जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मंत्रालयात बसवणार कापडी पिशवी विकणारी वेंडिंग मशीन

राज्याच्या पर्यावरण विभागाद्वारे मंत्रालयात येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रात्यक्षिक


मुंबई: दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day 2025) साजरा केला जातो. सध्या वाढत्या प्लास्टीकच्या वापरामुळे होत असलेले प्रदूषण लक्षात घेता, प्लास्टीक बंद करण्याच्या हेतूने सरकारने पाऊले उचलली आहेत. त्यामुळे राज्यातील महायुती सरकारने बुधवारी जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला सिंगल यूज प्लास्टिक मोहिमेला गती देण्यासाठी मंत्रालयात कापडी पिशवी विकणारी वेंडिंग मशीन बसवण्याची योजना आखली आहे.


या मोहिमेचा भाग म्हणून मंत्रालयातील सर्व विभागांना त्यांच्या कार्यालयात सिंगल यूज प्लास्टिक वस्तू एकत्र करून जमा करण्यास सांगण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे.


राज्याचा पर्यावरण विभाग दररोज मंत्रालयात येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रात्यक्षिक म्हणून गुरुवारी मंत्रालयात कापडी पिशवी विकणारी वेंडिंग मशीन बसवण्याची योजना आखत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.



मंत्रालयात सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तू जमा करण्याचे आदेश


मंगळवारी एक आदेश जारी करून सर्व विभागांना मंत्रालयातील त्रिमूर्ती येथील त्यांच्या कार्यालयात सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तू जमा करण्यास सांगितलंय. खरं तर केंद्रातील मोदी सरकारने 2018 ला देशभरात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली होती. याअंतर्गत प्लास्टिकपासून बनवलेल्या अनेक वस्तू मिळणे बंद झाले होते. या बंदीमध्ये दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींचाही समावेश होता. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने त्या वस्तूंची यादी जाहीर केली होती, ज्यावर बंदी घालण्यात आलीय.



सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे काय?


सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे प्लास्टिकपासून बनवलेल्या अशा वस्तू, ज्याचा आपण एकदाच वापर करू शकतो किंवा फेकून देऊ शकतो आणि ज्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील