स्तुती: जीवन संगीत

सद्गुरू वामनराव पै


आपल्या जीवनांत परमेश्वराचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. तो आहे म्हणून सर्व चाललेले आहे. तो नाही तर काही नाही ही वस्तुस्थिती आहे. तो दिसत नसला तरी सर्व चाललेले आहे ते त्याच्यामुळे चाललेले आहे. विद्युत ऊर्जा दिसत नसली तरी सर्व चाललेले आहे ते विद्युत शक्तीमुळेच, ती नाही तर सर्व बंद. विद्युत शक्ती, गुरुत्वाकर्षण शक्तीपेक्षा परमेश्वर अनंत पटीने मोठा आहे. इतका तो मोठा असून सुद्धा माझ्यामुळे जग चाललेले आहे असे तो कधीच म्हणत नाही. ज्ञानेश्वरीत सुंदर सांगितलेले आहे,



“आकाशे सर्वत्र वसावे वायूने क्षणभरी उगे नसावे, पावके दहन करावे ही आज्ञा माझी’’


आकाशाने सर्वत्र वसावे. वायूने कधीही थांबू नये, वाहत राहावे. अग्नीने दहन करावे, पृथ्वीने भूमात्रांना धरून ठेवावे ही त्याची आज्ञा आहे. आज्ञा माझी म्हणजे काय? सत्ता माझी. सत्ता म्हणजे काय? सत्ता म्हणजे शक्ती, सत्ता म्हणजे असणे. सत्य, सातत्य असणे म्हणजे सत्. ही सत्ता म्हणजे त्याच्या केवळ अस्तित्वामुळे हे सर्व चाललेले आहे. त्याच्या सत्तेने सर्व चाललेले असते पण तो कधीच कुणाला येऊन सांगत नाही की हे मी केले तुम्ही त्याला काहीही केले तरी तो तुमच्या स्तुतीला भाळत नाही. स्तोत्र म्हटले की तो खूश ही तुमची कल्पना आहे. लोक स्तोत्र म्हणतात कारण त्यांना देव प्रसन्न होईल असे वाटते. ते खरे नाही, कारण असा देव प्रसन्न होत नाही. खरेतर तुम्ही देवाची प्रार्थना करता, विश्वप्रार्थना म्हणता, स्तोत्र म्हणता म्हणजे काय करता? देव म्हणजे काय? हे माहीत नसेल तर त्या स्तोत्राला काहीच अर्थ नाही. देव म्हणजे काय हे आधी कळले पाहिजे. “आधी देवासी ओळखावे, मग तयाचे भजन करावे.’’ आधी हा शब्द महत्त्वाचा आहे. देवाची ओळख नाही, देवाला कधी पाहिलेले नाही. स्तोत्र म्हणणे चांगलेच, ते वाईट नाही. स्तोत्र म्हणत असताना देवाबद्दल काही माहीत नसेल तर त्या स्तुतीला अर्थ काय? खरा देव कसा आहे हे समजून ते केले पाहिजे. खोटी स्तुती व खरी स्तुती यात फरक आहे. एखादा खरेच चांगले गाणे म्हणत असताना त्याची स्तुती केली तर ती खरी स्तुती पण केवळ त्याला बरे वाटावे म्हणून स्तुती करतो ती खोटी स्तुती. खरी स्तुती व खोटी स्तुती यांत फरक काय? देवाची ओळख झाल्यावर देवाची स्तुती करतो तेव्हा ती देवाला जास्त आवडते. देवाची स्तुती का करायची? देव असा आहे की त्याची स्तुती किती करावी? त्याचे कौतुक किती करावे? त्याच्याबद्दल किती बोलावे? याला काहीही मर्यादा नाहीत. प्रत्यक्षात देव हा आहेच तसा हे मला सांगायचे आहे.


 
Comments
Add Comment

कधी आहे नृसिंह द्वादशी ? त्या दिवशी नेमके काय करावे ?

भगवान विष्णूचा चौथा अवतार म्हणजेच भगवान नृसिंह यांची द्वादशी ही यंदा शुक्रवार २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी दहा

संत कबीर

पंडित होय के आसन मारे पंडित होय के आसन मारे, लंबी माला जपत है। अंतर तेरे कपट करतनी, सो भी साहब लिखता है ।। - डॉ.

महर्षी याज्ञवल्क्य 

भारतीय ऋषी वैशंपायनांच्या आश्रमातून सांजसमयी बाहेर पडलेले याज्ञवल्क्य पूर्ण रात्रभर चालतच होते. अरुणोदयाच्या

सत्संग : अंतर्मुखतेकडून आत्मोन्नतीकडे

प्राची परचुरे वैद्य मानवी जीवन हे केवळ भौतिक गरजांच्या पूर्ततेपुरते मर्यादित नसून ते विचार, मूल्ये, भावना आणि

तृतीयपंथियांचा आक्रोश

ऋतुराज ऋतुजा राजेश केळकर अचानक एक बाळाचा आक्रोश हवेत पसरला आणि सगळे थरारले. तिसऱ्या मजल्यावरील बंद घरातून तो

आत्मबोधाचा शाश्वत आनंद

अर्चना सरोदे मातेच्या गर्भात असताना जीवाला स्वस्वरूपाची जाणीव असते . पण गर्भामध्ये “ सोहं सोहं ” करणारा हा जीव