वसईतील पारंपरिक व्यवसाय संकटात!

वसई : वसईचा परिसर हा पारंपरिक व्यवसायात अग्रेसर असा परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरातील स्थानिक भूमिपुत्रांनी विविध पारंपरिक व्यवसाय नावारूपाला आणले आहेत. मात्र सध्याच्या बदलत्या काळाच्या ओघात हेच व्यवसाय अडचणीत सापडत आहेत अशी स्थिती निर्माण झाली आहे.


वसईच्या प्रत्येक पारंपारिक व्यवसायाने विविध स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यात विशेषतः मीठ उत्पादनाचा ही मोठा वाटा आहे.


वसईच्या भागात वनराशी मिठागर, आगरवती सलाम, नवामुख, हिरागर, शेणखई, गुरुप्रसाद, जुना वचक अशी वसई तालुक्यात ३० ते ३५ मिठागरे होती. या मिठागरातून पिकवलेले मीठ हे मुंबई, गुजरात, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, पंढरपूर अशा ठिकाणी विक्रीसाठी जात असते. मागील काही वर्षापासून मिठागर उत्पादकांना विविध प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागत आहे. खाड्यांच्या वाढत्या प्रदूषणाने पाण्यातील मिठासाठी आवश्यक असलेला खारटपणा नष्ट केला. यंदाही मीठ उत्पादकांना आपला व्यवसाय हंगाम पूर्ण होण्याआधीच गुंडाळावा लागला.


विशेषतः मे महिन्यातील उष्णतेत निम्म्याहून अधिक उत्पादन घेतले जाते. यावर्षी मान्सूनपूर्व दाखल झालेल्या पावसाने मीठ उत्पादकांचे मोठे नुकसान केले आहे. सातत्याने अशा नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याने हळूहळू मीठ उत्पादन ही बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तशीच काहीशी स्थिती मत्स्यव्यवसायाची सुद्धा झाली आहे. तसेच मत्स्य व्यवसाय क्षेत्रात आता व्यापारी वर्गाने घुसखोरी केली आहे. काही जण पर्ससीन जाळी, एलईडी दिवे यांचा वापर करून मासेमारी करतात. त्यामुळे पारंपरिक मासेमारी करणाऱ्या मच्छीमार यांच्यावर याचा परिणाम होत आहे.


अनिर्बंध होत असलेल्या मासेमारीमुळे मत्स्य साठे धोक्यात आले आहेत. तर दुसरीकडे आजही किनारपट्टीवर मासळी सुकवून त्यातून रोजगार मिळविणारे बांधव मोठ्या संख्येने आहे. त्यांनाही विविध प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्याचप्रमाणे वीटभट्टी या पारंपारिक व्यवसायाचीही काही वेगळी स्थिती नाही. मागील काही वर्षांपासून वीट उत्पादनात क्षेत्रातही अनेक समस्या उद्भवू लागल्या आहे. वाढत्या नागरीकरणामुळे वीट तयार करण्यासाठी आवश्यक माती शिल्लक नाही. तर दुसरीकडे काँक्रिटकरणापासून तयार केलेल्या सुप्रीम ब्लॉक वीट आल्याने मातीच्या विटा घेण्याचे प्रमाण ही कमी होत आहे. त्यातच जे वीट उत्पादक विटा तयार करतात त्यांना ही अधूनमधून पडणाऱ्या पावसाचा फटका बसत आहे. यावर्षी ही या वीट उत्पादकांना पावसाने चांगलाच फटका दिला आहे.

Comments
Add Comment

Vasai : रुळावर उभा राहून ट्रेन अडवण्याचा प्रयत्न? वसई-नालासोपारा दरम्यान लोकल थांबली प्रवशांना सुटला घाम!

पालघर: वसई-नालासोपारा रेल्वे स्थानकांदरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावर बुधवारी एक धक्कादायक घटना घडली. एका

Flood Relief Maharashtra : पालघर, वसई-विरार पूरग्रस्तांना राज्य सरकारची विशेष मदत; घरांसाठी 1.5 लाख, कुटुंबाला 10 हजार रुपये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय; पूरग्रस्त, शेतकरी, मच्छीमार, दुकानदार आणि

Nalasopara News : नागेला तलाव पुन्हा ठरला जीवघेणा! 18 वर्षीय तरुणाचा बळी, सुरक्षेअभावी नागरिक आक्रमक

नालासोपारा : नालासोपारा पूर्व भागातील नागेला तलावात (Nagela Lake) बुडून १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक

Palghar : अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या पालघरची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी केली पाहणी

पालघर : पालघर जिल्ह्यात २२ ते २४ जुलै २०२६ या कालावधीत झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे सार्वजनिक रस्ते, पूल आणि

Palghar Rain : मुंबई-गुजरात रेल्वे सेवेवर पावसाचा मोठा परिणाम; वंदे भारत, शताब्दीसह अनेक गाड्या रद्द

पालघर : पालघर जिल्हा आणि गुजरातमधील वलसाड (Valsad) परिसरात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) जोर सलग दुसऱ्या दिवशीही कायम आहे.

Palghar Rain : पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा; पालघर, डहाणू, तलासरीतील शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी

पालघर : भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department - IMD) पालघर जिल्ह्यासाठी २३ जुलै रोजी 'रेड अलर्ट' (Red Alert) आणि २४ जुलैसाठी