मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

  98

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक परिपक्वतेचं, किंवा लग्नासाठी तयार असल्याचं लक्षण मानली जाते. ७१ टक्के मुलींना पहिल्यांदा पाळी आली तेव्हाच तिची माहिती मिळते, या मोहिमेतून टाटा ट्रस्ट्स मासिक पाळी ही आरोग्याचं लक्षण आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. ही मोहिम झारखंड, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील ग्रामीण भागात सखोल सांस्कृतिक व सामाजिक अभ्यासावर आधारित आहे. यातून समोर आले की, अनेक स्त्रिया व तरुण मुली स्वच्छता, खाजगीपणा आणि मासिक पाळीच्या व्यवस्थापनात अडचणीत आहेत. कारण समाजात पाळी म्हणजे मुलगी ‘लग्नासाठी तयार’ असं मानलं जातं. आंगणवाडी सेविकाही हीच भीती व्यक्त करतात. पुरुषांमध्ये पाळीबाबत माहिती कमी असली तरी, जेव्हा योग्य माहिती दिली जाते, तेव्हा ते पॅड आणणे किंवा डॉक्टरकडे नेणे यासारख्या कृतींमध्ये मदतीस तयार असतात.


बहुतेक आई मुलींशी पाळीबाबत संवाद करत नाहीत, कारण समाजात पाळी म्हणजे मुलगी ‘लग्नासाठी तयार’ असं मानलं जातं. आंगणवाडी सेविकाही हीच भीती व्यक्त करतात. पुरुषांमध्ये पाळीबाबत माहिती कमी असली तरी, जेव्हा योग्य माहिती दिली जाते, तेव्हा ते पॅड आणणे किंवा डॉक्टरकडे नेणे यासारख्या कृतींमध्ये मदतीस तयार असतात.



ही मोहिम ‘सोशल अ‍ॅन्ड बिहेविअरल चेंज कम्युनिकेशन’ (SBCC) च्या माध्यमातून सात राज्यांमध्ये राबवली जात आहे. या मोहिमेचा उद्देश आहे की, मुलींनी पहिल्यांदा पाळी आली तरीही त्या अजूनही बालपणातच आहेत, हे त्यांना जाणवावं आणि स्त्रियांनीही पाळीबाबत माहितीपूर्ण, आत्मविश्वासपूर्ण आणि लज्जारहित अनुभव घ्यावा.


दिव्यांग वाघेला, प्रमुख – वॉटर, सॅनिटेशन अ‍ॅन्ड हायजीन (WASH), टाटा ट्रस्ट्स , म्हणतात, साफ पाणी आणि खाजगी जागेचा अभाव अंघोळीसाठी, पॅड बदलण्यासाठी, किंवा त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी या सगळ्यामुळे मुलींना पाळीच्या काळात सुरक्षित आणि सन्मानाने वागणं अवघड होतं. या अडथळ्यांमागे केवळ पायाभूत सुविधांचा अभावच नाही, तर मानसिक, सामाजिक बंधनंही आहेत. ही मोहिम या सगळ्या अडथळ्यांवर मात करत, मासिक पाळीला "लाजेची गोष्ट" न बनवता, आरोग्याचं साधं लक्षण मानायला शिकवते.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी