजाभाऊ वाजे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश नाशिक : नाशिक तसेच उत्तर

सप्तशृंगगड घाटात इनोव्हा कार ७०० फूट दरीत कोसळली; सहाजण ठार

सप्तशृंगगड : नांदुरी ते श्री सप्तशृंगगड घाटरस्त्यावर रविवारी ( दि.७) संध्याकाळी भाविकांची इनोव्हा कार सुमारे ७००

सप्तशृंगी गडाच्या मार्गावर अपघात, दरीत कोसळून सहा जणांचा मृत्यू

नाशिक : सप्तशृंगी गडावरील गणपती घाटात इनोव्हा कार खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. सुमारे १००० ते १२०० फूट खोल

नाशिक जिल्ह्यातील ११ नगर परिषदांसाठी आज होणार मतदान

नगरसेवक पदासाठी १०२८, तर नगराध्यक्षपदासाठी ६१ उमेदवार आखाड्यात नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील ११

कुंभमेळा आरक्षित क्षेत्राचे संपादन न करता कारवाई रद्द करावी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिका विकास आराखड्यानुसार साधूग्राम व संलग्न सुविधांसाठी एकूण सुमारे ३७७ एकर