Bangalore Stampede प्रकरणावर विराटने दिली 'ही' प्रतिक्रिया

  62

मुंबई: बंगळुरूत बुधवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा नाहक बळी गेला. या दुर्घटनेवर आरसीबीचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीची प्रतिक्रिया समोर आली आहे. कोहलीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करताना लिहिले की, या घटनेनंतर मी पूर्णपणे कोसळलो आहे आणि माझ्याकडे शब्द नाहीत.



आरसीबीने या दुर्घटनेवर काय म्हटले...


आरसीबीने या घटनेप्रकरणी दुख: व्यक्त करत म्हटले, आज दुपारी संघाच्या प्रतीक्षेत असलेल्या बंगळुरूमध्ये लोकांच्या चेंगराचेंगरीची दुर्घटनेबद्दल ऐकल्यानंतर आम्ही खूप दु:खी आहोत. सर्वांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आरसीबीला याचे खूप दुख: झाले असून मृत कुटुंबियांच्या प्रती आमच्या संवेदना आहेत. परिस्थिती समोर आल्यानंतर आम्ही लगेचच कार्यक्रमात बदल केला आणि स्थानिक प्रशासनाचे मार्गदर्शन आणि सूचनांचे पालन केले. आम्ही आमच्या सर्व समर्थकांना आग्रह करतो की त्यांनी सुरक्षित राहावे.






कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीसाठी क्रिकेट असोसिएशनला जबाबदार ठरवले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना १० लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच जखमींवर मोफत उपचार केले जाणार आहेत.

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल