भाईंदरमध्ये मंगळसूत्र चोरण्यासाठी महिलेवर रासायनिक हल्ला

भाईंदर : ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथे धक्कादायक घटना घडली. मंगळसूत्र चोरण्यासाठी ३५ वर्षांच्या महिलेवर रासायनिक हल्ला करण्यात आला. अज्ञात चोराने हा हल्ला केला. ही घटना रात्री ८.४५ वाजता श्री बालाजी मंडप डेकोरेटर्स जवळच असलेल्या एका मॉलजवळ घडली. महिलेवर रासायनिक हल्ला केल्यानंतर चोर घटनास्थळावरुन फरार झाला.

रासायनिक हल्ल्यात जखमी झालेली महिला भाईंदर पश्चिमेच्या नेहरू नगरमध्ये राहते. घटना घडली त्यावेळी ती नातलगांसोबत पाणीपुरी खात होती. महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, साधारण सहा फूट उंचीच्या बारीक बांधा असलेल्या व्यक्तीने डोळ्यांवर रसायन फेकले. यामुळे डोळ्यांची आग होऊ लागली. थोडा वेळ काहीच दिसत नव्हते. याच काळात चोराने वेगाने मंगळसूत्र खेचले आणि घटनास्थळावरुन पलायन केले. चोरट्याने केलेल्या रासायनिक हल्ल्यामुळे महिलेसोबत असलेल्या तिच्या नातलगांनाही थोडा वेळा डोळ्यांची आग होणे आणि तात्पुरते अंधत्व येणे हा त्रास झाला.

चोरण्यात आलेले मंगळसूत्र १४ वर्ष जुने होते. त्याची सध्याची बाजारातील किंमत ६४ हजार रुपये आहे.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासून चोर पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे.
Comments
Add Comment

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

संजय कपूरची ३० हजार कोटींची मालमत्ता कोणाला मिळणार ? न्यायालयासमोर आलेल्या याचिकेमुळे येणार नवा ट्विस्ट ?

नवी दिल्ली : उद्योगपती संजय कपूरची ३० हजार कोटी रुपयांची मालमत्ता कोणाच्या मालकीची होणार असा प्रश्न निर्माण

उद्धव ठाकरेंनी मराठी माणसासाठी केलेले एक काम संजय राऊतांनी दाखवावे

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे थेट आव्हान उद्धव ठाकरे आणि उबाटा गट यांनी मराठी माणसाच्या हितासाठी काय

१६ जानेवारीला आपण अटलजींना खरी आदरांजली द्यायची आहे" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : आज संपूर्ण देशभरात अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या निमित्त भाजपा