स्तुती: जीवन संगीत

सद्गुरू वामनराव पै


आपल्या जीवनांत परमेश्वराचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. तो आहे म्हणून सर्व चाललेले आहे. तो नाही तर काही नाही ही वस्तुस्थिती आहे. तो दिसत नसला तरी सर्व चाललेले आहे ते त्याच्यामुळे चाललेले आहे. विद्युत ऊर्जा दिसत नसली तरी सर्व चाललेले आहे ते विद्युत शक्तीमुळेच, ती नाही तर सर्व बंद. विद्युत शक्ती, गुरुत्वाकर्षण शक्तीपेक्षा परमेश्वर अनंत पटीने मोठा आहे. इतका तो मोठा असून सुद्धा माझ्यामुळे जग चाललेले आहे असे तो कधीच म्हणत नाही. ज्ञानेश्वरीत सुंदर सांगितलेले आहे,



“आकाशे सर्वत्र वसावे वायूने क्षणभरी उगे नसावे, पावके दहन करावे ही आज्ञा माझी’’


आकाशाने सर्वत्र वसावे. वायूने कधीही थांबू नये, वाहत राहावे. अग्नीने दहन करावे, पृथ्वीने भूमात्रांना धरून ठेवावे ही त्याची आज्ञा आहे. आज्ञा माझी म्हणजे काय? सत्ता माझी. सत्ता म्हणजे काय? सत्ता म्हणजे शक्ती, सत्ता म्हणजे असणे. सत्य, सातत्य असणे म्हणजे सत्. ही सत्ता म्हणजे त्याच्या केवळ अस्तित्वामुळे हे सर्व चाललेले आहे. त्याच्या सत्तेने सर्व चाललेले असते पण तो कधीच कुणाला येऊन सांगत नाही की हे मी केले तुम्ही त्याला काहीही केले तरी तो तुमच्या स्तुतीला भाळत नाही. स्तोत्र म्हटले की तो खूश ही तुमची कल्पना आहे. लोक स्तोत्र म्हणतात कारण त्यांना देव प्रसन्न होईल असे वाटते. ते खरे नाही, कारण असा देव प्रसन्न होत नाही. खरेतर तुम्ही देवाची प्रार्थना करता, विश्वप्रार्थना म्हणता, स्तोत्र म्हणता म्हणजे काय करता? देव म्हणजे काय? हे माहीत नसेल तर त्या स्तोत्राला काहीच अर्थ नाही. देव म्हणजे काय हे आधी कळले पाहिजे. “आधी देवासी ओळखावे, मग तयाचे भजन करावे.’’ आधी हा शब्द महत्त्वाचा आहे. देवाची ओळख नाही, देवाला कधी पाहिलेले नाही. स्तोत्र म्हणणे चांगलेच, ते वाईट नाही. स्तोत्र म्हणत असताना देवाबद्दल काही माहीत नसेल तर त्या स्तुतीला अर्थ काय? खरा देव कसा आहे हे समजून ते केले पाहिजे. खोटी स्तुती व खरी स्तुती यात फरक आहे. एखादा खरेच चांगले गाणे म्हणत असताना त्याची स्तुती केली तर ती खरी स्तुती पण केवळ त्याला बरे वाटावे म्हणून स्तुती करतो ती खोटी स्तुती. खरी स्तुती व खोटी स्तुती यांत फरक काय? देवाची ओळख झाल्यावर देवाची स्तुती करतो तेव्हा ती देवाला जास्त आवडते. देवाची स्तुती का करायची? देव असा आहे की त्याची स्तुती किती करावी? त्याचे कौतुक किती करावे? त्याच्याबद्दल किती बोलावे? याला काहीही मर्यादा नाहीत. प्रत्यक्षात देव हा आहेच तसा हे मला सांगायचे आहे.


 
Comments
Add Comment

Tips: पूजेच्या वेळी या नियमांचे पालन केल्यास नशीब बदलेल आणि मिळेल लक्ष्मीचा आशीर्वाद

मुंबई: हिंदू धर्मात पूजा-पाठ करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. दररोज पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते

Vastu Tips : या वनस्पती घराच्या दारात ठेवणे टाळा, वास्तुशास्त्रानुसार ठरू शकतात अशुभ

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव असतो.

तुळस आणि मनी प्लांट: एकाच ठिकाणी ठेवणे योग्य आहे का?

मुंबई : हिंदू धर्मात तुळस आणि फेंग शुईमध्ये मनी प्लांट या दोन्ही वनस्पतींना विशेष महत्त्व आहे. तुळशीला 'पवित्र'

Horoscope: कन्या राशीत सूर्य गोचर: ‘या’ तीन राशींसाठी धन, यश आणि सन्मानाचा योग!

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य ग्रह १७ सप्टेंबर २०२५ रोजी आपली राशी बदलून कन्या

Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा या गोष्टी, होईल पैशांचा वर्षाव

मुंबई: घराची उत्तर दिशा 'या' वस्तूंनी सजवल्यास होईल धनलाभ वास्तुशास्त्रानुसार, घराची उत्तर दिशा ही धन आणि

Navratri 2025 : यंदा नवरात्र ९ दिवसांची नव्हे तर १० दिवसांची! जाणून घ्या खास कारण

दरवर्षी शारदीय नवरात्र भक्तिपूर्ण वातावरणात साजरी केली जाते. संपूर्ण नऊ दिवस भक्त दुर्गा देवीचे उपास करतात,