भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम.


तुमचं रोजचं अन्न आरोग्यदायी असलं तरी प्रमाणाचं भान ठेवणं गरजेचं आहे. आपण सगळेच भाज्या आणि डाळी यांना "सुपरफूड" मानतो आणि त्या खरंच पोषणमूल्यांनी भरलेल्या असतात. पण हेल्थ कोच निपा आशाराम यांच्यानुसार, याच आरोग्यदायी अन्नाचं अति सेवन केल्यामुळे पोट फुगणं, अपचन आणि पचनसंस्थेचे त्रास सुरू होतात. त्यांनी नमूद केलं की, ५० ग्रॅम डाळ आणि १५०-३०० ग्रॅम भाज्यांपर्यंत मर्यादित सेवन हे योग्य आहे. यापेक्षा अधिक घेतल्यास फायबर आणि कॅलरीजचं प्रमाण वाढतं.



अति डाळी का टाळाव्यात?


काही डाळी (जसे मूग, मसूर) जास्त प्रमाणात घेतल्यास त्यातील ओलिगोसॅकाराइड्स मुळे पचन बिघडतं. जास्त तूप, तेल किंवा मलाई वापरून शिजवलेल्या डाळी कॅलोरीज वाढवतात. यामुळे वजन वाढू शकते. मधुमेह असणाऱ्यांसाठी जास्त डाळीतील कार्बोहायड्रेट्स हानिकारक ठरू शकतात.



भाज्यांचं अति सेवन का धोकादायक ठरतं?


फायबर जास्त झालं की पचनावर ताण येतो. फुगवटा, गॅस, अपचन यासारखे त्रास संभवतात. जास्त तेल, मसालेदार ग्रेव्ही वापरल्यास भाजी आरोग्यदायी राहात नाही. फक्त भाज्यांवर भर दिल्यास प्रथिनं व सत्त्वयुक्त फॅट्स चा अभाव होतो. यामुळे पोषणतूट होऊ शकते.



काय लक्षात ठेवावं?


डाळ १-२ लहान वाट्या, आणि भाज्या ३०० ग्रॅमपर्यंत ठेवा. डाळ शिजवताना कमी तेल, पचनास मदत करणारे मसाले वापरा, जसे हिंग, आलं, जिरे. आपल्या थाळीत धान्य, डाळी, भाज्या, फॅट्स आणि प्रथिने यांचा संतुलित समावेश असावा. पचनासाठी फायबर हळूहळू वाढवा आणि पुरेसं पाणी प्या. मधुमेह, किडनी, थायरॉईडसारख्या समस्या असल्यास वैद्यकीय सल्ला घेऊन आहार ठरवा.

Comments
Add Comment

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात