एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ७ टक्के वाढ 

१ कोटींचा अपघाती विमा; सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना १२ महिने मोफत प्रवास 


मुंबई (प्रतिनिधी) : राज्य परिवहन सेवेतील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ७ टक्के वाढ, १ कोटी रुपयांचा अपघाती विमा तसेच ३५ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ९ ऐवजी १२ महिन्यांसाठी मोफत प्रवास पास देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. सह्याद्री अतिथीगृह येथे मंगळवारी आयोजित केलेल्या एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, विविध कर्मचारी संघटनांचे नेते उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या कर्मचाऱ्यांना पूर्वी मूळ वेतनावर ४६ टक्के महागाई भत्ता मिळत होता. आता जून २०२५ पासून त्यामध्ये भर पडणार असून ४६ टक्के ऐवजी ५३ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. सेवेतील ७८ हजार कर्मचाऱ्यांना हा लाभ होईल. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना पाच लाखांपर्यंत कॅशलेस वैद्यकीय लाभ उपलब्ध करून देण्यात आली आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांना १ कोटी रुपयांचा अपघाती विमा दिला जाईल.


अपघात झाल्यास विमा कवच लागू: एसटीच्या माध्यमातून लोकांना चांगली सेवा मिळाली पाहिजे, बसगाड्यासह बसस्थानके, स्वच्छतागृह व विश्रन कक्ष यांच्या स्वच्छतेसाठी प्राधान्य दिले पाहिजे. एसटीच्या माध्यमातून कार्गो सेवा सुरू करण्यावर भर दिला पाहिजे. बसस्थानके हे बस पोर्ट झाली पाहिजेत. एसटी तोट्यातून कर कशी काढता येईल. याचा अभ्यास करावा. एसटीकडे बघण्याया दृष्टिकोन बदलला पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे.


परिवहन महामंडळातील कर्मचान्यांना स्टेट बँकेमार्फत अपघाती विमा कवच लागू करण्याबाबत बँकेशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन खाते स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये आहेत, अशा कर्मचाऱ्याऱ्यांना कामगिरीवर असताना-नसताना (दोन्ही प्रकरणी) अपघात झाल्यास विमा कवच लागू करण्यात येत आहे. त्यामध्ये वैयक्तिक अपघातात निधन झाल्यास १ कोटी, पूर्णतः अपंगत्व आल्यास १ कोटी, अंशतः अपंगत्व आल्यास ८० लाख रुपयापर्यंत विमा रक्कम दिली जाईल, असेही शिंदे म्हणाले.

Comments
Add Comment

Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat : 'जेन-झी' आणि 'जेन-अल्फा' जुन्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक!

- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; लोकशाहीत आंदोलनसुद्धा संवादाचेच एक माध्यम मुंबई : "भारताच्या शिक्षणव्यवस्थेत अजूनही

Air India New CEO : टाटांचा मास्टरस्ट्रोक! पाकिस्तानकडे जाणारे टेवोल्डे गेब्रेमरियम आता एअर इंडियाचे नवे बॉस

मुंबई : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला अखेर नवे नेतृत्व मिळाले आहे. इथियोपियन एअरलाइन्स ग्रुपचे माजी

Mohan Bhagwat : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा 'जेन-झी'शी संवाद

Mumbai : शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक गोष्टी करता येऊ शकतात. मात्र हे सर्व करताना समाजात फूट पाडण्यासाठी नव्हे, तर

Mahalaxmi Dhobi Ghat PNG Gas Connection : महालक्ष्मी धोबीघाट धूरमुक्त होणार! लाकूड-कोळशाला रामराम, १५० पीएनजी गॅस जोडण्यांमुळे प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल

मुंबई : मुंबईची ऐतिहासिक आणि जागतिक ओळख असलेल्या महालक्ष्मी धोबीघाटाने (Mahalaxmi Dhobighath) आता वायू प्रदूषणावर मात

Chandrashekhar Bawankule : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित! महसूलमंत्री बावनकुळेंच्या निर्णयाने वन विभागाचा हक्क कायम

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या (Sanjay Gandhi National Park forest) महत्त्वाच्या वनक्षेत्राबाबत राज्य सरकारने मोठा

Special Trains : मुंबई आणि मडगाव दरम्यान धावणार ४ साप्ताहिक विशेष गाड्या; प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई: आठवड्याच्या अखेरीस आणि आगामी सणासुदीच्या काळात प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक