Block Deal News: बजाज फिनसर्व्हने आपले १.८% भागभांडवल ' यांना' विकले एनएसईतील २..३० टक्क्याने शेअर्स तेजीत

प्रतिनिधी: वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार बजाज फिनसर्व्ह कंपनीत एसबीआय मॉर्गन स्टॅनली, गोल्डमन सच या कंपन्यांनी संचयी पद्धतीने १.८ टक्के समभाग (Share) भागभांडवल खरेदी केले आहे. या कंपन्यांनी २.८६ कोटी समभाग म्हणजेच १.८ टक्के समभाग खरेदी केले. या समभागांची बाजार किंमत ५५०६.०७ कोटी रूपयांच्या घरात आहे.

याशिवाय जेपी मॉर्गन, सिटी ग्रुप, सोईटी जनरले (Societe Generale), एसबीआय लाईफ, बोफा सिक्युरिटीज, बार्कले मर्चंट बँक (सिंगापूर) यांनी बजाज फिनसर्व्ह भागभांडवल खरेदी केले आहे. बजाज फिनसर्व्हचे प्रवर्तक (Promoter) बजाज होल्डिंग अँड इनव्हेसमेंट व जमनालाल सन्स यांनी एकत्रितपणे समप्रमाणात आपले समभाग संबंधित कंपन्यांना विकले आहेत. यानंतर बजाज प्रवर्तकांचा भागभांडवल हिस्सा ६०.४० टक्क्यांवरुन ५८.६४ टक्क्यांवर पोहोचला.

फ्रँकलिन टेंपलटन म्युच्युअल फंड, आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड, एचडीएफसी स्टँडर्ड लाईफ इन्शुरन्स, गोल्डमन सच या कंपन्यानी कर्मशिअल व्हेईकल कंट्रोल सिस्टिम या कंपनीचेही भागभांडवल ब्लॉक डील (Block Deal) पद्धतीने विकले आहेत. बजाज फिनसर्व्हचे काल शेअर बाजारात एनएसईवर बजाज फिनसर्व्हचे समभाग २.३० टक्क्यांनी वाढून १,९८८.७० रुपयांवर बंद झाले होते.

या वर्षाच्या सुरुवातीला, बजाज फिनसर्व्हने जमनालाल सन्स आणि बजाज होल्डिंग्जसह, त्यांच्या विमा संयुक्त उपक्रमांमध्ये अलायन्झ एसईचा हिस्सा २.७८ अब्ज डॉलरमध्ये विकत घेतला.आर्थिक वर्ष २५ मध्ये वित्तीय सेवा कंपनीने २१ टक्क्यांनी महसूल वाढ नोंदवली आणि ती १५३८२ कोटी रुपयांवर पोहोचली, तर निव्वळ नफा (Gross Profit) ९ टक्क्यांनी वाढून १०२० कोटी रुपयांवर पोहोचला.
Comments
Add Comment

गुवाहाटीत मध्यरात्री झालेल्या अपघातात अभिनेता आशिष विद्यार्थी आणि पत्नी जखमी

गुवाहाटी: बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी आणि त्यांची पत्नी रुपाली बरुआ हे शुक्रवारी रात्री गुवाहाटीतील झू रोड

अक्षय कुमार आणि राणी मुखर्जी पहिल्यांदाच एकत्र, ‘ओह माय गॉड ३' मध्ये प्रमुख भूमिका

मुंबई: २०२६ मध्ये अभिनेता अक्षय कुमार विविध मोठ्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जॉली

शाहरुख खानच्या या निर्णयामुळे देशभरात वाद; राजकीय आणि सामाजिक संघटनांच्या टोकाच्या प्रतिक्रिया

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एका निर्णयामुळे देशभरातून

KBC १७ सीझनचा प्रवास संपला ,अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यांत पाणी

मुंबई: २००० साली सुरू झालेला ‘कौन बनेगा करोडपती’ हा रिअॅलिटी शो आजही तितकाच लोकप्रिय आहे. गेल्या अनेक वर्षांत या

रिंकू राजगुरूच्या धमकेदार लावणीने वेधल प्रेक्षकांच लक्ष..

मुंबई : सैराट या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी आणि सध्या आशा या चित्रपटून चर्चेत असणारी अशी

दिल्लीकरांसाठी महाराष्ट्र सदनात ग्रामीण संस्कृतीची मेजवाणी

९ ते ११ जानेवारीदरम्यान ‘हुरडा पार्टी’ आणि ‘मकर संक्रांत नवी दिल्ली : दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या ग्रामीण