उत्तरप्रदेश : युपीच्या पाकिस्तानी निर्वासितांना मिळणार जमिनीचे हक्क

राज्य सरकारने स्थापन केलेल्या अंजनेय समितीचा अहवाल


लखनऊ : देशाच्या फाळणीनंतर उत्तरप्रदेशात स्थायिक झालेल्या पाकिस्तानी निर्वासितांना उत्तराखंडच्या धर्तीवर जमिनीचे हक्क दिले जाणार आहे. राज्य सरकारने स्थापन केलेल्या आंजनेय समितीने याबाबत अहवाल दिला आहे. राज्यात सध्या ५० हजार एकर जागेवर २० हजार निर्वासित कुटुंबांचे वास्तव्य असून ते हक्काच्या जमिनीपासून वंचित होते.



अनेक निर्वासित होते जमीन मालकीच्‍या हक्‍कापासून वंचित


देशाच्या फाळणीनंतर पाकिस्तानातून आलेले निर्वासित उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खेरी, रामपूर, बिजनौर आणि पिलीभीत येथे स्‍थायिक झाले होते. बहुतांश निर्वासित हे हिंदू आणि शीख होते. काही वर्षांनंतर सरकारने त्‍यांना उपजीविेकसाठी जमीन दिली. मात्र जमीन सरकारच्या नावावर होती. त्‍यामुळे अनेक कटुंब ही हस्‍तांतरणीय जमीन मालिकीच्‍या हक्‍कापासून वंचित राहिले होते.


रामपूरमधील २३ गावांमध्ये आणि बिजनौरमधील १८ गावांमध्ये निर्वासितांना स्थायिक केले आहे. तसेच काही जण लखीमपूर खेरी आणि पिलीभीतमधील वेगवेगळ्या गावांमध्ये किंवा जंगलाच्या काठावर स्थायिक झाले होते. या कुटुंबांच्या वारसांना त्यांच्या जमिनीवर बँकेकडून पीक कर्जाव्यतिरिक्त कोणतेही कर्ज घेता येत नाही. त्यांना जमीन विकण्याचा अधिकार देखील नाही. या संपूर्ण प्रकरणाच्‍या चौकशी व उपाययोजना सुचविण्‍यासाठी अंजनेय समिती स्‍थापन करण्‍यात आली. या समितीने आपला अहवाल राज्‍य सरकारला सादर केला आहे. अहवालानुसार काही निर्वासित कुटुंबांना सरकारी अनुदान कायद्याअंतर्गत जमीन देण्यात आली होती. त्यांना ग्रामसभा आणि विविध विभागांच्या मालकीच्या जमिनीवर देखील स्थायिक करण्यात आले होते. सध्या, सरकारी अनुदान कायदा संपला आहे. निर्वासितांच्या पूर्ण मालकीसाठी कायदा करणे आवश्यक आहे.



अंजनेय समितीने आपल्‍या अहवालात म्‍हटले आहे की, "निर्वासित कुटुंबांना दिलेल्या जमिनीवर पूर्ण मालकी म्हणजेच हस्तांतरणीय जमीनधारक हक्क देण्यासाठी स्वतंत्र कायदा आवश्यक असेल. या प्रकरणांमध्ये विद्यमान नियम शिथिल करता येतील. उत्तराखंडच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जमिनीच्या किमतीच्या काही टक्के रक्कम घेऊन मालकी देण्याचे काम करण्यात आले आहे. उत्तराखंडप्रमाणे उत्तर प्रदेशमध्‍यही काही किंमत घेऊन किंवा मोफत हस्तांतरणीय जमीनधारक हक्क देता येतात. यासाठी कायद्यात बदल करून त्यांना इतरत्र जमीन देण्यासाठी किंवा त्याच जमिनीवर मालकी हक्क देण्यासाठी विचार करावा लागेल. वनजमिनीवर हक्क देण्यासाठी केंद्र सरकारमार्फत सर्वोच्च न्यायालयाची परवानगी देखील घ्यावी लागेल. नियमांनुसार ग्रामसभेची जमीन त्याच गावातील मूळ रहिवाशांना देता येते. त्याचप्रमाणे, संबंधित विभागांनाही विभागांची जमीन देण्याचा अधिकार आहे.

Comments
Add Comment

Hindu religion : धर्मांतरित हिंदूंच्या मनात जर खरी श्रद्धा असेल, तर त्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा आणि पूजा करण्याचा अधिकार

नवी दिल्ली : जर एखादी व्यक्ती जन्माने हिंदू (Hindu) नसतानाही तिला मंदिरात प्रवेश नाकारला जाऊ शकतो का? याबाबत ती

थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

अरुणाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलन; १४ गावांतील ३१०० हून अधिक नागरिक बाधित

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनामुळे

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी