'शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये'

पालघर :भारतीय हवामान विभागाने प्रसारित केलेल्या विस्तारित श्रेणी हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात पुढील एक आठवडा सरासरी पेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने प्रसारित केलेल्या विस्तारित श्रेणी हवामान अंदाजानुसार दिनांक ०५ ते १२ जून दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात हलका पावसाचे संकेत असताना पावसाची आकडेवारी सरासरीपेक्षा कमी असेल, त्यानंतर आणि १३ ते १९ जून नंतर सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याबरोबरच पुढील दोन आठवडे किमान तापमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहील व कमाल तापमान ०५ ते १२ जून दरम्यान सरासरी पेक्षा कमी व १३ ते १९ जून दरम्यान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. अशी माहिती कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा कृषी हवामान केंद्र, कोसबाड हिल येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ रिझवाना सय्यद यांनी दिली.


त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यात मॉन्सूनने प्रवेश केला नाही व १३ ते १२ जूननंतर पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने त्यागोदर फळपिके भाजीपाला व इतर खरीप पिकांच्या शेतातील मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावीत व खरीप हंगामासाठी बियाणे, सेंद्रिय खते आणि रासायनिक खते उपलब्ध करून ठेवावी.
कोरडवाहू जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी अद्याप भात पेरणीची घाई करू नये. असा सल्ला कृषी विज्ञान केंद्र कोसबाडचे वरिष्ठ शास्त्रज्ञ
डॉ. विलास जाधव यांच्याकडून देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

विरारमध्ये आणखी २ प्लॅटफॉर्मवरून धावणार १५ डब्यांच्या लोकल

चार महिन्यांत प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम पूर्ण विरार : पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे

Vasai - Virar Crime : वसई–विरारमध्ये मृतदेह सापडण्यांची मालिका सुरूच; १५ दिवसांत ६ घटना, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वसई-विरार : वसई-विरार आणि नालासोपारा परिसरात गेल्या काही दिवसांपासून अज्ञात मृतदेह सापडण्याच्या घटनांनी गंभीर

Viral Video : सफाळेत एसटी चालकाने युनिफॉर्म काढून थोपटले दंड; प्रवाशाला दिलं खुलं आव्हान, बस डेपोत जोरदार राडा

पालघर : एसटी बसमधील प्रवाशांचे वाद नवे नाहीत, मात्र पालघरमधील सफाळे बस आगारात चक्क एक एसटी चालकच प्रवाशाशी

प्रभाग समितीच्या रचनेत ‘बविआ’ची बाजी

नियमांच्या गणितात केवळ एक समिती भाजपकडे  विरार : वसई-विरार पालिका क्षेत्रात नऊ प्रभाग समित्यांची रचना

वनजमिनीच्या तांत्रिक पेचात अडकली आदिवासींची घरे

विवेक पंडित यांनी मंत्रालयाचे वेधले लक्ष वसई  : राज्यातील बेघर आदिवासी, विशेषतः आदिम कातकरी समाजाच्या गावठाण

तारापूर औद्योगिक वसाहतीत वायू गळती

बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या भघेरिया केमिकल्समध्ये (जुने नाव : झेनित