वसईतील पारंपरिक व्यवसाय संकटात!

वसई : वसईचा परिसर हा पारंपरिक व्यवसायात अग्रेसर असा परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरातील स्थानिक भूमिपुत्रांनी विविध पारंपरिक व्यवसाय नावारूपाला आणले आहेत. मात्र सध्याच्या बदलत्या काळाच्या ओघात हेच व्यवसाय अडचणीत सापडत आहेत अशी स्थिती निर्माण झाली आहे.


वसईच्या प्रत्येक पारंपारिक व्यवसायाने विविध स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यात विशेषतः मीठ उत्पादनाचा ही मोठा वाटा आहे.


वसईच्या भागात वनराशी मिठागर, आगरवती सलाम, नवामुख, हिरागर, शेणखई, गुरुप्रसाद, जुना वचक अशी वसई तालुक्यात ३० ते ३५ मिठागरे होती. या मिठागरातून पिकवलेले मीठ हे मुंबई, गुजरात, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, पंढरपूर अशा ठिकाणी विक्रीसाठी जात असते. मागील काही वर्षापासून मिठागर उत्पादकांना विविध प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागत आहे. खाड्यांच्या वाढत्या प्रदूषणाने पाण्यातील मिठासाठी आवश्यक असलेला खारटपणा नष्ट केला. यंदाही मीठ उत्पादकांना आपला व्यवसाय हंगाम पूर्ण होण्याआधीच गुंडाळावा लागला.


विशेषतः मे महिन्यातील उष्णतेत निम्म्याहून अधिक उत्पादन घेतले जाते. यावर्षी मान्सूनपूर्व दाखल झालेल्या पावसाने मीठ उत्पादकांचे मोठे नुकसान केले आहे. सातत्याने अशा नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याने हळूहळू मीठ उत्पादन ही बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तशीच काहीशी स्थिती मत्स्यव्यवसायाची सुद्धा झाली आहे. तसेच मत्स्य व्यवसाय क्षेत्रात आता व्यापारी वर्गाने घुसखोरी केली आहे. काही जण पर्ससीन जाळी, एलईडी दिवे यांचा वापर करून मासेमारी करतात. त्यामुळे पारंपरिक मासेमारी करणाऱ्या मच्छीमार यांच्यावर याचा परिणाम होत आहे.


अनिर्बंध होत असलेल्या मासेमारीमुळे मत्स्य साठे धोक्यात आले आहेत. तर दुसरीकडे आजही किनारपट्टीवर मासळी सुकवून त्यातून रोजगार मिळविणारे बांधव मोठ्या संख्येने आहे. त्यांनाही विविध प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्याचप्रमाणे वीटभट्टी या पारंपारिक व्यवसायाचीही काही वेगळी स्थिती नाही. मागील काही वर्षांपासून वीट उत्पादनात क्षेत्रातही अनेक समस्या उद्भवू लागल्या आहे. वाढत्या नागरीकरणामुळे वीट तयार करण्यासाठी आवश्यक माती शिल्लक नाही. तर दुसरीकडे काँक्रिटकरणापासून तयार केलेल्या सुप्रीम ब्लॉक वीट आल्याने मातीच्या विटा घेण्याचे प्रमाण ही कमी होत आहे. त्यातच जे वीट उत्पादक विटा तयार करतात त्यांना ही अधूनमधून पडणाऱ्या पावसाचा फटका बसत आहे. यावर्षी ही या वीट उत्पादकांना पावसाने चांगलाच फटका दिला आहे.

Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक