आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे

  49

पालकमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश


पालघर :राज्यामध्ये कोव्हिड रुग्णांची संख्या वाढत असून पालघर जिल्ह्यामध्ये देखील काही रुग्ण आढळले आहेत या आपत्तीशी सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सज्ज रहावे असे निर्देश वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा तसेच संभाव्य आपत्तीचा आढावा पालकमंत्री गणेश नाईक यांनी जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे नुकताच घेतला.


यावेळी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, जव्हार आणि डहाणूचे प्रकल्प अधिकारी अपूर्वा बासुर, विशाल खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी विजय जाधव, तेजस चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.


कोविडचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरण करून घ्यावे, उपाहारगृहामध्ये स्वच्छता ठेवून निर्जंतुकीकरण करावे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोविड सेंटर सुरू करावे अशा सूचना पालकमंत्री गणेश नाईक यांनी केल्या. बोगस बी- बियाणे विक्री करणाऱ्या दुकानावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांना शासना मार्फत देण्यात येणाऱ्या बी- बियाणे व खते कमी पडणार नाहीत. तसेच पिक विमा मिळणे हा प्रत्येक शेतकऱ्याचा हक्क असून यामध्ये कोणी गैरप्रकार करताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राायल येथे रोजगाराची संधी

युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन पालघर : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना

आठ पंचायत समित्यांचीही अधिसूचना प्रसिद्ध पालघर : पालघर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या

वसईत विद्यार्थ्याच्या अंगावर खांब कोसळला; सुदैवाने जीव वाचला, घटना सीसीटीव्हीत कैद

वसई शहरातील निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर जुना

माजी आयुक्तांसह चौघांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात ६ दिवसाच्या 'ईडी' कोठडीत असलेले पालिकेचे

विरार, वसई, नालासोपारामधील अनेक भाग पाण्याखाली, पाऊस अजूनही कायम, रेड अलर्ट जारी

मुसळधार पावसाने वसई, विरार, नालासोपारा परिसराला झोडपून काढलं आहे. गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस या भागात

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,