IPL चॅम्पियन बनलेल्या RCBवर पैशांचा पाऊस, पंजाब किंग्सलाही मिळाले कोट्यावधी रूपये

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या १८व्या हंगामाचा खिताब रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकला. ३ जूनला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगलेल्या फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सला ६ धावांनी हरवले. आरसीबी पहिल्यांदाच चॅम्पियन बनली आहे तर दुसरीकडे मात्र पंजाब किंग्सला पहिल्यावहिल्या खिताबाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.


आयपीएल २०२५ नंतर अवॉर्ड सेरेमनी झाला. यात चॅम्पियन आणि रनर अप संघांवर पैशांचा पाऊस झाला. याशिवाय स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार देण्यात आले. विजेता संघ आरसीबीला २० कोटी रूपये मिळाले. तर रनर अप पंजाब किंग्सला १२.५० कोटी रूपये मिळाले.



आयपीएल टॉप ४ बक्षीसे


विजेता संघ(आरसीबी) - २० कोटी रूपये
उपविजेता संघ(पंजाब किंग्स) - १२.५० कोटी रूपये
तिसरा संघ (मुंबई इंडियन्स)- ७ कोटी रूपये
चौथ्या नंबरचा संघ(गुजरात टायटन्स) - ६.५ कोटी रूपये


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पंजाब किंग्स आणि आरसीबी हे संघ आमने सामने होते. या सामन्यात आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी करताना १९० धावा केल्या होत्या. पंजाबसमोर विजयासाठी १९१ धावांचे आव्हान होते. मात्र पंजाबला केवळ १८४ इतक्याच धावा करता आल्या. आरसीबीच्या विजयानंतर विराटच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. या खिताबासाठी त्याला तब्बल १७ वर्षे वाट पाहावी लागली होती. पहिल्या पर्वापासून विराट कोहली आरसीबी संघासोबत आहे. त्याने अनेक हंगाम या संघाचे नेतृत्वही केले. मात्र अद्याप त्याला ट्रॉफी जिंकता आली नव्हती. तब्बल १७ वर्षांनी विराटला ही संधी मिळाली.

Comments
Add Comment

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत

U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक