स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय गांधी यांचे निधन

मुंबई : १९४२ च्या चलेजाव आंदोलनातील विलेपार्ले येथील स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय गांधी उर्फ आप्पा (वय १०२) यांचे मंगळवार (दि.३) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार कोणतेही विधी न करता देहदान करण्यात येणार आहे.


आप्पा देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले तुरूंगात गेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेवटपर्यंत सामाजिक कार्यात सक्रिय होते. लोकशाही, समता आणि धर्मनिरपेक्षता याबाबत ते आग्रही राहिले. त्यांच्या सडेतोड भूमिका सर्वश्रुतच आहेत.



दत्ता गांधी हे राष्ट्र सेवा दलाच्या महाड शाखेचे कार्यकर्ते होते. महाड येथील शालेय शिक्षणादरम्यान स्वातंत्र्यलढ्याकडे वळले. १९४२च्या भारत छोडो आंदोलनात गांधींचा उत्स्फूर्त सहभाग होता. वातावरणामुळे उत्साही होऊन त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी त्यांच्या शाळेत मोर्चा काढला आणि बहिष्कार टाकला.

Comments
Add Comment

बोरीवली स्थानकाला जोडणाऱ्या स्कायवॉकवर बसवणार सरकता जिना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बोरीवली रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या स्कायवॉकला आता सरकता जिना जोडला जाणार

विस्तारीत कोस्टल रोड प्रकल्पाच्या आड येणाऱ्या वर्सोव्यातील बांधकामांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) प्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या वर्सोवा आराम नगर येथील ३३

नालेसफाई कंत्राटदारांची थकीत रक्कम देण्यास प्रशासन तयार, कंत्राटदार कामाला करणार सुरुवात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या वतीने छोट्या आणि मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी नियुक्त करण्यात

मुंबईत अत्यंत जबाबदारीने आणि प्रभावीपणे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन कार्यक्रम राबवावा; मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मुंबई: महाराष्ट्रात लवकरच विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

वांद्रे पश्चिम भागांत शनिवारी, रविवारी पाणीकपात

मुंबई: पाली हिल जलाशयाच्‍या पाणी पातळीत सुधारणा करण्‍यासाठी वांद्रे पश्चिम येथील रामदास नायक मार्ग, स्‍वामी

मुंबईत वर्षभरात ५५ हजार ३९० क्षयरोग रुग्णांची नोंद

मुंबई: मुंबईत महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाकडून क्षय रूग्णांसाठी उच्च दर्जाच्या निदान सेवा, नवीन औषधोपचार