मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांच्या हट्टामुळे चेंगराचेंगरी झाल्याचा विरोधकांचा आरोप

बंगळुरू : तब्बल अठरा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल जिंकली. या निमित्ताने बंगळुरूत आयोजित विजयी मिरवणूक चेंगराचेंगरी झाल्यामुळे रद्द करण्यात आली आहे. बंगळुरूत चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेट नंबर ३ जवळ झालेल्या चेंगराचेंगरीत दहा पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची विजयी मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. चेंगराचेंगरी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हट्टामुळे झाल्याचा आरोप त्यांच्या राजकीय विरोधकांकडून होत आहे.



आधी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये क्रिकेटपटूंचा सत्कार करायचा असे नियोजन करण्यात आले होते. पण राजकीय लाभासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी क्रिकेटपटूंचा पहिला सत्कार बंगळुरूत विधानसौद अर्थात विधान भवनाच्या आवारात करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानुसार क्रिकेटपटूंचा विधानसौद अर्थात विधान भवनाच्या आवारात सत्कार झाला. यानंतर क्रिकेटपटू चिन्नास्वामी स्टेडियमच्या दिशेने रवाना झाले. अनेक क्रिकेटप्रेमी विराट कोहली आणि त्याच्या सहकाऱ्यांना बघण्यास उत्सुक होते. विधानसौद अर्थात विधान भवनाच्या आवारातून क्रिकेटपटू चिन्नास्वामी स्टेडियमच्या दिशेने निघाल्याचे समजताच अनेकांनी रस्त्यावर जमेल तिथे जागा पटकावून क्रिकेटपटूंची एक झलक बघण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी चिन्नास्वामी स्टेडियमच्या दिशेने धाव घेतली. स्टेडियममध्ये प्रवेश करतेवेळी क्रिकेटपटूंना बघण्यासाठी मोक्याच्या जागेवर उभे राहण्याकरिता नागरिक धावपळ करू लागले. यातून धक्काबुक्की सुरू झाली. गर्दीला आवरणे कठीण आहे याचा अंदाज येताच पोलिसांनी आधी सौम्य लाठीमार केला. पण परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे पाहून पोलिसांना मोठ्या प्रमाणात लाठीमार करावा लागला. यानंतर चेंगराचेंगरी झाली आणि दहापेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला, अनेकजण जखमी झाले.
Comments
Add Comment

प्रवाशांना विमान रद्दीकरणाची पूर्ण परतफेड मिळणार! इंडिगोचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेक-इन प्रणालीत

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा