मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांच्या हट्टामुळे चेंगराचेंगरी झाल्याचा विरोधकांचा आरोप

बंगळुरू : तब्बल अठरा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल जिंकली. या निमित्ताने बंगळुरूत आयोजित विजयी मिरवणूक चेंगराचेंगरी झाल्यामुळे रद्द करण्यात आली आहे. बंगळुरूत चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेट नंबर ३ जवळ झालेल्या चेंगराचेंगरीत दहा पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची विजयी मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. चेंगराचेंगरी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हट्टामुळे झाल्याचा आरोप त्यांच्या राजकीय विरोधकांकडून होत आहे.



आधी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये क्रिकेटपटूंचा सत्कार करायचा असे नियोजन करण्यात आले होते. पण राजकीय लाभासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी क्रिकेटपटूंचा पहिला सत्कार बंगळुरूत विधानसौद अर्थात विधान भवनाच्या आवारात करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानुसार क्रिकेटपटूंचा विधानसौद अर्थात विधान भवनाच्या आवारात सत्कार झाला. यानंतर क्रिकेटपटू चिन्नास्वामी स्टेडियमच्या दिशेने रवाना झाले. अनेक क्रिकेटप्रेमी विराट कोहली आणि त्याच्या सहकाऱ्यांना बघण्यास उत्सुक होते. विधानसौद अर्थात विधान भवनाच्या आवारातून क्रिकेटपटू चिन्नास्वामी स्टेडियमच्या दिशेने निघाल्याचे समजताच अनेकांनी रस्त्यावर जमेल तिथे जागा पटकावून क्रिकेटपटूंची एक झलक बघण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी चिन्नास्वामी स्टेडियमच्या दिशेने धाव घेतली. स्टेडियममध्ये प्रवेश करतेवेळी क्रिकेटपटूंना बघण्यासाठी मोक्याच्या जागेवर उभे राहण्याकरिता नागरिक धावपळ करू लागले. यातून धक्काबुक्की सुरू झाली. गर्दीला आवरणे कठीण आहे याचा अंदाज येताच पोलिसांनी आधी सौम्य लाठीमार केला. पण परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे पाहून पोलिसांना मोठ्या प्रमाणात लाठीमार करावा लागला. यानंतर चेंगराचेंगरी झाली आणि दहापेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला, अनेकजण जखमी झाले.
Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या