सेल्फी घेताना धरणात बुडाला मुलगा, धक्क्याने वडिलांचाही अंत; सिंधुदुर्ग हादरला!

  50

सावंतवाडी : एकीकडे धरणावर फिरायला गेलेला १९ वर्षांचा युवक सेल्फी घेताना पाण्यात बुडाला. तर दुसरीकडे मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच वडिलांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचाही मृत्यू झाला. ही काळीज पिळवटून टाकणारी दुहेरी शोकांतिका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारिवडे-पेडवेवाडी येथे घडली.


क्रिश सावियो संभया (वय १९) हा युवक आपल्या मित्रांसोबत मंगळवारी धरणावर गेला होता. सेल्फी घेताना तोल जाऊन तो धरणाच्या पाण्यात पडला. मित्रांनी गावकऱ्यांना माहिती दिल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. रात्री ११ वाजता क्रिशचा मृतदेह पाण्यावर आढळून आला.



मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच वडील सावियो आग्नेल संभया (वय ४८) यांना तीव्र मानसिक धक्का बसला. मंगळवारपासूनच ते धक्क्यात होते. बुधवारी पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण उपचार सुरू असतानाच दुपारी १२ वाजता त्यांचे निधन झाले.


एका दिवसात मुलगा आणि त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्याने संभया कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. क्रिश नुकताच बारावी उत्तीर्ण झाला होता आणि पुढील शिक्षणासाठी तयारी करत होता. पण नियतीने त्याचे स्वप्न अधुरेच ठेवले.


ही घटना संपूर्ण कोकणात हळहळ व्यक्त करणारी ठरत आहे."एका सेल्फीने एक कुटुंब उद्ध्वस्त झालं", अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांमध्ये ऐकायला मिळत आहे.

Comments
Add Comment

Astrology: ज्या लोकांच्या नशीबात असतो खूप पैसा, त्यांच्यामध्ये दिसतात ही लक्षणे

मुंबई: हस्तरेषा शास्त्र हे व्यक्तीच्या हातावरील रेषा पाहून त्याचे भविष्य आणि नशीबाबाबत सांगितले जाते. दरम्यान,

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन

ठाणे : ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि व्याख्याते दाजी पणशीकर यांचे शुक्रवार, ६ जून रोजी संध्याकाळी ठाण्यातील राहत्या

घोडबंदर मार्गावर वाहतुकीत बदल

मेट्रो प्रकल्पाच्या खांबावर गर्डर टाकण्याचे काम हाती ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरू

नीट पीजी परीक्षा ३ ऑगस्टला

नवी दिल्ली : पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात नीट पीजी परीक्षेची

आणखी एका गर्दीने घेतले नाहक जीव! मरण खरंच स्वस्त झालंय का?

मुंबई : आपल्या देशात कोणत्याही सण, उत्सव, सेलिब्रेशनसाठी होणारी गर्दी आणि त्यात जाणारे बळी हे नेहमीचंच झालंय.

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.