शिवाजी पार्क परिसराची स्वच्छता यांत्रिक झाडूद्वारेच

पारंपरिक पद्धतीने हाती झाडू मारणे महापालिकेने केले बंद


मुंबई :दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या (शिवाजी पार्क) परिसरातील कचरा हा पारंपरिक पद्धतीने हाती झाडू मारुन केला जातो. त्यामुळे सकाळ, संध्याकाळ फिरण्यास येणाऱ्या नागरिकांना धुळीचा त्रास सहक करावा लागतो. त्यामुळे रस्त्यावरील कचरा आता पारंपारिक झाडूद्वारे साफ करण्याऐवजी यांत्रिक झाडूद्वारे करण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार प्रशासनाने अखेर या कार्यपद्धतीत सुधारणा करत शिवाजीपार्कच्या आसपासच्या चालण्याच्या जागांची सफाई यांत्रिक झाडूने करण्यास सुरुवात केली आहे.

दादर पश्चिम येथील शिवाजी पार्क मैदानाच्या बाजुला असलेल्या कठड्यांच्या दोन्ही बाजुला नागरिकांची गर्दी असते. या भागाची स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेच्यावतीने दोन सत्रांमध्ये स्वच्छता राखण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे या दोन्ही सत्रांमध्ये साफ करण्यासाठी झाडू मारली जाते. ज्याठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते, तसेच त्यांचा वावर असतो, त्यामुळे साफसफाई करताना यामुळे धुळीचा त्रास त्यांना होवू नये याची काळजी घेणे आवश्यक असते. परंतु तशी काळजी घेतली जात नाही. मात्र, या मैदानाला जोडून असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील साफसफाई करण्यासाठी मिनी यांत्रिक झाडूचा वापर केला जातो. शहराचे माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी यांत्रिक झाडूच्या खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यातून यांत्रिक झाडू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि या झाडूचा वापर स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाच्या सफाईसाठी केली जात आहे. या यांत्रिक झाडूचा वापर सावरकर मार्गा ऐवजी मैदान परिसरातील स्वच्छता ही यांत्रिक झाडूने केल्यास चांगल्याप्रकारे सफाई होवू शकते तसेच यामुळे उडणाऱ्या धुळीचाही त्रासही होणार नाही.


महापालिका प्रशासनाने पारंपारिक पद्धतीने मैदानाच्या सभोवतालच्या परिसराची सफाई यांत्रिक झाडूने करावी अशाप्रकारची मागणीच रहिवाशांकडून केली जात आहे. याची प्रशासनाने तातडीने दखल घेत छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या परिसरातील चालण्याच्या जागेवर यांत्रिक झाडूद्वारे सफाई करण्याची चाचणी सुरु असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता या परिसराची सफाई यांत्रिक झाडूद्वारे करण्यात येते. त्यामुळे या यांत्रिक झाडूद्वारे होणाऱ्या सफाईमुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. त्यामुळे शिवाजीपार्क मधील नागरिकांना दिलासा मिळत आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेत विरोधकांची हवा गुल... काय आहे कारण जाणून घ्या

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आली असली तरी उबाठा आणि काँग्रेसच्या रुपात सक्षम विरोधी पक्ष असतानाही

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी