मुंबईत बीकेसीतील सेबी भवनात अजगरांच्या पिलांचा सुळसुळाट

  120

मुंबई : यंदा मान्सूनचे आगमन मे महिन्यातच झाले. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली. यामुळे जशी माणसांची तारांबळ उडाली तसेच प्राण्यांची गैरसोय झाली. पावसापासून रक्षणासाठी प्राणी मिळेल त्या जागी सुरक्षित आसऱ्याच्या शोधात गेले. यातून गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईच्या बीकेसी परिसरात अर्थात वांद्रे कुर्ला संकुलात सेबी भवनात अजगराची पिल्ले आढळली आहेत. सेबी भवनात पाच दिवसांत अजगराची बारा पिल्ले आढळली आहेत.

पावसाळ्याच्या तोंडावर साप सुरक्षित आसरा शोधतात. नैसर्गिक वातावरणात सुरक्षित ठिकाणी राहणे साप पसंत करतात. पण पावसाचे आगमन मे महिन्यात झाले आणि गडबडलेले सरपटणारे प्राणी वाट फुटेल त्या दिशेने पुढे जात मिळेल त्या जागी आसरा घेऊ लागले आहेत. यातून गोंधळाची स्थितीत निर्माण झाली आहे.

सेबी भवनाच्या आवारात आतापर्यंत अजगराची बारा पिल्ले आढळली आहेत. यापैकी एका पिल्लाचा नकळत वाहनाखाली आल्यामुळे मृत्यू झाला. उर्वरित पिल्लांना रेस्क्यू टीमने मिठी नदीच्या पात्रातील खारफुटीच्या जंगलात सोडले.

 
Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही