मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांच्या हट्टामुळे चेंगराचेंगरी झाल्याचा विरोधकांचा आरोप

बंगळुरू : तब्बल अठरा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल जिंकली. या निमित्ताने बंगळुरूत आयोजित विजयी मिरवणूक चेंगराचेंगरी झाल्यामुळे रद्द करण्यात आली आहे. बंगळुरूत चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेट नंबर ३ जवळ झालेल्या चेंगराचेंगरीत दहा पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची विजयी मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. चेंगराचेंगरी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हट्टामुळे झाल्याचा आरोप त्यांच्या राजकीय विरोधकांकडून होत आहे.



आधी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये क्रिकेटपटूंचा सत्कार करायचा असे नियोजन करण्यात आले होते. पण राजकीय लाभासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी क्रिकेटपटूंचा पहिला सत्कार बंगळुरूत विधानसौद अर्थात विधान भवनाच्या आवारात करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानुसार क्रिकेटपटूंचा विधानसौद अर्थात विधान भवनाच्या आवारात सत्कार झाला. यानंतर क्रिकेटपटू चिन्नास्वामी स्टेडियमच्या दिशेने रवाना झाले. अनेक क्रिकेटप्रेमी विराट कोहली आणि त्याच्या सहकाऱ्यांना बघण्यास उत्सुक होते. विधानसौद अर्थात विधान भवनाच्या आवारातून क्रिकेटपटू चिन्नास्वामी स्टेडियमच्या दिशेने निघाल्याचे समजताच अनेकांनी रस्त्यावर जमेल तिथे जागा पटकावून क्रिकेटपटूंची एक झलक बघण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी चिन्नास्वामी स्टेडियमच्या दिशेने धाव घेतली. स्टेडियममध्ये प्रवेश करतेवेळी क्रिकेटपटूंना बघण्यासाठी मोक्याच्या जागेवर उभे राहण्याकरिता नागरिक धावपळ करू लागले. यातून धक्काबुक्की सुरू झाली. गर्दीला आवरणे कठीण आहे याचा अंदाज येताच पोलिसांनी आधी सौम्य लाठीमार केला. पण परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे पाहून पोलिसांना मोठ्या प्रमाणात लाठीमार करावा लागला. यानंतर चेंगराचेंगरी झाली आणि दहापेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला, अनेकजण जखमी झाले.
Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे