Friday, June 6, 2025

मुंबई वगळता अन्यत्र चार सदस्यीय प्रभाग रचना

मुंबई वगळता अन्यत्र चार सदस्यीय प्रभाग रचना

ठाणे: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. मुंबई महापालिका वगळता राज्यातील इतर सर्व महापालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहेत. त्यासाठी मविआ सरकारच्या काळातील तीन सदस्यीय प्रभाग रचना पद्धती रद्द करून महायुती सरकारने पुन्हा चार सदस्यीय प्रभाग रचनेला पसंती दिल्याने पुन्हा प्रभाग रचना होणार आहे.


कोरोना महामारी, ओबीसींचे राजकीय आरक्षण आदी कारणांमुळे राज्यातील २९ महापालिका, २४८ नगरपालिका, २६ जिल्हा परिषदांसह अन्य शेकडो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. सर्व कारभार प्रशासकांच्या हाती आहेत. पाच ते दोन वर्षांपासून निवडणुकाच न झाल्याने सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह नागरिकही त्रासलेले आहेत.

Comments
Add Comment