Bangalore Stampede प्रकरणावर विराटने दिली 'ही' प्रतिक्रिया

मुंबई: बंगळुरूत बुधवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा नाहक बळी गेला. या दुर्घटनेवर आरसीबीचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीची प्रतिक्रिया समोर आली आहे. कोहलीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करताना लिहिले की, या घटनेनंतर मी पूर्णपणे कोसळलो आहे आणि माझ्याकडे शब्द नाहीत.



आरसीबीने या दुर्घटनेवर काय म्हटले...


आरसीबीने या घटनेप्रकरणी दुख: व्यक्त करत म्हटले, आज दुपारी संघाच्या प्रतीक्षेत असलेल्या बंगळुरूमध्ये लोकांच्या चेंगराचेंगरीची दुर्घटनेबद्दल ऐकल्यानंतर आम्ही खूप दु:खी आहोत. सर्वांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आरसीबीला याचे खूप दुख: झाले असून मृत कुटुंबियांच्या प्रती आमच्या संवेदना आहेत. परिस्थिती समोर आल्यानंतर आम्ही लगेचच कार्यक्रमात बदल केला आणि स्थानिक प्रशासनाचे मार्गदर्शन आणि सूचनांचे पालन केले. आम्ही आमच्या सर्व समर्थकांना आग्रह करतो की त्यांनी सुरक्षित राहावे.






कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीसाठी क्रिकेट असोसिएशनला जबाबदार ठरवले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना १० लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच जखमींवर मोफत उपचार केले जाणार आहेत.

Comments
Add Comment

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती

गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून

‘ए+’ श्रेणीतून विराट, रोहित, बुमराहला डच्चू?

बीसीसीआयच्या करारात ट्विस्ट : मानधनात कपात होण्याची शक्यता नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर

विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची परीक्षा

नागपुरात आज न्यूझीलंडविरुद्ध पहिली टी-२० लढत ; पांड्या, बुमराह, श्रेयसवर लक्ष नागपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या

कर्णधार सूर्यकुमार यादव गाठणार ‘शतकी’ टप्पा

नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार बुधवारपासून नागपूरच्या विदर्भ

‘गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मालिका गमाविली’

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा सामना