मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

  62

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक परिपक्वतेचं, किंवा लग्नासाठी तयार असल्याचं लक्षण मानली जाते. ७१ टक्के मुलींना पहिल्यांदा पाळी आली तेव्हाच तिची माहिती मिळते, या मोहिमेतून टाटा ट्रस्ट्स मासिक पाळी ही आरोग्याचं लक्षण आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. ही मोहिम झारखंड, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील ग्रामीण भागात सखोल सांस्कृतिक व सामाजिक अभ्यासावर आधारित आहे. यातून समोर आले की, अनेक स्त्रिया व तरुण मुली स्वच्छता, खाजगीपणा आणि मासिक पाळीच्या व्यवस्थापनात अडचणीत आहेत. कारण समाजात पाळी म्हणजे मुलगी ‘लग्नासाठी तयार’ असं मानलं जातं. आंगणवाडी सेविकाही हीच भीती व्यक्त करतात. पुरुषांमध्ये पाळीबाबत माहिती कमी असली तरी, जेव्हा योग्य माहिती दिली जाते, तेव्हा ते पॅड आणणे किंवा डॉक्टरकडे नेणे यासारख्या कृतींमध्ये मदतीस तयार असतात.


बहुतेक आई मुलींशी पाळीबाबत संवाद करत नाहीत, कारण समाजात पाळी म्हणजे मुलगी ‘लग्नासाठी तयार’ असं मानलं जातं. आंगणवाडी सेविकाही हीच भीती व्यक्त करतात. पुरुषांमध्ये पाळीबाबत माहिती कमी असली तरी, जेव्हा योग्य माहिती दिली जाते, तेव्हा ते पॅड आणणे किंवा डॉक्टरकडे नेणे यासारख्या कृतींमध्ये मदतीस तयार असतात.



ही मोहिम ‘सोशल अ‍ॅन्ड बिहेविअरल चेंज कम्युनिकेशन’ (SBCC) च्या माध्यमातून सात राज्यांमध्ये राबवली जात आहे. या मोहिमेचा उद्देश आहे की, मुलींनी पहिल्यांदा पाळी आली तरीही त्या अजूनही बालपणातच आहेत, हे त्यांना जाणवावं आणि स्त्रियांनीही पाळीबाबत माहितीपूर्ण, आत्मविश्वासपूर्ण आणि लज्जारहित अनुभव घ्यावा.


दिव्यांग वाघेला, प्रमुख – वॉटर, सॅनिटेशन अ‍ॅन्ड हायजीन (WASH), टाटा ट्रस्ट्स , म्हणतात, साफ पाणी आणि खाजगी जागेचा अभाव अंघोळीसाठी, पॅड बदलण्यासाठी, किंवा त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी या सगळ्यामुळे मुलींना पाळीच्या काळात सुरक्षित आणि सन्मानाने वागणं अवघड होतं. या अडथळ्यांमागे केवळ पायाभूत सुविधांचा अभावच नाही, तर मानसिक, सामाजिक बंधनंही आहेत. ही मोहिम या सगळ्या अडथळ्यांवर मात करत, मासिक पाळीला "लाजेची गोष्ट" न बनवता, आरोग्याचं साधं लक्षण मानायला शिकवते.

Comments
Add Comment

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर

आयोडीन युक्त मिठाचा वापर करा, आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई: जागतिक थायरॉईड दिवस दरवर्षी २५ मे रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश थायरॉईड रोगांबद्दल जागरूकता वाढवणे

International Tea Day : चहा पिणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र कितव्या स्थानी?

नसतं चहाचं नाव काढलं तरी तो घेण्याची तल्लफ होते. काही चहाप्रेमी तर या पेयाला भावनेशी जोडतात... ‘‘चहा हे फक्त एक पेय

Lychee : लिची खाण्याची योग्य वेळ कोणती? काय आहेत लिची खाण्याचे फायदे

मुंबई : लिची हे फळ गोड आणि रसाळ असते. मुले असोत किंवा वृद्ध, सर्वांनाच लिची आवडते. यामध्ये 82 % टक्के पाणी असते जे