सेल्फी घेताना धरणात बुडाला मुलगा, धक्क्याने वडिलांचाही अंत; सिंधुदुर्ग हादरला!

  83

सावंतवाडी : एकीकडे धरणावर फिरायला गेलेला १९ वर्षांचा युवक सेल्फी घेताना पाण्यात बुडाला. तर दुसरीकडे मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच वडिलांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचाही मृत्यू झाला. ही काळीज पिळवटून टाकणारी दुहेरी शोकांतिका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारिवडे-पेडवेवाडी येथे घडली.


क्रिश सावियो संभया (वय १९) हा युवक आपल्या मित्रांसोबत मंगळवारी धरणावर गेला होता. सेल्फी घेताना तोल जाऊन तो धरणाच्या पाण्यात पडला. मित्रांनी गावकऱ्यांना माहिती दिल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. रात्री ११ वाजता क्रिशचा मृतदेह पाण्यावर आढळून आला.



मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच वडील सावियो आग्नेल संभया (वय ४८) यांना तीव्र मानसिक धक्का बसला. मंगळवारपासूनच ते धक्क्यात होते. बुधवारी पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण उपचार सुरू असतानाच दुपारी १२ वाजता त्यांचे निधन झाले.


एका दिवसात मुलगा आणि त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्याने संभया कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. क्रिश नुकताच बारावी उत्तीर्ण झाला होता आणि पुढील शिक्षणासाठी तयारी करत होता. पण नियतीने त्याचे स्वप्न अधुरेच ठेवले.


ही घटना संपूर्ण कोकणात हळहळ व्यक्त करणारी ठरत आहे."एका सेल्फीने एक कुटुंब उद्ध्वस्त झालं", अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांमध्ये ऐकायला मिळत आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या