माथेरान येथे वाहतूक कोंडीचा तिढा कायमच; पर्यटकांचे हाल

ठोस उपाययोजना नाही; लक्ष देण्याची प्रवाशांची मागणी


माथेरान : दरवेळी सुट्ट्यांच्या हंगामात माथेरान दस्तुरी नाक्यावर आणि घाटरस्त्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नेहमीच्या या वाहतूक कोंडीचा तिढा सोडविण्यासाठी प्रशासनाने जातीने लक्ष देण्याची गरज असल्याचे सर्वच स्तरातून बोलले जात आहे.



शनिवारी आणि रविवारी माथेरानला पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नेरळ माथेरान हा एकमेव घाटरस्ता असल्याने आणि दस्तुरी वाहन पार्किंगमध्ये अपुरी पार्किंग व्यवस्था यामुळे पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मुंबई-पुण्यापासून जवळचे ठिकाण असल्याने माथेरानला सर्वाधिक पसंती दिली जाते त्यामुळे इथे पर्यटनाच्या माध्यमातून सर्वांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. प्रवासी कर आणि वाहन कराच्या माध्यमातून नगरपालिका आणि वनखात्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न प्राप्त होते. परंतु येणाऱ्या पर्यटकांना आवश्यक सेवासुविधा देण्यासाठी शासन स्तरावर आजमितीपर्यंत ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. जग एकविसाव्या शतकात वाटचाल करत असताना इथे अद्यापही पर्यायी व्यवस्था निर्माण होऊ शकली नाही. जो पर्यटक आपल्या लहान मुलांना, वयोवृद्ध आई-वडिलांना इथे फिरावयास घेऊन येतो त्यांना साधी वाहतुकीची सुविधा उपलब्ध नाही. ही लाजिरवाणी बाब असल्याचे ज्येष्ठ मंडळी बोलत आहेत.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; तिघे जखमी, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

रायगड : माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघे जखमी झाले असून दोन्ही

रायगड जिल्ह्यात १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही रायगड: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या

पनवेलमध्ये स्कूल बसला अपघात, विद्यार्थी जखमी

पनवेल : भरधाव टेम्पोने समोरुन स्कूल बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना

मतदानकरून परत येताना महाडमध्ये दरीत कोसळली कार; चौघेजण....

महाड : नुकताच जिल्हा परिषदेची निवडणूकमही पार पडली आहे. आणि आजच त्याचे निकालही लागले आहेत. त्यामुळे मतदानासाठी

अर्थसंकल्पातून कोकणच्या आर्थिक विकासाला नवी दिशा

काजू, नारळ, मत्स्योद्योगाला भरीव निधी सुभाष म्हात्रे अलिबाग : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात

रायगड : राज्यातील राजकारणात लक्षवेधी ठरणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी