आरसीबीच्या मार्केटिंग प्रमुखासह चौघांना अटक

बंगळूरु चेंगराचेंगरी प्रकरणी


बंगळूरु: बंगळूरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु(आरसीबी)चे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली.


एफआयआरमध्ये सदोष मनुष्यवधासारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात यापूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळूरुतील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांना जबाबदार धरले होते. त्यामुळे पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. नंतर कर्नाटकचे आयपीएस अधिकारी सीमांत कुमार सिंग यांची बंगळूरुचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.


एफआयआरमध्ये असा दावा करण्यात आला आहे की कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली नव्हती. आरसीबी, डीएनए इव्हेंट मॅनेजमेंट फर्म आणि राज्य क्रिकेट असोसिएशनने आवश्यक परवानगीशिवाय विजय साजरा केला.


आरसीबीने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरनंतर कायदेशीर कारवाईला सहकार्य करेल असे म्हटले आहे. अटक आरोपी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनए नेटवर्क्सशी संबंधित आहेत. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) चे सचिव शंकर आणि कोषाध्यक्ष जयराम यांच्याही घरी पोलिसांनी धडक दिली. मात्र ते घरी नव्हते. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.


निखिल सोसाळे हे विमानाने मुंबईला जाण्याच्या तयारीत होते. त्यांना बंगळूरु विमानतळावर अटक करण्यात आली. त्याची चौकशी सुरू आहे. डीएनएचे इतर ३ कर्मचारी किरण, सुमंत आणि सुनील मॅथ्यू यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि त्यांना क्यूबन पार्क पोलीस ठाण्यात आणले आहे, जिथे त्यांची चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

World Emoji Day : तुमचा आवडता इमोजी तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो? जाणून घ्या!

WhatsApp, Instagram, Facebook किंवा DM... https://prahaar.in/2026/07/16/never-practice-these-8-habits-after-waking-up-in-the-morning-they-could-affect-your-health/ कुठेही Chat करताना आपण वापरत असलेले इमोजी आता

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती