RCB vs PBKS: ना कोहली, ना हेझलवूड, कृणाल पांड्या ठरला आरसीबीचा खरा हिरो

मुंबई: १८ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आरसीबीच्या चाहत्यांच्या पदरी विजेतेपदाचा आनंद आला. आरसीबीने आयपीएलच्या फायनलमध्ये पंजाब किंग्सला ६ धावांनी हरवत आयपीएलचे जेतेपद मिळवले. या सामन्यात आरसीबीच्या विजयाचा स्टार ठरला कृणाल पांड्या. त्याने आपल्या ड्रीम स्पेलने संपूर्ण सामन्याचे चित्रच बदलले.


या सामन्यात बंगळुरूने पहिल्यांदा फलंदाजी करताना १९० धावा केल्या मात्र ही धावसंख्या तितकी मजबूत नव्हती. विराट कोहलीने ३५ बॉलमध्ये ४३ धावांची खेळी केली. तर फिल साल्टने १८, मयांक अग्रवालने २४, रजत पाटीदारने २६ आणि लियाम लिव्हिंगस्टोनने २५ धावा केल्या मात्र मोठी धावसंख्या करू शकले नाहीत.


पंजाबने १९१ धावांचा पाठलाग करताना चांगली सुरूवात केली आणि पावरप्लेमध्ये ५२ धावा केल्या.मात्र यानंतर आरसीबीने सामना पलटवला. शशांक सिंहने ३० बॉलवर ६१ धावांची तडाखेबंद खेळी केली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. दरम्यान, शशांकने शेवटच्या षटकांतील पहिल्या फुलटॉस बॉलला हिट केले असते निकाल कदाचित पंजाबच्या बाजूने झुकला असता.



कृणाल ठरला हिरो


या सामन्यात कृणाल पांड्याने ४ षटकांत १७ धावा देत २ विकेट मिळवल्या. त्याच्या गोलंदाजीमुळे आरसीबी सामन्यात परतली. आर्य बाद झाल्यानंतर कृणालचा स्पेल सुरू झाला. कृणालला सातव्या षटकात बॉल दिला गेला. त्याने पहिल्या षटकात ३ धावाच दिल्या. त्यानंतर पुढच्या षटकांत १५ धावा निघाल्या.त्यानंतरच्या षटकात कृणालने ४ धावा दिल्या आणि प्रभसिमरनला बाद करत पंजाबला दुसरा झटका दिला. रोमारियो शेफर्डने पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरला बाद केले. त्यानंतर कृणालने तिसरी ओव्हर टाकली. यात त्याने ७ धावा दिल्या. चौथ्या ओव्हरसाठीही कृणालला आणण्यात आले. यावेळी त्याने जोश इंग्लिसला बाद करत पंजाबविरुद्ध सामन्याचे चित्रच बदलले.

Comments
Add Comment

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत

U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक