देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
'या' दिवसापासून सुरू होणार संसदेचे पावसाळी अधिवेशन
June 4, 2025 03:16 PM
नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार २१ जुलै ते मंगळवार १२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत होणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली. अधिवेशनाच्या काळात संसदेच्या दोन्ही सभागृहात देशातील विविध विषयांवर चर्चा होणार आहे. अधिवेशनातील कामकाजाची सुरुवात सोमवार २१ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय कामकाज समितीने पावसाळी अधिवेशनाच्या तारखा निश्चित केल्या आहेत.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २६ नागरिकांची हत्या केली होती. पर्यटकांना ठार करण्यात आले होते. या घटनेनंतर काही दिवसांनी भारताने ऑपरेशन सिंदूर केले आणि पाकिस्तानला दणका दिला होता. ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने निवडक देशांमध्ये राजकीय शिष्टमंडळे पाठवून देशाची दहशतवाद विरोधी भूमिका जाहीररित्या मांडली होती. शिष्टमंडळांमध्ये सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांतील अनेक नेते सहभागी करुन घेतले होते. या सर्वच शिष्टमंडळांनी भारताची बाजू प्रभावीरित्या जगापुढे मांडली आहे. या पार्श्वभूमीवर संसदेचे पावसाळी अधिवेशन होत आहे.
देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
February 26, 2026 08:44 PM
नवी दिल्ली : विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता विमान प्रवाशांना प्रवासी बुकिंगच्या ४८ तासांच्या
देशताज्या घडामोडी
February 26, 2026 12:07 PM
स्वातंत्र्यसैनिक आणि तामिळनाडूमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आर. नल्लाकन्नू यांचे
देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
February 26, 2026 11:35 AM
- हा बहुमान मिळणारे ठरले पहिले भारतीय पंतप्रधान
तेल अवीव : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार २५ फेब्रुवारी रोजी
देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
February 26, 2026 11:08 AM
ओडिशा : भ्रष्टाचाराविरोधातील कारवायांमध्ये ओडिशा राज्यात मोठी धडक कारवाई समोर आली आहे. ओडिशा दक्षता विभागाने
देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
February 26, 2026 10:21 AM
नवी दिल्ली : कर वजावटीत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट दावे रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर
देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
February 26, 2026 07:22 AM
नवी दिल्ली: देशातील लाखो नोकरदारांसाठी श्रम मंत्रालयाने 'EPFO 3.0' ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू केली