Nashik Car Accident : नाशिकमध्ये भरधाव कार शिरली थेट बंगल्यात; ५ जणांचा मृत्यू

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील कळवण-नाशिक मार्गावर आज भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणारी कार थेट रस्त्यालगत असलेल्या बंगल्यात घुसल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूर फाट्यावर हा भीषण अपघात घडला. बुधवारी रात्री १० वाजता हा कार अपघात झाला. या अपघातात नामपूर आणि देवळा येथील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू ओढावला. तर २ जण गंभीर जखमी झाले.



चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटले


प्राथमिक माहितीनुसार, नामपूर येथील भदाण कुटुंबियांच्या नातेवाईकाचे नाशिकमध्ये लग्न होते. त्यासाठी भदाण आणि मेतकर कुटुंबिय नाशिकला आले होते. लग्नानंतर हे सर्व जण कारमधून सटाण्याकडे निघाले होते. नाशिक-कळवण महामार्गावर कोल्हापूर फाटा आला तेव्हा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याने कार थेट विठोबा शंकर अहेर यांच्या बंगल्यात घुसवली. ही कार बंगल्यात जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला असून बंगल्याचाही काही भाग कोसळला आहे. बंगल्याबाहेरील असलेला सिमेंट खांब वाकून कार आत घुसली. त्यावरून हा अपघात किती भीषण होता हे समोर येते.



या अपघातामुळे भदाण आणि मेतकर कुटुंबियावर शोककळा पसरली आहे. अपघात घडताच आजूबाजूच्या लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारमधील अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. तर जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आगामी मराठी चित्रपट 'आशा'ची विशेष स्क्रीनिंग! आशा सेविकांचा भरभरून प्रतिसाद

मुंबई: जागतिक कन्या दिनानिमित्त 'आशा' या चित्रपटचे विशेष स्क्रिनिंग आयनॉक्स, नरिमन पॉईंट येथे पार पडले. या विशेष

'मनाचे श्लोक' चित्रपटाबाबत मृण्मयीचा मोठा निर्णय! 'या' तारखेला पुन्हा प्रदर्शित होणार चित्रपट

मुंबई: अभिनेत्री आणि दिग्दर्शक मृण्मयी देशपांडेचा मनाचे श्लोक हा मराठी चित्रपट १० ऑक्टोबर रोजी राज्यभर

संपूर्ण देशातील मतदार याद्यांचे टप्प्याटप्प्याने शुद्धीकरण

देशातील मतदार यादींचे गहन पुनरावलोकन (एसआयआर) लवकरच टप्प्याटप्प्याने सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक

आंध्र प्रदेशात उभारणार आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर

टेक कंपनी गुगल भारताच्या डिजिटल क्षेत्रात आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक करणार आहे. कंपनी आंध्र प्रदेशातील

तुंबाडची ७ वर्षे, सोहम शाह यांनी चित्रपटामागील स्वप्न उलगडले!

मुंबई : जेव्हा तुंबाड (२०१८) प्रदर्शित झाला तेव्हा त्याने सर्व चित्रपट शैलींच्या सीमा तोडून स्वतःसाठी एक वेगळे

कबुतरांसाठी जैन मुनींची राजकारणात उडी

मुंबई  : मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कबुतरखाने बंद केल्यामुळे मृत्यू झालेल्या कबुतरांच्या