मुंबई: हस्तरेषा शास्त्र हे व्यक्तीच्या हातावरील रेषा पाहून त्याचे भविष्य आणि नशीबाबाबत सांगितले जाते. दरम्यान, एखाद्या व्यक्तीच्या खास लक्षणावरून सांगता येते की त्या व्यक्तीच्या नशिबात किती धन आणि उन्नती आहे हे समजते.
जी व्यक्ती आपली महत्त्वाची कामे तसेच योजना नेहमी गुप्त ठेवतात त्या व्यक्ती निश्चितच आपले ध्येय गाठतात. अशा व्यक्ती जीवनात थोड्या संघर्षानंतर ऐशोआरामात जगतात. त्यांना जीवनात कधीही आर्थिक संकट येत नाही.
जी व्यक्ती आपले खासगी जीवन आणि व्यवहाराबद्दल कोणालाही काही सांगत नाही ती व्यक्ती खूप प्रगती करतात.
अशा लोकांच्या कमकुवत गोष्टी कधीही दुसऱ्यासमोर उघड होत नाहीत. अशा व्यक्ती खूप प्रगती करतात आणि मानसन्मान मिळवतात.
एक बुद्धिमान व्यक्ती कधीही दुसऱ्यांना न मागता सल्ले देत नाही. तर मूर्ख लोक उगाचच दुसऱ्यांना सल्ले देत बसतात. दोघांमधील हे छोटेसे अंतर बुद्धिमान लोकांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते. याच कारणामुळे या व्यक्ती चारचौघामध्ये उठून दिसतात.