व्हाईट टॅपिंगच्या कामासाठी ‘डेडलाईन’!

महामार्गाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी धरले धारे


पालघर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ च्या व्हाईट टॅपिंगचे काम १० दिवसांत पूर्ण करून १२ जूनला याच कामासाठी घेण्यात येणाऱ्या आढावा सभेला कामाची पूर्ण माहिती सादर करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुपस्थिती आणि कामाबाबत असलेली उदासीनता पाहून जिल्हाधिकारी जाखड यांनी सोमवारी उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.


मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूकदारांना सोयीचा आणि लवकर प्रवास व्हावा म्हणून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ या महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ मध्ये प्रारंभ करण्यात आले. दहिसर चेकनाका तर तलासरी या १२० किलोमीटरमध्ये रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र व्हाईट टॅपिंगचे काम अद्याप झालेले नाही. एप्रिल अखेरपर्यंत ९७ टक्के काम पूर्ण करण्यात आल्याचा दावा महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी केला आहे. दरम्यान, काँक्रीटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबत लोकप्रतिनिधींच्या अनेक तक्रारी आहेत. पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक हे सतत या महामार्गावरून प्रवास करीत असून, निकृष्ट कामासह महामार्गाच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी अनेक बैठका घेतल्या आहेत.


दोन दिवसांपूर्वीच आमदार राजेंद्र गावित यांनी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत व्हाईट टॅपिंगचे काम चांगल्या दर्जाचे व तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, २ जून रोजी पालकमंत्री, खासदार, आमदार तसेच जिल्हाधिकारी यांचा महामार्गाच्या पाहणीचा दौरा होता.


वसई फाटा परिसरात रखडलेल्या व्हाईट टॅपिंगच्या कामाच्या जवळ पालकमंत्री गणेश नाईक, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजन नाईक व जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी कामाची पाहणी केली.


पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्टपणे देण्यात येत नव्हती. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण, वसई-विरार महापालिका, एमएमआरडीए आणि महावितरण यांनी समन्वय ठेवून महामार्गाचे सर्व रखडलेले काम पूर्ण करण्याबाबत आजच "प्लॅन" तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल अशी विचारणा महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी ८ ते १० दिवसांत काम पूर्ण करणार असे सांगितले. त्यामुळे १० दिवसात काम पूर्ण करून सविस्तर माहिती घेऊन या, १२ जून रोजी याच विषयावर आढावा सभा घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांना या कामावर वारंवार यावे लागते, हे योग्य होत नसल्याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.

Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक