पर्वत आणि बोगद्यांमधील अभियांत्रिकीचा चमत्कार, चिनाब पुलामध्ये काय आहे खास पाहा

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच चिनाब पूल देशाला समर्पित केला. यासोबतच दोन वंदे भारत ट्रेनलाही हिरवा झेंडा दाखवला. नंतर पंतप्रधान मोदींनी चिनाब पुलाची पाहणी केली. यानंतर त्यांनी अंजी पुलाचा दौरा करून उद्घाटन केले. पंतप्रधान मोदींनी नंतर कटरा येथे ४६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन केले. पूर्ण झालेले प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले.


नदीपासून ३५९ मीटर उंचीवर वसलेला एक वास्तुशास्त्रीय चमत्कार, चिनाब रेल्वे पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे कमान पूल आहे. हा १,३१५ मीटर लांबीचा स्टील आर्च ब्रिज आहे. हा १,३१५ मीटर लांबीचा स्टील आर्च ब्रिज आहे, जो पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच आहे. हा पूल भूकंप आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करण्यासाठी डिझाइन केला आहे. हा पूल २६० किमी प्रतितास वेगाने येणाऱ्या वाऱ्यात आणि भूकंपांच्या धक्क्यातही स्थिर राहू शकतो. पुलाच्या बांधकामात ३०,००० टन स्टील वापरले आहे. पुलाचा पाया अर्ध्या फुटबॉल मैदानाइतका रुंद आहे. या पुलाचे आयुष्य १२० वर्षे असून त्यावरून ताशी १०० किलोमीटर वेगाने ट्रेन धावू शकते.


चिनाब पूल रिश्टर स्केलवर ८ रिश्टर स्केलपर्यंतचे भूकंप सहन करू शकतो. तो ४० टन टीएनटी इतक्या तीव्रतेच्या स्फोटांनाही तोंड देऊ शकतो. या पुलाचा मोठा परिणाम जम्मू आणि श्रीनगरमधील संपर्क वाढवण्यास होणार आहे. पुलावर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनने, कटरा आणि श्रीनगर दरम्यान प्रवास करण्यासाठी सुमारे ३ तास लागतील, सध्याचा प्रवास वेळ २-३ तासांनी कमी होईल.


उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) प्रकल्पही पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला समर्पित केला. सुमारे ४३,७८० कोटी रुपये खर्चाच्या २७२ किमी लांबीच्या USBRL प्रकल्पात ३६ बोगदे (११९ किमी लांबीचे) आणि ९४३ पूल समाविष्ट आहेत.


https://www.facebook.com/share/r/15N5gQsrJ7/

 

वंदे भारत ट्रेन सेवा


वंदे भारत ट्रेनमध्ये चेअर कारचे भाडे ₹७१५, एक्झिक्युटिव्ह क्लास (EC): ₹१३२० असेल. या ट्रेनमध्ये अँटी-फ्रीझिंग तंत्रज्ञान आहे - शून्यापेक्षा कमी स्थितीत हीटिंग सिस्टम, ३६० अंश फिरणाऱ्या सीट्स, यूएसबी चार्जिंग पॉइंट, शुद्ध शाकाहारी जेवणासह स्थानिक जेवण या सोयी असतील. वंदे भारत ट्रेन सेवा ७ जूनपासून सामान्य प्रवाशांसाठी सुरू होईल. वंदे भारत ट्रेन कटरा ते श्रीनगर दरम्यान दिवसातून चार वेळा धावणार आहे. सध्या त्यांचा एकमेव मुक्काम बनिहालमध्ये असेल. यात चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास अशा दोन्ही श्रेणी असतील आणि प्रवाशांना काही स्थानिक खाद्यपदार्थांसह शाकाहारी जेवण दिले जाईल.


Comments
Add Comment

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या

Monsoon in Andaman 2026 : आला रे आला...अंदमान-निकोबारमध्ये पावसाची हजेरी, केरळ आणि कोकणात कधी धडकणार ?

संपूर्ण देशातील नागरिक आणि विशेषतः शेतकरी राजा ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, तो मान्सून अखेर अंदमानच्या  (Andaman)

Fake News Alert! : अफवांवर विश्वास ठेवू नका! राज्यात 'कॅब' सेवा सुरूच राहणार; 'डीजीआयपीआर'ने सांगितले सत्य!

सध्या सोशल मीडियावर ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) यांसारख्या लोकप्रिय कॅब सेवा महाराष्ट्रात कायमच्या बंद झाल्या