आयपीएल पर्व १८ चा नवीन चेहरा ?

मुंबई (सुशील परब) : आज आपण सर्वजण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी इथे जमलो आहोत. आज, ३ जून २०२५ रोजी, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल २०२५ या अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) आणि पंजाब किग्स (PBKS) यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना केवळ एक क्रिकेटचा मुकाबला नाही, तर तो दोन संघांच्या स्वप्नांची, त्यांच्या मेहनतीची आणि त्यांच्या चाहत्यांच्या अपेक्षांची लढाई आहे. कारण या दोन्ही संघांनी आजवर एकदाही आयपीएलची ट्रॉफी जिंकलेली नाही। त्यामुळे आज एक नवा विजेता आयपीएलच्या इतिहासात आपले नाव कोरणार आहे.


रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु थोडा मजबूत वाटतो त्यांचा फॉर्म चांगला वाटतो. विराट कोहली चांगलाच फॉर्मात आहे. प्रत्येक सामन्यात थावा करत आहे. फिल सॉल्ट, रजत पाटीदार, लिविंगस्टोन, जितेश शर्मा, रोमारीयो शेफर्ड, कृणाल पांड्या असे फलंदाज आहेत. त्याची फलंदाजी चांगली होत आहे. भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवूड, कृनाल पांड्या, सुयश शर्मा, रोमारीयो शेफर्ड असे गोलंदाज आहेत. मागील सामन्यात गोलंदाजीच्या जोरावर त्यानी पंजाब किग्समा सहज पराभव केला.


पंजाब किग्सला फक्त १०१ धावा करता आल्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे पारडे जड वाटते. पंजाब किंग्सने उपांत्य फेरीत मुंबई इंडियन्सला धूळ चारली, त्यामुळे पंजाब किग्सचा आत्मविश्वास वाढला आहे. श्रेयश अय्यरने कर्णधारास साजेशी खेळी केली. त्याने ४१ चेंडूत ८७ धावांची नावाद खेळी केली, त्यामुळे मुंबई इंडियन्सवर सहज विजय मिळवला व मुंबई इंडियन्सला अंतिम फेरीपासून रोखले. प्रियाश आर्य, प्रभसिमरन सिंग, ज्योस इंग्लीस, नेहल वधेरा, शशांक सिग, मार्क स्टॉयनिस अशी मजबूत फलंदाजी त्यांच्याकडे आहे. अर्शदीपसिंग, मार्क स्टॉयनिस, युजवेंद्र चहल, जेमिन्सन, ओमरझाई, व्याशक, असे गोलंदाज आहेत. त्यामुळे ही लढत रंगतदार होईल.


पंजाब किग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने तीन वेगवेगळ्या संधाना आयपीएल फायनलमध्ये पोहोचवले आहे, त्यामुळे त्याचे नेतृत्व महत्वाचे ठरेल. हवामानाबद्दल बोलायचे झाले तर दुपारच्या सुमारास हलक्या पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र संध्याकाळपर्यंत हवामान स्वच्छ होण्याची अपेक्षा आहे, वधूया महाअंतिम सामन्यात विजय कोणाच्या गळ्यात माळ घालेल. दोघांपैकी कोणता संघ प्रथमच आयपीएल २०२५ चा विजेता ठरेल. आजचा दिवस क्रिकेट पाहत्यांसाठी अविस्मरणीय दिवस ठरणार आहे. दोन्ही संघाना प्रहार परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा। प्रहार आयपीएल स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकाचे प्रहार परिवारातर्फे हार्दिक आभार.....


चला आपण सर्व या रोमांचक सामन्याचा आनंद घेवूयात....

Comments
Add Comment

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत

U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक