वसई - विरार शहरात भाजपा संघटनेमध्ये महिला 'राज' !

जिल्हाध्यक्षपदी भाजपाने संघटनेतील महिलेस दिली संधी


विरार : भारतीय जनता पक्षाच्या संघटन शक्तीमध्ये बूथ समितीपासून तर प्रदेश परिषद सदस्यांपर्यंत महिलाशक्ती वाढविण्यावर भर असून, वसईमध्ये -वसई शहर मंडळ अध्यक्षानंतर आता वसई -विरारच्या जिल्हाध्यक्षपदी भाजपाने संघटनातील एका महिलेला संधी दिल्यामुळे या ठिकाणी पहिल्यांदाच महिलाराज आल्याचे चित्र आहे. भारतीय जनता पक्षामध्ये मंडळ अध्यक्षापासून तर जिल्हाध्यक्ष पदापर्यंत संघटनात्मक निवडणुका पार पडल्या आहेत. प्राथमिक सदस्य नोंदणी, बूथ समित्या, शक्ती केंद्रप्रमुख, मंडळ अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून एक या प्रमाणे प्रदेश परिषद निवडीचा कार्यक्रम संपूर्ण राज्यात पार पडला आहे. दरम्यान, प्रत्येक बूथ समितीमध्ये किमान ३ महिला सदस्य घेणे बाबत अनिवार्य करून जास्तीत जास्त महिलांना भाजपासोबत जोडण्याचे काम करण्यात आले आहे. एकंदरीतच महिलांना संघटनेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम भाजपाकडून करण्यात येत आहे.



दरम्यान, वसई विधानसभेचा गड भाजपाने जिंकल्यानंतर आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या रुपाने महिलांनाही वसई-विरारमध्ये खंबीर नेतृत्व मिळाले आहे. विधानसभा जिंकल्यानंतर भाजपामधील नारीशक्ती अधिक सक्रिय झालेली आहे. अशातच नुकतेच झालेल्या मंडळ अध्यक्ष निवड प्रक्रियेत वसई-विरार आणि पालघर मधील ३० मंडळ अध्यक्षांपैकी केवळ वसई शहर मंडळ अध्यक्षपदी मारिया उर्फ गीतांजली दरीवाला यांची वर्णी लागली. गीतांजली दरीवाला या सहजरित्या मंडळ अध्यक्ष बनल्या नाहीत. बऱ्याच राजकीय घडामोडीनंतर मंडळ अध्यक्ष पदाचा मुकुट त्यांना मिळाला आहे. आता वसई-विरार जिल्हाध्यक्ष पदावर प्रज्ञा पाटील यांची निवड झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत वसई-विरार मध्ये भाजपाला चांगले यश मिळवून देण्यात महिला मतदारांचा निर्णय महत्वाचा राहणार आहे. त्यामुळे भाजपाच्या संघटनेतील वाढती नारीशक्ती मोलाची भूमिका निभावेल या अनुषंगाने भाजपाकडून विश्वास टाकण्यात आला आहे.
Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक