शिवाजी पार्क परिसराची स्वच्छता यांत्रिक झाडूद्वारेच

पारंपरिक पद्धतीने हाती झाडू मारणे महापालिकेने केले बंद


मुंबई :दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या (शिवाजी पार्क) परिसरातील कचरा हा पारंपरिक पद्धतीने हाती झाडू मारुन केला जातो. त्यामुळे सकाळ, संध्याकाळ फिरण्यास येणाऱ्या नागरिकांना धुळीचा त्रास सहक करावा लागतो. त्यामुळे रस्त्यावरील कचरा आता पारंपारिक झाडूद्वारे साफ करण्याऐवजी यांत्रिक झाडूद्वारे करण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार प्रशासनाने अखेर या कार्यपद्धतीत सुधारणा करत शिवाजीपार्कच्या आसपासच्या चालण्याच्या जागांची सफाई यांत्रिक झाडूने करण्यास सुरुवात केली आहे.

दादर पश्चिम येथील शिवाजी पार्क मैदानाच्या बाजुला असलेल्या कठड्यांच्या दोन्ही बाजुला नागरिकांची गर्दी असते. या भागाची स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेच्यावतीने दोन सत्रांमध्ये स्वच्छता राखण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे या दोन्ही सत्रांमध्ये साफ करण्यासाठी झाडू मारली जाते. ज्याठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते, तसेच त्यांचा वावर असतो, त्यामुळे साफसफाई करताना यामुळे धुळीचा त्रास त्यांना होवू नये याची काळजी घेणे आवश्यक असते. परंतु तशी काळजी घेतली जात नाही. मात्र, या मैदानाला जोडून असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील साफसफाई करण्यासाठी मिनी यांत्रिक झाडूचा वापर केला जातो. शहराचे माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी यांत्रिक झाडूच्या खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यातून यांत्रिक झाडू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि या झाडूचा वापर स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाच्या सफाईसाठी केली जात आहे. या यांत्रिक झाडूचा वापर सावरकर मार्गा ऐवजी मैदान परिसरातील स्वच्छता ही यांत्रिक झाडूने केल्यास चांगल्याप्रकारे सफाई होवू शकते तसेच यामुळे उडणाऱ्या धुळीचाही त्रासही होणार नाही.


महापालिका प्रशासनाने पारंपारिक पद्धतीने मैदानाच्या सभोवतालच्या परिसराची सफाई यांत्रिक झाडूने करावी अशाप्रकारची मागणीच रहिवाशांकडून केली जात आहे. याची प्रशासनाने तातडीने दखल घेत छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या परिसरातील चालण्याच्या जागेवर यांत्रिक झाडूद्वारे सफाई करण्याची चाचणी सुरु असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता या परिसराची सफाई यांत्रिक झाडूद्वारे करण्यात येते. त्यामुळे या यांत्रिक झाडूद्वारे होणाऱ्या सफाईमुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. त्यामुळे शिवाजीपार्क मधील नागरिकांना दिलासा मिळत आहे.

Comments
Add Comment

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल

मुंबई महापालिकेत सहायक आयुक्तांची खांदेपालट, कुणाची कुठे बदली, कुणाची कुठे वर्णी...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा सहायक आयुक्तांची खांदेपालट करून विद्यमान सहायक आयुक्तांची

'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस ‘मातोश्री’त का ठेवला ?' नार्को टेस्ट कराच!

बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावरुन नवा वाद, रामदास कदमांनी दिली धक्कादायक माहिती मुंबई : गोरेगावच्या नेस्को