Uddhav Thackeray and Raj Thackeray alliance : ठाकरे बंधूंच्या युतीवर अमित ठाकरेच मोठं भाष्य; म्हणाला, "दोन्ही भाऊ एकत्र आले तर..."

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यामध्ये युती होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेसोबतच्या युतीबाबत सकारात्मकता दर्शवली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी दोन्ही पक्षाचे नेते परदेशी दौऱ्यावर गेले आणि या युतीच्या चर्चा थंडावल्या होत्या. मात्र, आता मनसेने पर्यावरण दिनानिमित्त दादर-माहिम विधानसभा मतदार संघात खिळेमुक्त वृक्ष अभियान राबवलं आहे. या अभियानात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी सहभाग घेतला होता. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना अमित ठाकरेंनी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेना युतीवरही भाष्य केलं आहे. "दोन भावांनी बोललं पाहिजे. त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात" अशी प्रतिक्रिया दिली आहे.




काय म्हणाले अमित ठाकरे?


मनसे शिवसेना युतीबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अमित ठाकरे म्हणाले, "माझी भूमिका एवढीच आहे की, दोन्ही भाऊ एकत्र आले तर मला काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याची (राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे) यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. दोघांकडे एकमेकांचा नंबर आहे. आम्ही बोलून काही फरक पडणार नाही. दोन भावांनी एकत्र यावे हे त्यांनी ठरवावे. राज ठाकरे यांची इच्छा असेल ती माझी इच्छा. पुढाकार कोणी घ्यावा हे त्यांनी ठरवावं, आम्ही बोलून काही उपयोग नाही, असंही पुढे अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.




पुढे अमित ठाकरे म्हणाले, या घडामोडीकडे मी लक्ष देत नाही. पण, राज ठाकरे आणि उद्धवजी बोलले तर होईल. आम्ही खालची लोक बोलून अर्थ नाही, आम्ही याआधी संवाद साधला आहे, आता दोघांकडे एकमेकांचा फोन नंबर आहे त्यांनी बोललं पाहिजे. आम्ही २०१४-१७ मध्ये प्रस्ताव दिला होता, तेव्हा काय झाले शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही थांबलो होतो. आता त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे तर पुढे यायला हवं. आम्हाला एकत्र येण्यावर काहीही इशू नाही, असंही पुढे अमित ठाकरे म्हणालेत.




"झाडं लावली पाहिजेत"


"आपण झाडांमुळे जिवंत आहोत. एका माणसासाठी आपल्याला ४ झाडं पाहिजेत असा निसर्गाचा नियम आहे. पण इकडे एका झाडामागे ५ माणसं श्वास घेत आहेत. लोकांना याचं महत्व कळत नाही. आपण जेव्हा खिळा मारतो, तेव्हा झाडांनाही त्रास होतो. झाडं लावली पाहिजेत, ती वाचवली पाहिजेत, जगवली पाहिजेत" असं देखील अमित ठाकरे यांनी पर्यावरण दिनानिमित्त म्हटलं आहे.

Comments
Add Comment

Rajnath Singh : पाकिस्तानविरुद्ध दीर्घ लढ्यास भारत तयार – राजनाथ सिंह

नवी दिल्ली : भारताने ऑपरेशन सिंदूर हे आपल्या अटींवर स्वेच्छेने थांबवले होते आणि गरज पडल्यास पाकिस्तान विरुद्ध

Women's T20 World Cup : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; अशी केली जाणार निवड

मुंबई : २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा १२ जून ते ५ जुलै

Summer Special Trains : प्रवाशांच्या मागणीमुळे LTT वरून खास, मुंबई – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

मुंबई : प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी

Bank Of Baroda : बँक ऑफ बडोदाच्या संपर्क केंद्रात भारतीय सांकेतिक भाषा सहाय्य सेवेची सुरुवात

मुंबई : भारताची आंतरराष्ट्रीय बँक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ बडोदाने (बँक) आपल्या संपर्क केंद्रात व्हिडीओ

Kalyan and Badlapur Power Blocks : कल्याण – बदलापूर दरम्यान ३री व ४थी लाईनवर उद्या आणि परवा विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स

मुंबई : कल्याण – बदलापूर दरम्यान ३री व ४थी लाईनवरील ओएचई (OHE) कामासाठी अप व डाउन दक्षिण-पूर्व मार्गावर दिनांक

Missing link : मिसिंग लिंकची गिनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद; जगातला सर्वात रुंद बोगदा म्हणून रेकॉर्ड केला नावावर

मुंबई : भारतीय इंजिनिअरींगचा अदभूत चमत्कार असलेला आणि मुंबई पुणे अंतर कमी करणारा सर्वात महत्वाच्या पुलाची आता