ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तयार आहे. काही खेळाडू आधीच इंग्लंडमध्ये पोहोचलेत. तर काही खेळाडू लवकरच पोहोचतील. या दौऱ्याची संपूर्ण माहिती देण्यासाठी टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलने गुरूवारी पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान, टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीरने बंगळुरूमध्ये बुधवारी झालेल्या बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली.



बंगळुरू प्रकरणावर काय म्हणाले कोच


बंगळुरू प्रकरणावर जेव्हा कोच गंभीरला विचारले की तुम्ही या दुर्घटनेला कोणाला जबाबदार मानता, यावर गंभीर म्हणाला, कोण जबाबदार आहे हे ठरवणारा मी कोणी नाही. मात्र जेव्हा मी खेळाडू होतो तेव्हा अशा प्रकारच्या रोड शोवर विश्वास ठेवत नव्हतो. आता कोच म्हणूनही माझा याला पाठिंबा नाही. लोकांचे जीवन सगळ्यात महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला गर्दी नियंत्रणात ठेवता येत नसेल तर अशा रोड शोची कोणतीही गरज नाही.


गौतम गंभीर पुढे म्हणाले, मी नेहमीच मानतो की रोड शो नसले पाहिजे. ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तीला गमावले त्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. २००७मध्येही जेव्हा आम्ही जिंकलो होतो तेव्हाही माझे म्हणणे हेच होते. अशा प्रकारचे आयोजन बंद दरवाजाच्या आत असले पाहिजे. तेथे जे काही घडले ते अतिशय दु:खद होते. आम्ही एक खेळाडू, फ्रेंचायझी आणि चाहते म्हणून अधिक जबाबदार असले पाहिजे.


Comments
Add Comment

Italian Open 2026 Jannik Sinner : जॅनिक सिनर ठरला इटालियन ओपनचा विजेता; केली नोव्हाक जोकोविचच्या विक्रमाशी बरोबरी

- जॅनिक सिनर ठरला करिअर गोल्डन मास्टर्स पूर्ण करणारा जगातील दुसरा टेनिसपटू जॅनिक सिनरने इटालियन ओपन २०२६ चे

IPL 2026 DC vs RR : रोमहर्षक लढतीत दिल्लीची राजस्थानवर ५ विकेट्सने मात

नवी दिल्ली : आयपीएल २०२६ च्या प्लेऑफमधील आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी राजस्थान रॉयल्सचा सामना दिल्ली

Hind Kesari : फायनलमध्ये पृथ्वीराज मोहोळचा हात जखमी; महेंद्र गायकवाड ठरला ५२ वा 'हिंद केसरी'!

सातारा : साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडिअमवर पार पडलेल्या ५२ व्या हिंद केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मोठा

Indian Cricket Team : टीम इंडियात फेरबदलाचे संकेत; पंतकडून उपकर्णधारपद काढून घेण्याची शक्यता!

मुंबई : सध्या IPL २०२६ चा थरार अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्लेऑफमध्ये कोणते संघ स्थान मिळवणार याकडे क्रिकेट

Virat Kohli : विराट कोहलीच्या नवव्यांदा ५०० धावा पूर्ण

धरमशाला : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये विराट कोहली याने तगड्या

IPL 2026 : आयपीएल फायनलसाठी मोहसीन नकवी भारतात येणार ? क्रिकेटविश्वात खळबळ, सत्य काय ?

अहमदाबाद : आयपीएल २०२६ चा अंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या