Samruddhi Mahamarg Accident : भीषण अपघात! समृद्धी महामार्गावर भरधाव कारची ट्रकला धडक; चालकाचा जागीच मृत्यू

नागपूर : समृद्धी महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेली कार नागपूर कॉरिडॉरवरील डोणगावजवळ ट्रकला मागून जोरात धडकली. या भीषण धडकेत कारचा अक्षरशः चुराडा झाला असून चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीची ओळख भूषण बळीराम मगर (रा. मानका, जिल्हा वाशिम) अशी आहे. ते छत्रपती संभाजीनगरहून वाशिमकडे परतत होते.



प्राथमिक तपासानुसार, चालकाला डुलकी आल्यामुळे वाहनाचा ताबा सुटून हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी पोलीस आणि आपत्कालीन पथकाने तत्काळ धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. ही घटना पाहता, समृद्धी महामार्गासारख्या उच्चगती मार्गांवर वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे आणि प्रवासादरम्यान योग्य विश्रांती घेणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा