स्तुती: जीवन संगीत

सद्गुरू वामनराव पै


आपल्या जीवनांत परमेश्वराचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. तो आहे म्हणून सर्व चाललेले आहे. तो नाही तर काही नाही ही वस्तुस्थिती आहे. तो दिसत नसला तरी सर्व चाललेले आहे ते त्याच्यामुळे चाललेले आहे. विद्युत ऊर्जा दिसत नसली तरी सर्व चाललेले आहे ते विद्युत शक्तीमुळेच, ती नाही तर सर्व बंद. विद्युत शक्ती, गुरुत्वाकर्षण शक्तीपेक्षा परमेश्वर अनंत पटीने मोठा आहे. इतका तो मोठा असून सुद्धा माझ्यामुळे जग चाललेले आहे असे तो कधीच म्हणत नाही. ज्ञानेश्वरीत सुंदर सांगितलेले आहे,



“आकाशे सर्वत्र वसावे वायूने क्षणभरी उगे नसावे, पावके दहन करावे ही आज्ञा माझी’’


आकाशाने सर्वत्र वसावे. वायूने कधीही थांबू नये, वाहत राहावे. अग्नीने दहन करावे, पृथ्वीने भूमात्रांना धरून ठेवावे ही त्याची आज्ञा आहे. आज्ञा माझी म्हणजे काय? सत्ता माझी. सत्ता म्हणजे काय? सत्ता म्हणजे शक्ती, सत्ता म्हणजे असणे. सत्य, सातत्य असणे म्हणजे सत्. ही सत्ता म्हणजे त्याच्या केवळ अस्तित्वामुळे हे सर्व चाललेले आहे. त्याच्या सत्तेने सर्व चाललेले असते पण तो कधीच कुणाला येऊन सांगत नाही की हे मी केले तुम्ही त्याला काहीही केले तरी तो तुमच्या स्तुतीला भाळत नाही. स्तोत्र म्हटले की तो खूश ही तुमची कल्पना आहे. लोक स्तोत्र म्हणतात कारण त्यांना देव प्रसन्न होईल असे वाटते. ते खरे नाही, कारण असा देव प्रसन्न होत नाही. खरेतर तुम्ही देवाची प्रार्थना करता, विश्वप्रार्थना म्हणता, स्तोत्र म्हणता म्हणजे काय करता? देव म्हणजे काय? हे माहीत नसेल तर त्या स्तोत्राला काहीच अर्थ नाही. देव म्हणजे काय हे आधी कळले पाहिजे. “आधी देवासी ओळखावे, मग तयाचे भजन करावे.’’ आधी हा शब्द महत्त्वाचा आहे. देवाची ओळख नाही, देवाला कधी पाहिलेले नाही. स्तोत्र म्हणणे चांगलेच, ते वाईट नाही. स्तोत्र म्हणत असताना देवाबद्दल काही माहीत नसेल तर त्या स्तुतीला अर्थ काय? खरा देव कसा आहे हे समजून ते केले पाहिजे. खोटी स्तुती व खरी स्तुती यात फरक आहे. एखादा खरेच चांगले गाणे म्हणत असताना त्याची स्तुती केली तर ती खरी स्तुती पण केवळ त्याला बरे वाटावे म्हणून स्तुती करतो ती खोटी स्तुती. खरी स्तुती व खोटी स्तुती यांत फरक काय? देवाची ओळख झाल्यावर देवाची स्तुती करतो तेव्हा ती देवाला जास्त आवडते. देवाची स्तुती का करायची? देव असा आहे की त्याची स्तुती किती करावी? त्याचे कौतुक किती करावे? त्याच्याबद्दल किती बोलावे? याला काहीही मर्यादा नाहीत. प्रत्यक्षात देव हा आहेच तसा हे मला सांगायचे आहे.


 
Comments
Add Comment

कोजागिरी पौर्णिमा आज! दूध चंद्रप्रकाशात कधी ठेवाल? जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

मुंबई: हिंदू धर्मात अश्विन महिन्यातील पौर्णिमेला 'कोजागिरी पौर्णिमा' किंवा 'शरद पौर्णिमा' म्हणून विशेष महत्त्व

कधी आहे संकष्टी चतुर्थी? जाणून घ्या गणेशाच्या बारा अवतारांचे महत्त्व

हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. भगवान

Horoscope: दसऱ्याला बनतोय गुरू-बुध शक्तीशाली योग, या राशींना होणार लाभ

मुंबई: केंद्र योग आणि गुरु-बुध युतीमुळे मेष, कर्क, आणि धनु या राशींना १ ऑक्टोबर २०२५ च्या आसपास मोठा आर्थिक आणि

Navratri Ashtami kanya pujan 2025 : मुलींच्या पूजनाने पूर्ण होतील सर्व मनोकामना! महाअष्टमीला कन्या पूजनाचा विधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

नवरात्रोत्सव हा हिंदू धर्मातील शक्ती उपासनेचा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव आहे. या नऊ दिवसांमध्ये,

दसऱ्यानंतर ‘या’ राशींचे नशीब चमकणार! होणार धनलाभ आणि प्रगती

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशी परिवर्तन (गोचर) मानवी जीवनावर मोठा परिणाम करतात. लवकरच बुध ग्रह आपली

Navratri 2025 : नवरात्रीत कांदा आणि लसूण खाणं पाप? यावर प्रेमानंद महाराज काय म्हणाले?

शारदीय नवरात्र उत्सवाला २२ सप्टेंबरपासून भव्य सुरुवात झाली आहे. देशभरातील श्रद्धालूंनी या नऊ दिवसांच्या