
एटीएसने धाड टाकण्याचे कारण अद्याप समजलेले नाही. पण शोध मोहीम सुरू असल्याचे तसेच काही साहित्य जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे. या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
मुंबईत २००२-२००३ मध्ये मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, विलेपार्ले आणि मुलुंडमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. या प्रकरणात साकीबला दोषी ठरवण्यात आले आहे. साकीब २०१७ मध्ये तुरुंगातून बाहेर आला. यानंतर तो पुन्हा अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा आरोप होत आहे. साकीब नाचणने तुरुंगातून बाहेर येताच पडघा येथे अज्ञात ठिकाणी AK47 रायफलसह अनेक संहारक शस्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण घेतले. सिमीशी संबंधित एका व्यक्तीनेच ही माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर एटीएसने कारवाई केली आहे.