राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आली, तर खरी क्रांती : शिवगिरी महाराज

संगमनेर : धर्माच्या कार्यासाठी आणि प्रचार व प्रसार करण्यासाठी राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आली तर खरी क्रांती घडते.अशीच क्रांती आयोध्येतील राम मंदिर बांधून रामराज्य आले असल्याचे गौरवोद्गार त्र्यंबकेश्वर येथील पंचदशनाम जुना आखाड्याचे महामंडलेश्वर १००८ स्वामी शिवगिरी महाराज यांनी काढले.


संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील रामेश्वर मंदिराच्या प्रांगणात हरी ओम वृक्षमित्र परिवाराच्यावतीने गेली सात दिवसापासून सुरू असलेल्या शिव पुराण कथेची भक्तिमय वातावरणामध्ये सांगता झाली त्यावेळी भाविक भक्तांना उपदेश करताना १००८ शिवगिरी महाराज बोलत होते यावेळी कोपरगाव येथील जनार्धन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज, नारायणपूर येथील अण्णा महाराज यांचे उत्तर अधिकारी टेंबे स्वामी महाराज आ.खताळ खा.वाकचौरे,माजीमंत्री बाळासाहेब थोरात हरीओम वृक्षमित्र परिवाराचे प्रमुख अविनाश वाकचौरे यांच्यासह इतर सर्वच राजकीय पक्षाचे नेते गण उपस्थित होते.शिवगिरी महाराज म्हणाले की,हिंदू धर्मियांनी आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी पुढाकार घेत हिंदू धर्माची मशाल प्रत्येकाने आपल्या अंतकरणात पेटवून ठेवली पाहिजे;धर्मकार्यामध्ये प्रत्येकाने या शिवपुराण महा कथेचे श्रवण करून आचरणात आणणे गरजेचे आहे.


धार्मिक कार्याचे व्यासपीठ आहे आणि त्याचे पावित्र्य प्रत्येकाने राखले पाहिजे.तुम्हा सर्वांवर भगवंताची कृपा अखंड अशीच राहावी आणि यांच्या हातून तुमच्या हातून या हिंदू धर्माचे कार्य असेच होत राहो साधूसंतांचे आपल्यावर खूप मोठे संस्कार केले आहे.ते संस्कार प्रत्येकाने जोपासणे गरजेचे असल्याचे सांगत ते म्हणाले की पुढील वर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होत आहे या कुंभमेळ्याचा उल्लेख करत, तो प्रयाग राज कुंभापेक्षाही भव्य होणार असल्याची अपेक्षा शिवगिरी महाराज यांनी व्यक्त केली. यावेळी टेंबे स्वामी महाराजांची संगमनेर ते धांदरफळ मोटरसायकल रॅली काढून स्वागत करण्यात आले तसेच संपूर्ण गावातून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली तसेच रामेश्वर मंदिरात त्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. ही शिवपुराण कथा यशस्वी करण्यासाठी हरी ओम वृक्षमित्र परिवाराच्या सर्व भक्तांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments
Add Comment

IRCTC : वाट कसली बघताय बॅगा भरा, आयआरसीटीसीकडून 'दिव्य दक्षिण यात्रा', भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

IRCTC : भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ लिमिटेड (IRCTC), रेल्वे मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कार्यरत असलेल्या

Maharashtra Government : राज्यातील सर्व ११६ दुय्यम कारागृहे कायमस्वरूपी बंद

 राज्य सरकारचा निर्णय; कैद्यांची जिल्हा कारागृहात रवानगी होणार मुंबई : महसूल विभागाच्या नियंत्रणाखाली असलेली

Pune Cyber Crime : पुण्यात सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश: ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली दररोज ४०० जणांची लूट; कॉल सेंटरवर धाड!

पुणे : पुणे शहरात ऑनलाईन गेमिंगच्या (Online Gaming) बहाण्याने सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लावणारे एक मोठे रॅकेट

Crime News : मृतदेहासोबत लग्न करणारी आंचल आता आहे कुठे ?

सक्षम ताटे आणि आंचल मामीडवार यांचं प्रेमप्रकरण आपल्या सर्वांनाच माहिती आहे. प्रेमाचं लग्नात रूपांतर

Ahilyanagar : जिल्हा पोलिस दलात खांदेपालट; 19 पोलिस अधिकार्‍यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या

Ahilyanagar : गेल्या काही दिवसांपासून जिल्हा पोलिस दलात प्रभारी अधिकार्‍यांच्या बदल्यांची चर्चा जिल्ह्यात मोठ्या

Jalgaon News : अनधिकृत विक्रेत्यांचे धाबे दणाणले; 305 जण रंगेहात ताब्यात

Jalgaon News : रेल्वे प्रवास करताना रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ विक्रेते (Food vendors) येत असतात. यातील बऱ्याच जणांकडे परवाना नसतो.