IPL चॅम्पियन बनलेल्या RCBवर पैशांचा पाऊस, पंजाब किंग्सलाही मिळाले कोट्यावधी रूपये

  109

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या १८व्या हंगामाचा खिताब रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकला. ३ जूनला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगलेल्या फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सला ६ धावांनी हरवले. आरसीबी पहिल्यांदाच चॅम्पियन बनली आहे तर दुसरीकडे मात्र पंजाब किंग्सला पहिल्यावहिल्या खिताबाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.


आयपीएल २०२५ नंतर अवॉर्ड सेरेमनी झाला. यात चॅम्पियन आणि रनर अप संघांवर पैशांचा पाऊस झाला. याशिवाय स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार देण्यात आले. विजेता संघ आरसीबीला २० कोटी रूपये मिळाले. तर रनर अप पंजाब किंग्सला १२.५० कोटी रूपये मिळाले.



आयपीएल टॉप ४ बक्षीसे


विजेता संघ(आरसीबी) - २० कोटी रूपये
उपविजेता संघ(पंजाब किंग्स) - १२.५० कोटी रूपये
तिसरा संघ (मुंबई इंडियन्स)- ७ कोटी रूपये
चौथ्या नंबरचा संघ(गुजरात टायटन्स) - ६.५ कोटी रूपये


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पंजाब किंग्स आणि आरसीबी हे संघ आमने सामने होते. या सामन्यात आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी करताना १९० धावा केल्या होत्या. पंजाबसमोर विजयासाठी १९१ धावांचे आव्हान होते. मात्र पंजाबला केवळ १८४ इतक्याच धावा करता आल्या. आरसीबीच्या विजयानंतर विराटच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. या खिताबासाठी त्याला तब्बल १७ वर्षे वाट पाहावी लागली होती. पहिल्या पर्वापासून विराट कोहली आरसीबी संघासोबत आहे. त्याने अनेक हंगाम या संघाचे नेतृत्वही केले. मात्र अद्याप त्याला ट्रॉफी जिंकता आली नव्हती. तब्बल १७ वर्षांनी विराटला ही संधी मिळाली.

Comments
Add Comment

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल

IND vs ENG : भारताच्या गोलंदाजांचा भेदक मारा, इंग्लंडचा पहिला डाव २४७ धावांवर संपुष्टात

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर

IND vs ENG: ज्यो रूट आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यात मैदानातच जोरदार बाचाबाची!

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यातील आज दुसऱ्या दिवशीओव्हल क्रिकेट मैदानावर एक मोठा

केनिंग्टन ओव्हल कसोटीत भारताचा पहिला डाव 'एवढ्या' धावांत आटोपला

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये

दुखापतीमुळे ख्रिस वोक्स पाचव्या कसोटीतून बाहेर

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये

आयुष्याला थकलो होतो, आत्महत्या करावीशी वाटत होती...धनश्रीसोबत घटस्फोटावर युझवेंद्र चहलचे विधान

मुंबई: भारताचा क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या वर्षी मार्चमध्ये घटस्फोट झाला होता. आता चहलने धनश्री