आमदार सुलभा गायकवाड यांचे मुख्यमंत्र्यांकडे साकडे

केडीएमसी क्षेत्रातील कचरा संकलन शुल्कात केलेली वाढ रद्द करा


कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मालमत्ता करात कचरा संकलन करण्यासाठी आकारण्यात आलेल्या शुल्कात तब्बल ३०० रुपयांची केलेली वाढ रद्द करण्याची मागणी कल्याण पूर्व मतदार संघाच्या भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.


कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मालमत्ता करात घनकचरा व्यवस्थापन शुल्क जे ६०० रुपये होते, त्यात ३०० रुपये वाढ करून ९०० रुपये केलेले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील कचरा उचलणे व त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेची असून त्यासाठी महानगरपालिकेने प्रथम योग्य अशी यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. महानगरपालिका क्षेत्रात अजूनही जागोजागी कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात ठीग साचलेले नेहमी दिसून येत आहेत.


राज्यातील इतर महानगरपालिकेच्या तुलनेत फक्त कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये मालमत्ता कर जास्त प्रमाणात आकारला जातो, त्याच्या तुलनेत नागरिकांना कोणत्याही मुलभूत सुविधा मिळत नाहीत.


कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील नागरिकांवर अन्यायकारक रित्या लादलेल्या करामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये महानगरपालिका प्रशासना विरोधात तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे व याचा उद्रेक केव्हाही होऊ शकतो. तरी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मालमत्ता करात कचरा संकलन करण्यासाठी आकारण्यात आलेल्या शुल्कात तब्बल ३००/- ची केलेली वाढ रद्द करण्याबाबत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनास प्राधान्याने आदेश देण्याची मागणी भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


Comments
Add Comment

Eknath Shinde : 'कच्छी समाजाशी नातं हे कुटुंबासारखंच'; ठाण्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : कच्छी अस्मिता मंचतर्फे आयोजित 'कच्छी पगडी कोणशिरे' या गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कच्छी

Thane Crime : क्लिनिंगसाठी आलेल्या महिलेने चोरले ३.५ लाखांचे मंगळसूत्र; ठाणे पोलिसांनी तासाभरात परत मिळवले

ठाणे पोलिसांची कामगिरी, अवघ्या एका तासात मिळवले चोरी झालेले दागिने  ठाणे  : ठाण्यातील (Thane) राबोडी पोलिसांनी जलद

Kalyan Dombivli Rain Update : कल्याण-डोंबिवलीत पावसाची दाणादाण : नाले ओव्हरफ्लो, घरांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची मोठी तारांबळ

कल्याण : कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात दाणादाण उडाली असून जनजीवन

Dombivli News : मुसळधार पावसात डोंबिवलीत नागरिक हैराण; पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत, चोरट्यांच्या टोळीची दहशत

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain)

Thane Crime : निर्दयीपणाचा कळस; साडेतीन वर्षांच्या मुलाला गरम उलथण्याने दिले चटके

Thane News : ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्पासाठी कासारवडवलीत वाहतूक बदल; ६ जुलै ते ५ ऑगस्टपर्यंत मार्ग बंद

ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) महत्त्वाकांक्षी ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या