स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय गांधी यांचे निधन

मुंबई : १९४२ च्या चलेजाव आंदोलनातील विलेपार्ले येथील स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय गांधी उर्फ आप्पा (वय १०२) यांचे मंगळवार (दि.३) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार कोणतेही विधी न करता देहदान करण्यात येणार आहे.


आप्पा देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले तुरूंगात गेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेवटपर्यंत सामाजिक कार्यात सक्रिय होते. लोकशाही, समता आणि धर्मनिरपेक्षता याबाबत ते आग्रही राहिले. त्यांच्या सडेतोड भूमिका सर्वश्रुतच आहेत.



दत्ता गांधी हे राष्ट्र सेवा दलाच्या महाड शाखेचे कार्यकर्ते होते. महाड येथील शालेय शिक्षणादरम्यान स्वातंत्र्यलढ्याकडे वळले. १९४२च्या भारत छोडो आंदोलनात गांधींचा उत्स्फूर्त सहभाग होता. वातावरणामुळे उत्साही होऊन त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी त्यांच्या शाळेत मोर्चा काढला आणि बहिष्कार टाकला.

Comments
Add Comment

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, गुंदवलीवरून थेट गाठता येणार मिरा रोड

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या गुंदवलीवरून निघालेली मेट्रो दहिसर पूर्व

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या